Adiyuva,
discussions
Tribal Entrepreneurship - S M Sarkunde, Comm. Tribal Development, Maharashtra
Tribal are existed in varies small ethnic groups since long despite it forms 9 percent population of India. Some are trailing for survival and some on the verge of extinct. Their weakness lies in their social exclusion due to geographical seclusion , distinct life style, poor food habits, special dialect, tradition and custom have made them different from the main stream of society. Till yesterday, they were dependent on miner forest produce, fishing, hunting and honey collection for their source of livelihood. To some extent they were engaged in shifting cultivation and used to harvest grain, cereals, pulses etc. Thus, today also they are subjected to subsistence economy. Their peaceful life style got interrupted by Aryan foreign culture ,advent of foreign invasion, introduction of numerous forest legislation like Indian Forest Act, 1927, The Protection of Wild Life Act, 1972, the Forest Conservation Act, 1980 and various land laws. These laws pre and post independent era brought limitation on their way of life, forced them to leave their place of habitation, given up their traditional livelihood pursuit, mutilated their cultural fabric and thus they came into contact with so called civilized society by taking recourse to savage deeds.. Their assimilation with main stream society made them not only dependent for their daily bread but also for cultural ethos. The nature lover tribal now compelled to embrace laballed religion like Hinduis, muslim, Buddhism, Christianity etc and thus they started to loose their cultural identity. The erstwhile nature worshiper tribal turned idol worshiper giving up worshiping totem. The free tribal life style turned into bonded labor in mine, on farm and now a days on construction site. Still their habitation remained in the lap of nature. However, for source of livelihood he became dependent on the land lord, mine mafia, builder, orchard owner etc. His seasonal cultivation for the period of three months of a year forced him to leave his hamlet for in search of daily bread keeping children and better half behind at home and toiled for months together to bring them up. Some time he moved along with children and wife leaving old parent behind at home completely at nobody's mercy. Thus he strives to keep body and soul together. This has endangered his life style. He felt short of assured nutritious food which he used to get from forest in the form of flesh by hunting, fishing, by collection of wild fruits and vegetables etc , resulted in his malnaurishment followed by death of his children. Still the tribal are subjected by this vicious circle. This resulted in high mortality rate of infant and mother . Tribal's children began to go to school due to introduction of elementary school education by Govt despite he faced inhibition with foreign medium of instruction. His dialect not being recognized as medium of instruction in the school made him handicapped from linguistic point of view. The schooling of the tribal children endangered owing to the seasonal migration of tribal parent for in search of livelihood. Forceful migration from hamlet made their life wretched and miserable subjected to various vagaries of malady due to lack of basic amenities. Thus his whole life rotated around the source of livelihood into perpetual uncertainty.
discussions
आदिवासी जीवनशैली आणि शिक्षणाचे महत्त्व -Raju Thokal.
आदिवासी जीवनशैली आणि शिक्षणाचे महत्त्व
“Adivasi is not only a word ; But it’s a culture, community, symbol of identity, hope, dream, reality, origin of being, wisdom, truth but yet invisible for the world……..and simply a lifestyle of tribals”.
-Raju Thokal.
‘आदिवासी‘ या नावावरून भारतात हा समाज फारपुरातन कालापासून राहणारा समाज आहे. डोंगरकुशीत राहिलेल्या या समाजाने इतरसमाजांच्या वाहत्या प्रवाहांपासून स्वतःला दूरच ठेवले. त्यामुळे आधुनिकविकास, साधनसामुग्री, यंत्रे, शिक्षण, आरोग्याच्या सोयी-सुविधा, यांच्याशीत्यांचा संपर्क बरीच वर्षे आलाच नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काहींनीतो जाणीवपूर्वक येवू दिला नाही. तर काहींना आदिवासींचे हेदारिद्र्य….आदिवासीपण म्हणजे आपले भांडवल वाटत होते आणि आजही अपेक्षितअसा बदल याविचारसरणीत झालेला दिसत नाही. याला काही आदिवासी नेते, अधिकारी, विविध क्षेत्रात काम करत असणा-या व्यक्तीसुद्धा अपवाद नाहीत. आपले स्वताचेघर उभारण्यासाठी काहींनी अगदी उघड्या डोळ्यांनी हजारो आदिवासी समाजबांधवांची घरे बरबाद करण्याचे पातक केले. आपला भविष्यकाळ उज्ज्वलकरण्यासाठी काहींनी आदिवासींचा सुवर्णकाळ पायदळी तुडविण्याचे कामकेले…..आजही आपण डोळसपणे आदिवासी समाजाच्या सद्यस्थितीचा विचार केला तरआश्वासक असे चित्र आपण सापडणार नाही. सध्याच्या राजकीय, शैक्षणिकघडामोडींचा विचार केला तर हे चित्र न बदलण्यातच काहींचे हित सामावलेले दिसतआहे. एकंदरीत शासन, धर्मदायी संस्था व इतर समाजाकडूनही आदिवासी समाजदुर्लक्षितच राहिला आहे. तसे नसते तर मग शिवाजी महाराजांच्या गौरवशालीस्वराज्यामध्ये अनेक आदिवासी मावळ्यांचा इतिहास आज आपणास दिसलाअसता….भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये इंग्रजी हुकुमतीला शह देणा-या अनेकआद्य क्रांतिकारकांचा आज इतिहास आपण पुजला असता. परंतु लेखकांपासूनहीआदिवासी वंचितच राहिला. आदिवासींना जरी ‘अस्पृश्य‘ मानलेले नसले तरी पणसामाजिक प्रतिष्ठा मात्र त्यांना मिळालेली नाही.
