आदिवासींच्या विकासातील प्रगत आदिवासींची भूमिका


आदिवासींच्या विकासातील प्रगत आदिवासींची भूमिका

जंगलातील फळे, फुले, कंदमुळे आणि शिकार यावर आपली उपजीविका भागवणारा आदिवासी समाज काही प्रमाणात चाकोरीच्या बाहेर जाऊन आपले जीवन जगू लागला आहे.त्याचेच एक उदाहरण म्हणजे आज आदिवासी समाज आणि संस्कृतीचे दर्शन जगाला करून देण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. अनेक पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे, इत्यादींमधून अनेकवेळा वेगवेगळे लेख, कविता छापून येतात. त्यातच भर म्हणजे फेसबुकवर सुद्धा आदिवासी संस्कृतीशी निगडीत अनेक ग्रुप आहेत.

देशाच्या एकूण लोकसंखेच्या ८.२ % असलेला हा आदिवासी समाज एका संपन्न लोकपरंपरेचा एक भाग आहे. परंतु इंग्रजांच्या आगमनानंतर आदिवासी जमातींच्या स्वायत्त, संपन्न आणि स्वच्छंद जगण्यावर अनेक बंधने आली. स्वातंत्र्यानंतर गोर्या साहेबांच्या जागी आलेल्या देशी साहेबांनीसुद्धा आदिवासिंचे जगणे असह्य केले. परिणामी आज १० कोटींहून अधिक असलेले आदिवासी आपले स्वत्व हरवून बसले आहेत.

आधुनिकीकारानाच्या, प्रगतीच्या आणि जागतीकरनाच्या नावाखाली आजचा समाज आदिवासिंचा मूळ धर्म, संस्कृती, कला, नृत्य, वाद्य, औषधोपचार अशा सर्व मौलिक गोष्टींचा त्याग करत आहोत. मूळ आदिवासींना प्रगतीचा पुढचा टप्पा म्हणजे पांढरपेशा वर्गासारखे जीवन जगणे असे वाटते, तर अन्य समाजाला या हरवत चाललेल्या आदिवासिपणाची पर्वा नाही असे चित्र आज देशातील सर्वच आदिवासीबहुल भागात दिसतेय. देशभर विखुरलेल्या आदिवासी जमातींमध्ये होत असलेल्या या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचे परिणाम भयंकर आहेत.

आदिवासींचा विकास करताना त्यांचे आदिवासीपण जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अन्यथा न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, व अमेरिकेतील आदिवासी जसे म्युझियममध्येच पाहायला मिळतात, तशी अवस्था आपल्याकडेही होईल कि काय अशी भीती वाटते.

आज प्रगत आदिवासी बांधवांनी आपल्या आदिवासी लोकांना प्रेम, सम्मान, सहानुभूती, शिक्षण, मार्गदर्शन दिले केले पाहिजे. या आपल्या समाज बांधवांना आपले प्रेम, सम्मान, सहानुभूती, शिक्षण, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. जर आपण त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले तर ते खूपच आनंदी होतील. जर अशी मानाशिकाता देशातील १० करोड आदिवासींची निर्माण झाली तर हजारो वर्षापूर्वीचा सुवर्णकाळ पुन्हा यायला उशीर होणार नाही.

Warli Art Foundation - Artist Registration


आदिवासी वारली चित्रकला । चित्रकार नोंदणी अर्ज

आदिवासी संस्कृती आणि परंपरा आपली ओळख आहे, आजही जागा पुढे आदर्श आहे. आपली ओळख टिकवून आदिवासी चित्रकलेचा जगाच्या पाठीवर प्रसार करण्याकरिता आदिवासी समाजातूनच प्रयत्न झाले पाहिजेत, त्यासाठी आपण आदिवासी समाजातील एकात्मता आणि एकता वाढवून प्रयत्न करूयात. आदिवासी समाजाला आणि आदिवासी कलाकारांना मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा या साठी एकत्रित प्रयत्न करूयात. संपर्कात या

Please submit online form at : http://www.warli.in/2013/01/warli-art-foundation.html

Tribal Youth Leadership Program - 2013


आदिवासी समाजाच्या एकात्मतेसाठी, युवा पिढीत आणि आदिवासी समाजाचे नेतृत्व घडविण्यासाठी एक लहानसा प्रयत्न, आपले अभिप्राय आणि सूचना अपेक्षित आहेत 
गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी पण आपण कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत. 