अहमदनगर, पुणे, ठाणे, नागपूर, मुरबाड, मावळ, नाशिक, नंदुरबार अशा विविध भागातभटकंती करत असताना आदिवासी समाजाच्या जीवनशैलीचा मला अधिकच उलगडा होत गेला.शैक्षणिक कामानिमित्त फिरत असताना अनेक आदिवासी गावांमध्ये आदिवासीपालकांसोबत चर्चा करण्याची संधी मला अनेकदा मिळाली.आदिवासी गावांतीललोकांच्या राहणीमानाचा जवळून आस्वाद घेता आला. फणसासारखी बाहेरून काटेरीदिसणारी माणसे आतून किती गोड असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मी स्वतःजरी आदिवासी असलो, तरी शिक्षणासाठी कायम घरापासून, समाजापासून, गावापासूनदूर होतो. त्यामुळे आदिवासी संस्कृती, जीवनशैली, राहणीमान यांपासून मी काहीप्रमाणात वंचित राहिलो. आज माझ्या भटकंतीच्या छंदामुळे यासर्व बाबी पुन्हाजगण्याची संधी मला मिळाली. तसेच आदिवासी समाजाच्या अडचणी, आव्हाने या बाबीअभ्यासण्याची जाण माझ्या आदिवासी मनाला झाली.
अज्ञान, दारिद्र्य यांनी ग्रासलेल्या, आधुनिक प्रगतीच्या संपर्कापासून आजहीसर्वदूर असलेल्या या आदिवासी पाड्यांपर्यंत आज मेड इन चाईना मोबाईल मात्रमला दिसला. जेमतेम वरण भात, कंदमुळे, रानातली फळे, भाज्या यावर गुजराणकरणा-या असंख्य समाजबांधवांना आपल्या जीवनातील या उणिवांची जाणीवहीनसल्याचे चित्र मला दिसले. उलट आपण जंगलात राहतो याचा पुरेपूर अभिमानकाहींच्या चेह-यावर दिसला, तर काहींनी त्याबाबत खंत व्यक्त केली. परंतु५०-६० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात खूप फरक पडलेला आहे असे काहीजाणकार व्यक्तींच्या मुखातून आशादायक शब्द बाहेर पडलेले मला ऐकायला मिळाले.
प्रत्येकाचाजीवन जगण्याचा आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती अभ्यासण्याचा एक स्वतंत्रदृष्टीकोन असतो. माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून जेव्हा मी आश्रमशाळांच्याभूमिकेचा आजपर्यंतचा अभ्यास करतो, तेव्हा ज्ञानाची दीपज्योत या आदिवासीसमाजापर्यंत पोहचविण्याचे पवित्रच नव्हे तर दैवी काम आश्रमशाळांनी केलेलेआहे. आश्रमशाळांच्या अस्तित्वामुळेच मी शिक्षणाच्या महासागरात आपलीज्ञानाची तहान भागविण्यासाठी उतरू शकलो…काही तरी जीवनाला आकार देवू शकलो.आदिवासी समाजातील व्यक्तींनाही लाजवेल अशी नैपुण्यपूर्ण कामगिरी आमच्यागुरुजनांनी केलेली आहे. याचे प्रत्यंतर या आदिवासी भागात गेल्याशिवाय आपणासयेत नाही.
प्राचीनकालापासून आदिवासींचे वास्तव्य असूनही आज स्वताची शेती वाचविण्यासाठीआदिवासींना सरकार दरबारी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातही स्वताची शेतीअसणारे आदिवासी बांधव बोटावर मोजण्या इतकेच शिल्लक आहेत. ज्यांची जमीन आहे , त्यांचीही २-३ एकर डोंगरावर-खडकाळ माळरानावर. त्यामुळे यातून मिळणा-यातुटपुंज्या उत्पन्नाच्या मदतीने कुटुंब, मुलांचे शिक्षण, आरोग्य, राहणीमानयावर होणा-यासाठी खर्चासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रसंगीमजुरीसाठी इतरत्र स्थलांतर करावे लागते. त्यातही मजुरीसाठी जी कामे मिळतातती सारी प्रासंगिक असतात. त्यामुळे आदिवासींच्या जीवनाला आर्थिक स्थैर्यनाही.
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत आणि शिक्षण व वैद्यकीय सेवाह्या सुसंस्कृत समाजाच्या गरजा आहेत. या सर्व बाबतीत आदिवासींचा फक्तनिवा-याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आपणास दिसतो. फार वस्ती नसलेल्यादूरदूरच्या प्रदेशात या समाजाचे वास्तव्य असल्याने रानातून लाकडे, कारवी, झावळ्या, झाडाची पाने आणून मोकळ्या जमिनीवर झोपड्या उभारण्याचे कामस्वताच्या श्रमावरच आपले घर उभारण्याचे काम केले जाते. पण या कामात व्यस्तअसताना वर्षातील काही महिने उपासमार सहन करण्याची वेळ अनेक कुटुंबांवरयेते. स्त्रीचे अंग जुन्या पण फाटक्या लुगडयाने झाकलेले असते. गरीब घरातीलपुरुषांचीही तीच अवस्था असते. लहान मुले तर उघडी-नागडीच फिरत असतात. झोपडीतडोकावले तर एखादी जुनी वाकळ, बाज, पाण्याची व स्वयंपाकाची जेमतेम भांडीघडवंचीवर ठेवलेली…..एवढेच सामान. त्यात अजून भर असते ती गोधड्यांची.अलीकडे शिकलेल्या, शिक्षक, साहेब, कारकून, शिपाई म्हणून कुठेतरी ‘चाकरी‘ की ‘नोकरी‘ करणा-या लोकांच्या घरात स्टीलची भांडी, ब-यापैकी कपडे, टी.व्ही….., काहींचा गावातील एकमेव दुरून नजरेत भरणारा टुमदार बंगला वत्यासमोर चारचाकी, दोबचाकी वाहने दिसत आहेत. परंतु हे चित्र खूपच कमी आहे.आदिवासी समाजाला या शिक्षित वर्गाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. परंतुखेदाची बाब म्हणजे या नोकरदार मंडळींनीसुद्धा आदिवासी सामाजाकडे पाठफिरविली आहे.
प्राचीन काळापासून आदिवासी समाजावर अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार करण्यात आले आणि आजही हे वेगवेगळ्या स्वरूपात सुरूच आहे. कधी धरणासाठी जमीन पाहिजे म्हणून तर कधी आपली जमीन वनविभागाच्या अंतर्गत येते असे म्हणून भूमिहीन करूनही अनेक अत्याचारांना आदिवासींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणाच्या अभावामुळे त्याविरुद्ध पाहिजे तसा कोणी आवाज उठविला नव्हता; परंतु सध्या कासा, तलासरी याभागात लोकांनी एकत्र येवून अशा प्रकारे अन्यायाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अन्यायाचे अनेक पाठ आपल्या समोर असतानाही सुशिक्षित आदिवासी हे सर्व आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो आणि गप्प बसतो हि सुद्धा खेदाची बाब नव्हे काय?
स्वच्छतेच्या बाबतीत आदिवासींची घरे किंवा झोपड्या शेणाने सारवलेली आपणास दिसतील. शहरी वातावरणापलीकडे कदाचित हे चित्र आज तरी डोळे मोठे करून पाहण्यासारखे आहे. त्यात जर आपण डहाणू परिसरात गेलात आणि एखाद्या घराच्या भिंतीवर वारली चित्रकला दिसली तर या समाजाचा जीवन जगण्याचा निव्वळ स्वच्छंदी नैसर्गिक दृष्टीकोन आपणास दिसेल. घराच्या समोरच मोठे प्रशस्त अंगण अन तेही शेणाने सारवलेले असते. कोठेही घाण दिसणार नाही. परंतु आरोग्याबाबत अज्ञान आणि अंधश्रद्धा दोन्हीही आड येतात. मुलांना खरुज असण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. अगदी शाळांमध्ये जाणा-या विद्यार्थ्यांमध्येही हे प्रमाण आपणास दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे सकस आहाराची उणीव होय. यावर उपाय म्हणून सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. उदाहरणार्थ आदिवासी लोकसंख्या असणा-या भागात आश्रमशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच सकस आहाराची सोय करणे अपेक्षित असते. परंतु आज काळ बदलला, विज्ञानाने प्रगतीची पावले वेगाने धावायला लागली. या प्रमाणात आज ज्या सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे त्या आपणास दिसत नाहीत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून विविध बाबींवर प्रकाश टाकणारे वृत्त नियमित प्रसिद्ध होत असते. त्यातून यातील भयानकता, विदारकता दिसून येते.