रूपरेषा : 
  • दिवस : 3 दिवस निवासी कार्यक्रम 
  • ठिकाण : डहाणू तालुका 
  • अपेक्षित : आदिवासी युवक आणि युवती  

विषय: 
१) आदिवासी समज पुढील समस्या 
२) आदिवासी समाजाचे नेतृत्व 
३) आदिवासी समाजाचे वैभव व समृद्ध परंपरा 
४) आदिवासी विकासातील दिपस्थंभ 
५) आदिवासी विकासाच्या उपाय योजना 
६) आदिवासी समाजाचे भविष्य आणि आदिवासी नेतृत्व 

सदराचा कायर्क्रम आपण आपल्या परिसरात पण अयॊजित करावा अशी अपेक्षा आहे, जेणे करून आदिवासी समाज संघटीत करण्यास हातभार लागेल.

Few details about program :
All participants, please register yourself at www.event.adiyuva.in

#Name : AYUSH | Tribal Youth Leadership Program 2013 
#Date : 18/05/2013 ~ 20/05/2013 
#Event Type : 3 Days Residential Program (3days + 2 Nights) 
#Venue : Kasa, Taluka Dahanu, Dist Thane, Maharashtra
# Mode Of Instruction : Marathi, Local Tribal Language, (English & Hindi Documentaries)
# Participants : Male + Female (Max. 50)
# Registration : www.event.adiyuva.in  (or sms to 09246 361 249)
# Sponsorship : Top 30 Participants will be Sponsored (If Approved)
# FB Event page : https://www.facebook.com/events/466141423457187/?context=create
#Note : Please invite your friends to Participate in this event 


Who is to Blame for Tribal Backwardness ?

India has been home to tribals since time immemorial, and they are naturally considered the original inhabitants of India. Their rich history and culture have provided tribes such as Santhal, Munda, Bhil, Meena, Ho Gond and others a distinct identity at the national and international level. The tribal areas of Rajasthan have been home to many tribes such as Bhil, Meena, Bhil-Meena, Damor and Garasia since ancient times. The tribes of Rajasthan have a history full of splendour and valor, and are thus famous for it. The tribal kings established their own kingdoms across the Rajputana. For instance, Dungaria Bhil had Dungarpur, Bansia (Vishna) Bhil had Banswara. Kotia Bhil had Kota, Jetasi Bhil had Abu as their kingdoms, which now constitute districts along these names in modern Rajasthan. Besides, Maharana Pratap, the great Rajputana warrior, had a Bhil warrior as his commander-in-chief, who is still revered by one and all.

However, the tribal people have been victim of social, economic and religious discrimination and exploitation notwithstanding their rich history. They have been deprived of education, have been socially looked down upon and rejected, have been made to serve as bonded labour: a fact that has been time and again accepted, officially and unofficially, by politicians, social workers and scholars alike. Jansatta, a Hindi daily, in a news report headlined, “Kendra Anusuchit Jaati-Janjaati ke Liye Vishesh Tantra aur Kanoon Banane ke Paksh Mein” (Centre in Favour of Framing a Special System and Law for Scheduled Castes and Tribes), quoted Union Social Welfare and Empowerment Minister Meera Kumar as saying that more than 16 crore people in India still suffer from the scourge of untouchability. According to Union Home Minister Shivraj Patil, the scheduled castes and tribes are discriminated against even after six decades of India’s independence and affirmative action is needed to change this. In a similar vein, Union Law Minister Hansraj Bharadwaj has maintained that the victims of excesses are paid only lip service. The law minister further said that the discrimination against scheduled castes and tribes should be stemmed at the grassroots level and unless we as a nation change our thinking, these excesses will continue.

Usually, non-tribals are held responsible for the backwardness, excesses on and exploitation of tribals. There is some truth to this generalization. But then are the non-tribals only to be blamed for tribal backwardness? Actually, if anybody has to be blamed for tribal backwardness it has to be tribals only. The facts speak for themselves. Take for instance the tribal subplan area of Rajasthan. As the sarpanch, pradhan, district board chairman, all are in most of the cases tribals of this area, so are the MLA, MP and tribal minister who invariably belong to this area. This only shows that they are well represented in governing and legislative bodies, and with a population of about 35 lakh they are not few in numbers. Yet, the common tribal is still struggling to make both ends meet even after 59 years of Independence, and only the tribal politicians, leaders, officials and employees and the youth can be blamed for the backwardness of the tribal society as they together have failed to discharge their responsibility toward their own community. Here, we will explore all this one by one.