आदिवासी समाजात सर्व धार्मिक, सामाजिक, आनंदाच्या, दुखाच्या प्रसंगात दारूला फार महत्त्वाचे स्थान आहे. लग्न असो किंवा गावाचा उरूस असो, महत्त्वाच्या माणसांना दारू पाजणे, झिंगून नाचत राहणे या गोष्टी इतक्या सर्रास आहेत कि त्यामुळे समाजात व्यसनाधीनता फार वाढली आहे. आदिवासींना व्यसनमुक्त करणे हे अतिशय कठीण काम आहे. दारू न पिणारा पुरुष सापडणे फारच कठीण. पण काहीही असो मुला-बाळांचा त्यांना कधी विसर पडत नाही. त्यांना व्यसनांपासून दूर नेण्यासाठी जनजागृतीविषयक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे.
आदिवासी लोकांना जंगलाचे भारी प्रेम आहे. अशी हि सदाफुलीसारखी सदैव हसणारी, फुलणारी आपली माणसं जवळून पाहिली कि अनेकदा मनात विचार येतो, ही गुणी माणसे अशीच का रानावनात कोमेजून जाणार ? त्यांच्या गुणांचा सुगंध बाहेरच्या जगाला कधीच नाही का जाणवणार? त्यांच्या गुणांची पारख, कदर जगाला कधीच नाही का करता येणार? आज या संगणकाच्या युगातही अज्ञानाचा अंधकार पसरलाय….ज्ञानाचा प्रकाश त्यांना केंव्हा दिसणार?
अज्ञानाच्या अंधकारात बुडालेले, मागासलेपणाच्या भोव-यात सापडलेल्या आदिवासी जनतेपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचविण्यासाठी आश्रमशाळांबरोबरच महाविद्यालये, तंत्रनिकेतने, व्यावसायिक शिक्षण संकुले, क्रीडा प्रबोधिनी, व्यायामशाळा, व्यावसाय मार्गदर्शन मंच, स्पर्धा परीक्षा केंद्रे आदि शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. यातूनच आदिवासींच्या उद्याच्या नवनिर्माणाचे भवितव्य घडेल. सक्तीचे व मोफत शिक्षण असूनही ‘झाडांची पाने गळावित तशी शाळेतून लेकरं टपाटपा गळत आहेत’ हे चित्र बदलण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे.
आजचा आदिवासी समाज असंतोषाच्या ज्वालामुखीवरच उभा आहे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची आधुनिक बीजे लावणे अधिक महत्त्वाचे आहे. परंतु जागोजागी आधुनिक शिक्षणसम्राट किंवा शिक्षणमहर्षी यांची आलिशान, अत्याधुनिक साम्राज्ये निर्माण झाली आहेत. यात ब-याच मोठ्या प्रमाणात आजचा विद्यार्थी होरपळून जात निघत आहे. म्हणून इथे आजच्या शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळेत आदिवासींची मुले शिक्षण घेण्यासाठी येत असतील तर त्यांना शिक्षणाचा योग्य न्याय मिळवून देण्याचे काम शिक्षकाने करणे गरजेचे आहे.
आदिवासींमध्ये शैक्षणिक क्रांति हवी असेल तर आवश्यकता आहे शिक्षकांनी जबाबदारी स्वीकारण्याची. केवळ अभ्यासक्रम बदलून क्रांति येणार नाही किंवा मोफत शिक्षण देवूबाही क्रांति होणार नाही, तर शिक्षकांची फक्त हुशार मुलांकडून उत्तरे मिळवून, पान पळटी करून, धडा दुसरा करून, स्वताची समजूत काढण्याची वृत्ती बदलाने आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये असणारा नेतृत्वगुणांचा अभाव, वाढणारी बेशिस्त, गैरहजेरीचे वाढते प्रमाण, अभ्यासाकडे दुर्लक्ष्य करण्याची प्रवृत्ती, वक्तशीरपणाचा अभाव, अनैतीकपणाचा स्वीकार आणि नेमून दिलेले काम पूर्ण करण्याची वृत्ती यांची कारणे शोधून त्यांच्या उपायांवर लक्ष्य केंद्रित केल्यास खरोखर आपल्या शाळांचा दर्जा तर बदलेलच परंतु या ‘आदिवासी वादळा’मुळे भविष्यात समाजाचे होणारे नुकसान टळेल. याकार्यातून मिळणारे समाधानही आपणासच मिळेल. या समाधानासाठी आपणाकडून मला सहकार्याची अपेक्षा करतो.धन्यवाद !!!
राजू ठोकळ
शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती….सह्यभ्रमंती !!!
Tarpa Mahotsav
Dahanu Calling!
Tarpa Mahotsav : To Know more visit https://www.facebook.com/Tarpa.Mahotsav/info
“In the lap of nature,
by the sea sore,
Under the suru trees, your chance to explore
The tribal folk dance, warli art, dancing kites
and cuisine.
Experience the chiko safari, natural
trail and the culture so serene."
Tarpa Mahotsav : To Know more visit https://www.facebook.com/Tarpa.Mahotsav/info
AYUSHonline,
Our activities,
Our programs
Intellectual Property Right
Pride of working with AYUSH for tribal empowerment! Let us do it together!
AYUSH started process it in 2010, now at final stage of registration
Intellectual Property Rights For Tribal Art (Warli Painting)
Warli art, Tribal cultural intellectual
आयुश ने २०१० पासून चालू केलेली नोंदणी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
बौद्धिक संपदा कायद्या नुसार आदिवासी कला (वारली चित्रकला) चे स्वामित्व आदिवासी समाजाला मिळणार
वारली चित्रकला हि आदिवासींची बौद्धिक संपदा आहे
आदिवासी समाजासाठी आयुश सोबत कार्य केल्याचे समाधान! चला आदिवासी एकात्मते कडे
Great News & mile Stone for Tribal Intellectuals!
Congratulations for team who spent their efforts/time/money/ intellectual for this noble cause.
We are sure. This move will create positive & constructive impact for tribal empowerment. Sharing information for your knowledge.
Few things about Intellectual Property Right Registration of Warli Art
§ Activities : We initiated this process early in 2010, After various internal & external activities/workshop/meetings/ study we filled application for IPR rights in 2011. As per official process, it is published in Journal & now at Final stage. (Soon we will Receive it!)
§ Objective : To obtain legal status of Intellectual Property Rights by Tribal Community
§ Vision & Mission :
Maati (Earth) - Preserving Tribal Culture & tradition
Paani (Water) – Skill & competency Development for future trends
Chavul (Rice) – Social Returns to Community & tribal Artisans
§ Long Term Plan : (Tribals Own “Puplic, Private, Community” Partnership initiative)
Maati (Earth) - Warli Art Museum, Research & Development Center, Tribal Art & Culture Education system
Paani (Water) – Warli Art School, Artist Skill Development Center, Tribal Art Gallery
Chavul (Rice) – Social entrepreneurship Development Center, Tribal Art Sale & Service Network
§ Benefits :
- Legal identity for Warli Art & Preserving Community Intellectual Right
- Through Branding & strengthening Network Tribal Artisans will get direct benefits
- To establish as career/employment/ entrepreneurship opportunity to tribal youth for future
- Helpful Preserve and promote Tribal cultural values to next generation
§ IPR registration Initiated by :
- AYUSH | Adivasi Yuva Shakti : Online Group of tribal intellectuals for Tribal empowerment
- Adivasi Yuva Seva Sangh : AYUSH initiative, Registered under Society registration act 1860
- Warli Art Foundation : AYUSH initiative, Tribals own Non Profit Company (Registration in process)
§ Sponsor : (AYUSH Group Individual Voluntary contribution) Not yet sponsored by any Govt/Private Organization
§ Expectations :
- Let us come together to save Tribal Intellectual, Let us do it together!
Million Thanks those who supported directly & indirectly to this noble cause, Our next generations definitely will remember these efforts
Sent for your information. Let us spread positive & constructive awareness for Tribal empowerment. We are doing proudly, Let us do it together!
AYUSHonline team
proudly tribal for Tribals
Adikanya,
Adiyuva,
Connected peoples,
Our activities,
Our culture and festivals,
our peoples,
peoples says
आपल्या सर्वांमध्ये या न त्या रूपाने 'बिरसा' आहेत
आज भगवान बिरसा मुंडा
यांची १३८वि जयंती
सर्व आदिवासी बांधव
दिमाखात साजरे करतील,बिरसा
मुंडा यांच्या महान
कार्याला सलाम करत
अनेक कार्यक्रम आयोजित
करण्यात येतील,भाषणे देण्यात
येतील व दिवसा
अखेर सर्व जन
आपल्या मनात बिरसांना
वंदन करत पुढची
जयंती कशी साजरी
करावी हे ठरवतील
…? करणारच!... का
नाही कारण बिरसा
मुंडा हे नावच
आपल्या समाजासाठी इतके प्रेरणादायी
आहे,मग त्यांची
जयंती आपण नाय
साजरी करणार तर
कोण करणार …?
आज प्रत्येक
आदिवासी तरुण फेसबुक
सारख्या माध्यमातून आपल्या मनात
'भगवान बिरसा मुंडा' यांना
नमन करताना बघून
खूप अभिमान वाटतोय
,आपल्या तरुणात पसरत असलेली
हि जागरुकता खरेच
समाजाच्या दृष्टीने हितावह आहे.
भगवान बिरसा मुंडा
हे आदिवासींच्या अधिकारांसाठी
व स्वाभिमानासाठी लढले
व अमर झाले,मातृभूमीच्या रक्षणासाठी ते झटले.
समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी
शस्त्र हाती घेतले.