Dr Lalit Latta Joshua
Senior Research Officer,
Institute Of Applied Manpower Research ( Planning Commission, Govt. of India ) Plot No. 25, Sector A-7, Institutional Area, Narela, Delhi-110040.

The views expressed in this paper are of the author and not of the institute in which he is employed.

Author @ Google

AYUSH picnic cum get together @ Bhim Bandh, Waghadi


आयुश पिकनिक कम गेट टुगेदर, भीम बांध, वाघाडी
दिनांक :११/११/२०१२, रविवार
वेळ : सकाळी .३० ते सायंकाळी .००
ठिकाण : भीम बांध, सुर्या नदी, वाघाडी, तालुका डहाणू, जिल्हा ठाणे
एकत्र येण्याचे ठिकाण : वाघाडी थांबा, १० वाजे नंतर पर्यंत कधीही भीम बंध येथे यावे
सहभागी होण्या साठी अर्ज जमा करा : www.picnic.adiyuva.in
वनभोजन कार्यक्रमाचा नकाशा : http://goo.gl/maps/J73VT

कार्यक्रमाची रूपरेषा :
) वाट सुर्या नदीची : ("पाऊले आदिवासी एकात्मतेकडे")
वाघाडी स्थानका पासून भीम बांधाची पायी वाट, आणि भटकंती (अंदाजे 0. किमी)
पर्याय - भटकंती इच्छुकांसाठी कासा वरोती पूल ते नदी लगत पायी (अंदाजे किमी )
) चर्चा आणि अनुभव देवाण घेवाण : (तंत्रज्ञानाचा उपयोग समाजुपयोगी बनविण्याचे संस्कार करूयात)
) वैयक्तिक ओळख आणि परिचय
) सामाजिक कार्याबद्दल अनुभव कथन
) आदिवासी समाजा पुढील समस्या
) आदिवासी विकासाची दिशा
) आयुश रूप रेषा आणि विचार
) आयेचा चुल्हा, वनभोजन : (पदार्थ बनवताना असलेली मायेची तुलना चव किवा विटामिन सोबत करू नये)
सहभागींनी स्वतः नदीकाठी बनवलेले जेवण नदीच्या काठावर सहभोजन शतपावली
जेवण : सर्वांनी सहभागी होवून स्वयंपाक बनवणे
फराळ : किवा तत्सम पदार्थ आणणे उत्तम (जवळ दुकाने नाहीत, कासा किमी)
) निरोप : अभिप्राय, भविष्यातील कार्यक्रम, निरोप
वर्गणी : निशुल्क (स्वेछेने आयुश संचय मध्ये जमा करू शकता, ऑनलाईन ट्रान्स्फर )

Save Land Save tribal | लेका, मला विकू नको !


पैशासाठी जमीन विकणाऱ्या आपल्या शेतकरी लेकाला जमीन विकू नको असे आर्जव करतेय धरणीमाता तिच्याच तोंडून . सकाळी उठले तर सूर्याच्या कोवळी किरणे माझ्या लांबलचक पसरलेल्या हिरव्यागार शरीराला सोनेरी अंघोळ घालत होती. आज मी फार खुश आहे .आज माझ्या लांबलचक शरीरावर पसरलेल्या शरीरावर भाताची पिकलेली सोनेरी कणसे कशी मस्त वाऱ्यावर डुलत होती .आज त्यांचा इथे शेवटचा दिवस आहे आज त्यांना कापून माझ्या लेकाच्या म्हणजे इथल्या मालकाच्या घरी नेणार . माझा लेक पण आज खूप खुश होता ...येयीलच इतक्यात ! .........तो काय आला ...अरे पण हे काय.... त्याच्या सोबतची ती सुटाबुटा ताली माणसे कोण अन ती माझ्या लेकासोबत काय करताहेत ?.....अरे हा तर गावचा तलाठी अन हा सर्कल अन ती दुसरी मोठ्या गाडीतून उतरलेली माणसे कोण ? अंनि हा तलाठी माझी मोजणी करून कागदावर काय लिहतोय ...? मला त्यांच्या बोलणे ऐकू आले ....तो मोठा साहेब तलाठ्याला म्हणाला," ३० ला फायनल करून टाका .असेही हि जागा फार कामाची नाय मिळत "म्हणजे मला हा मोठा साहेब विकत घेणार कि काय ...? माझा लेक पण फार खुश दिसतोय .....मोठ्या सायबाने माझ्या लेकालाठरल्याप्रमाणे नोटांची काही बंडले दिली ती मंडळी निघून गेली ..