आज आपण
स्वतंत्र असूनही गुलामासारखे वागवले
जातोय,हे पाहून
बिरासांनी पुन्हा अवतरावे असे
वाटते,परंतु आपल्या
एक लक्षात येतेय
का कि आपल्यात
'बिरसा' आजही जिवंत
आहेत, त्यांच्या विचारांच्या
रुपात! आदिवासी समाजासाठी खऱ्या
मनाने झटणारा प्रत्येक
जण 'बिरसा'
आहे . आदिवासींसाठी जागृती
करणारा व प्रसंगी
मोर्चे बांधणी करून पोलिसांचा
मार खाणारा,तर
ज्ञान रुपी शस्र
हाती घेवून कायद्याने
आदिवासींसाठी लढणाराही बिरसाच आहे
!
इतकेच काय आपल्या
सर्वांमध्ये या न
त्या रूपाने 'बिरसा'
आहेत फक्त त्यांना
ओळखणे व आपल्यात
लपलेल्या या 'बिरसा'
रुपी विचारांना कृतीत
उतरवण्याची गरज आहे
. केवळ आजच्याच दिवशी नाही,
तर रोजच बिरासांचे
नमन करुयात ,त्यांच्या विचारांचे अवलोकन
रोजच केले तर
ती त्यांना खरी
सलामी असेल.
आपल्या तरुण पिढीला
बाकीचा इतिहास तोंडपाठ असतो
परंतु आपल्या आदिवासी
विरांबद्दल फारशी माहिती नसते,आपण शिकलेल्यांनी
पुढे येवून जर
हा इतिहास पुढे
आणला तर, आपल्या
आदिवासी वीरांच्या महान कार्याला
सलामी ठरेल व येणाऱ्या
पिढीला हा ज्ञानकोश
उपलब्ध करून देउ शकतात
. केवळ बिरसाच नाही तर
असे अनेक क्रांतिवीर
होऊन गेले,जे
आपल्या समाजासाठी झटले ,त्यांचा
इतिहास आपल्याला माहित असणे
गरजेचे आहे.
केवळ आजच्या
दिवशी बिरसांच्या कार्याला
सलामी करण्यापेक्षा बिरसांच्या
विचारांना कृतीत उतरवून त्यांना
रोजच सलामी देउयात.
बिरासांची आज आपल्या
समाजाला खरेच गरज
असताना आपल्यातील प्रत्येक जण
जर 'बिरसा' झाला
तर खरोखरच 'उलगुलान'
होईल! आणि 'आपण
सुरु केलेल्या उलगुलान
चा कधीच अंत
होणार नाही' हा
बिरसांचा विश्वास सार्थकी लागेल.
यासाठी प्रत्येकाने शस्र घेवून
मैदानात उतरणे शक्य नसले,
तरी जे आपणाकडून
शक्य होईल ते
आपल्या समाजासाठी करणे गरजेचे
आहे .
भगवान बिरसा मुंडा
हे आपले नायक
आहेत,आज या
नायकाला त्यांच्या १३८ व्या
जयंती निमित्त नमन
करून आपल्या समाजासाठी
बिरसांसारखे कार्य करण्याचा प्रण
करूयात !
-
संचिता
सातवी
Adikanya,
Adiyuva,
Our activities,
Tribal community
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा
आज आदिवासी वीर बिरसा
मुंडा यांची जयंती आहे. आपणा सर्वांना भगतसिंग,राजगुरू ,चंद्रशेखर आझाद यांचा इतिहास
माहित आहे पण आपल्यापैकी किती जण बिरसा मुंडा यांचा इतिहास जाणतात …?चला आज क्रांतिसूर्य
बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांचा साहसी इतिहास थोडक्यात जाणून घेवूयात !
जन्म _ आदिवासी वीर
बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये सध्याच्या झारखंड राज्याच्या रांची
जिल्ह्यातील अलिहत गावामध्ये एका झोपडीत झाला . त्यांच्या आईचे नाव करमी हातु व वडीलांचे
नाव सुगना मुंडा असे होते .
शिक्षण _ बिरसा लहानपणापासूनच
खूप कुशाग्र बुद्धीचे व चपळ होते . त्यांचे प्राथमिक शिक्षण सलगा या गावातील त्यांच्या
मावशीकडे झाले .पुढे ते मिशनरी शाळेत चाईसाबा येथील जी. सी. एल. मिडल स्कूल मधून त्यांची
उच्च माध्यमिक परीक्षा पास केली . बिरासांना येथेच मिशनऱ्यांच्या दुष्ट्चक्रांबद्दलचा
पहिला अनुभव आला .
मिशनरी आदिवासींचे
शोषण करतात म्हणून त्यांनी मिशनरी शाळा सोडून दिली. आणि त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले
.
विवाह _त्यानंतर १८९
० -१८९४पर्यंत ते बंद्गाव येथेच राहिले ,पुढे त्यांचा विवाह हिराबाई नावाच्या कन्येशी
झाला परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला .
बिरसा मुंडा ते भगवान
बिरसा _ बिरसांना शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य यांची सुद्धा आवड होती .ते उत्तम बासुरी
वाजवायचे, त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला
.ते रानात गुरे चरायला नेत . त्यामुळे निसर्गात उपलब्ध असलेल्या वनऔषधीबद्दल चांगलेच
ज्ञान होते ,ते आजारग्रस्त लोकांना विशिष्ट प्रकारची जडीबुटी देवून त्यांचा आजार बरा
करत असत . म्हणूनच लोक त्यांना 'भगवान बिरसा' म्हणू लागले . एकदा पावसाळ्यात कडाडती
वीज बिरसांवर पडली. परंतु बिरसांना कसलीही इजा झाली नाही, याउलट त्यांच्या आजूबाजूची
झाडे विजेमुळे खाक झाली . या घटनेपासून इंग्रजही आश्चर्यचकित झाले व "बिरसा
god है" असे ते मानू लागले,व तसे त्यांनी नमूदही करून ठेवले आहे .
कार्य _सावकार व ठेकेदारांनी
आदिवासींच्या शोषणाची सीमा पार केली होती . आदिवासी जमिनीचे मूळ मालक असूनही जमीनदार
व सावकार जबरदस्तीने त्या जमिनीवर ताबा मिळवून बसले होते . पण त्याबद्दल चकार शब्दही
न काढण्याचा आदेश इंग्रजांनी दिले होते,परंतु बिरासांना ते सहन झाले नाही बिरासांनी
लोकांमध्ये जागृती करण्यास सुरवात केली ,ते लोकांना म्हणत कि "तुमच्या जमिनी धूळ
वाऱ्यासारख्या उडून गेल्या आहेत,स्वभिमानासोबत तुमचा आत्मविश्वासही संपला आहे,जर तुम्ही
तुमचा आत्मविश्वास परत जागृत नाही केला तर तुम्ही तुमच्या आया बहिणींची अब्रु कशी वाचवाल
…… ?"या वाक्यांचा लोकांच्या मनावर खोल परिणाम झाला . व लोकांमध्ये आत्मविश्वास
जागृत होण्यास सुरवात झाली.
उलगुलान _ सन १८६९मध्ये
वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला,त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली . आदिवासींवर
मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्द बिरासांनी १८९०मध्ये व्यापक क्रांती 'उलगुलान
'ची घोषणा केली . शस्त्रबळ तयार करून शत्रूंना ठार केले .
सन १८७५ मध्ये 'स्वराज्य
हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच !'हि लोकमान्य टिळकांची घोषणा देशभरात
पोचली पण नव्हती ,त्याही आधीपासून बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रजी सत्तेला
आवाहन केले होते हे इतिहासातील खूप मोठे सत्य किती जणांना माहित आहे … ?
बिरसांनी १८९५मध्ये
समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले,जंगल,जमीन संपत्ती हा आमचा अधिकार आहे ,ते
आमच्या उपजीविकेचे साधन आहे ,यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून लढायचे आवाहन केले
. त्यांनी न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतेले. जंगल राज्याची घोषणा करून ते आदिवासींचे
महानायक बनले . यामुळे इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले परंतु त्यांनी आपले कार्य
चालूच ठेवले. बिरसांनी अनेक अनुयायी तयार केले. बिरसा व त्यांच्या अनुयायांनी अन्यायी
सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिली. हि बातमी पोलिसांनी जिल्हाधिकार्याला
कळवताच बिरासांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले . ९ ऑ. १८९५ ला बिरसा व त्यांच्या
वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले. आणि ख्रिस्ती पाद्रींच्या साक्षीवरून त्यांना २ वर्ष
कारावास व ५० रु. दंड ठोठावण्यात आला.
३० नोव्हे. १८९७ रोजी
बिरसा तुरुंगातून बाहेर आले ,त्या वेळी आदिवासी समाजाची केविलवाणी स्थिती बघून ते पेटून
उठले व त्यांनी स्वावलंबन व स्वाभिमानासाठी उलगुलान ची घोषणा केली.
बिरसा हे उत्तम योद्धा
होते.एक कुशल प्रशासक होते. फेब्रु. १८९८मध्ये बिरसांनी आपल्या अनुयायांच्या सोबत डुंबारी
बुरुज या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली, व १८९९मध्ये नाताळचा पहिलाच दिवस हल्ल्याचा
दिवस म्हणून ठरवला. या हल्ल्यामध्ये त्यांनी पोलिस चौकी लुटायचे ठरवले,नाताळच्या रात्री
आपल्या साथीदारांच्या तीन वेगवेगळ्या तुकड्या बनवून वेगवेगळ्या जागेवर हल्ले चढवले.
फादरच्या घरावर हल्ले करून फादर कारवेरी व फादर हाफमान यांच्यावर बाण चालवले.
जाने. १९०० मध्ये रांचीच्या
इंग्रज अधिकाऱ्यांना बिरासांच्या या हल्ल्याची माहिती मिळाली आणि जाने. १९०० मध्ये
११. वाजता इंग्रजांनी डुंबारी बुरुजावर गोळीबार सुरु केला, तेव्हाच बिरासांचे अनुयायी
त्यांच्या नावाचा जयजयकार करत धनुष्यबाण व दगडफेक करत त्यांचा प्रतिकार करण्यास सुरवात
केली. त्यावेळी टेकडीवर २०००पेक्षा जास्त लोकांचा जमाव उपस्थित होता,यात स्त्रिया व
लहान मुलांचाही समावेश होता. या नरसंहारात २००पेक्षा जास्त आदिवासी मारले गेले,व बाकीच्यांना
जबरदस्तीने ख्रिश्ती धर्म स्वीकारण्यात भाग पाडले गेले. हा नरसंहार 'डुंबारी बुरुज
नरसंहार' म्हणून ओळखला जाऊ लागला.
या नरसंहारानंतर ७जाने.
१९००मध्ये पोलिसांनी धरपकड सुरु केली, व पुढे ३फेब्रु. १९००मध्ये बिरसांनी आपल्या ८०
अनुयायांसमवेत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळेस तेथे उपस्थित आदिवासी बांधवांना
बिरासांनी माधारी फिरण्यास व आपल्या अधिकारांसाठी लढण्याचा उपदेश केला.
त्यानंतर वयाच्या केवळ
२५व्या वर्षी तुरुंगवास भोगत असताना कॉलाराने ग्रस्त होवून बिरासांची प्राणज्योत मालवली.
परंतु येथेही इंग्रजांचे कपट दिसून येते,बिरासांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार बिरासांना
तुरुंगात कॉलराच्या औषधाऐवजी विष देण्यात आले होते.
बिरासांना खात्री होती
कि त्यांनी सुरवात केलेल्या उलगुलान नावाच्या वादळाचा कधीच अंत होणार नाही,बिरसा अमर
आहेत व आपल्यासाठी आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहेत .
बिरासंच्या 'उलगुलान'
ला हि बिरसाइतकेच महत्व प्राप्त झाले,उलगुलान मध्ये समाजहीत तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी
लढणे आदि तत्वे समाविष्ट आहेत ,म्हणूनच लोक बिरासांना धरती आबा म्हणून संबोधतात.
आजही या महानव्याक्तीच्या
पवित्र स्मृती झारखंड राज्यात आहेत. झारखंड राज्याने रांची airport व रेल्वे स्थानकाला
'बिरसा मुंडा' हे नाव देवून त्यांच्या महान कार्याला गौरविले आहे.
या महान आदिवासी वीराला
आयुश तर्फे शतशः नमन !जय बिरसा !
शब्दांकन : संचिता
सातवी
संदर्भ : आदिवासी वीर
- जेलसिंग पावरा
discussions
2. Role of Tribal Officials and Employees
Who is to Blame for Tribal Backwardness ?
2. Role of Tribal Officials and Employees
Tribals living in Rajasthan’s Adivasi Upyojana Area have very low representation in government administration in comparison to non-tribals. They have little representation in Rajasthan administrative services. For instance, out of 600 recruitments so far done for tribals in state RAS and RTS, only 15—that is 2.5 percent were recruited from southern Rajasthan, and only 3 tribals have made it to Rajasthan administrative services. The tribals of this region have never made it to the Indian Administrative Services even after 59 years of Independence. In other words, there are only a handful of tribal officials and employees from this region. And most among these work under pressure and fear, and they never participate in various activities conducted for the prevention of excesses and exploitation perpetrated on tribal society. Keeping in mind that they have raise their children, they think they would work for their community after they retire from job. This is how the tribal officials and employees have failed in discharging their duty toward their society. But when they smell an opportunity to become MLA and MP, they are seen running around for tickets, in other words, they want to become politicians but not social workers.
These officials and employees have little interaction with their community members. Most of them have become city dwellers, and they never encourage their children to participate in social and religious activities of their community. In other words, they fail to discharge their responsibility toward their community. The tribal officials and employees posted in this area have to face immense pressure from their political masters and have to work under fear as they are transferred by the politicians to serve their party interests and personal ambitions. This fear keeps them from participating in social development activities. They are thus unable to bring awareness among their fellow tribesmen and set an example before the youth. They only bid their time while waiting to complete their service period. But when they retire it is too late as they are unable to contribute anything substantial toward their community.
Subscribe to:
Posts (Atom)