माझ्या डोळ्यात पाणी आले ज्या लेकाची त्याच्या कुटुंबाचीमागच्या तीन पिढ्यांपासून मी माय बनून सेवा केली त्याने आज मला एका मोठ्यासायबाला कवडी मोलात विकून टाकलेमी प्रत्येक वेळी ज्याची पोटाची आग विझवली ....तुमची पोरेबाळे उपाशी राहू नयेत म्हणून मी उन पाऊस झेलून अन्न पिकवते तोच माझा लेक आज मला कसायाच्या हातात सोपवून चाललाय. का ...? कारण मी जुनाट झाले म्हणून कि माझी पिक उगवण्याची क्षमता कमीझाली म्हणून...?म्हातारे झाल्यावर आपल्या आयीला असे कुणी टाकून देते का ..!
तुझे बंधुभगिनी तुझ्या कामात आले नसतील तेव्हडी मी तुझ्या कामात आले हे कसे विसरलास ....तुझे आजोबा, तुझे बाबा, तू आता तुझी मुले माझ्या बांधावरच खेळून मोठी झाली .नांगरणी करून थकल्यावर तू याच बांधावर विसावा घेतलास ,,,बाप मेल्यावर हि इथेच डोळ्यातली टिपे गळून तुझे दुख हलके केलेस आज मी तुला भर कशी झालीलेका ,ऐक माझं मला त्या सायबाला विकू नकोस तुला कितीही मोठ संकट आले तरी मी तुझी साथ देयीन ...पण तो मोठा साहेब तुला फसवून तुझ्याकडून मला चण्याफुटण्याच्या भावात विकत घेवून कोटी रुपयाला दुसऱ्याला विकेल नाहीतर उंच उंच बंगले बांधील नाहीतर कारखाने बांधून रसायनाने माझे हिरवेगार शरीर भाजून टाकेल....तुला तुझ्या धरतरी आयीची अशी दुर्दशा पाहवेल का रे ...? मग कुठे पाहशील हिरवीगार झाडे हिरवेगार भात तुझ्याघरात पसाभर भात तरी कुठून येणार ...? त्या मोठ्या साहेबाने दिलेल्या पैशातून ...? ते पैसे हि तू दारू पिवून संपवून  टाकलेस तर तुझ्या हाती काय नाय राहणार ..? पैसे काय दोन दिवसांचा सोबती पण मी आयुष्यभर सोबत देयीन .जशी तुझ्या वाडवडिलांची दिली होती .

तुझ्या वाड वडिलांनी मला आयीसारखे वागवले म्हणून मी हि त्यांची सेवा केली आजवर तुझी हि सेवा करत आली पण आज तू फक्त काही पैशांसाठी मला विकून टाकलेस ...? का कारण तुझ्या मुलांचे शिक्षणाचे कर्ज फेडायचे म्हणून कि ,तुला नवीन घर बांधायचं म्हणून ! मुलीचं लग्न करायचेय कि शेती सोडून दुकान टाकायचे म्हणून ...कि मित्रासारखी दारू पिवून ऐशोआराम करायचं म्हणून ...का...?
लेका तुझी खरी संपत्ती तर मीच आहे जी दुसऱ्या कुणाला लुबाडू देवू नकोस भरपूर मेहनत करून ,सेंद्रिय  शेतीचा वापर करून विविध पिके घे म्हणजेतुला पैशाची नाद भासणार नाही कारण ती पिके तू बाजारात पण विकू शकतोस . तरीही जर खरोखरच गरज असेल तर मला तारण ठेवून कर्ज घे ते फेडून पुन्हा मला सोडव पण कायमची विकू नकोस मला .मला विकून आलेले पैसे दोन दिवसात संपतील ,मग तुझ्या घरात कणगी भर भात .लाकूड फाटा ,भाजीपाला षाधी वनस्पती तू कुठून आणणार ते विकत आणायला तू पैसे कुठून आणणार ?तुझी धरतरी माय आहे तोवर सर्व काही आहे नाय तर काही नाय .
म्हणून सांगते ऐक माझे ......

आदिकन्या | संचिता सातवी 
Author @ Google

Save Land! Save Tribals ! कुणी जमीन देतेय का जमीन ? " आवाज तलासरीच्या डोंगारीतून

तलासरी येथे घडलेल्या घटनेने सर्व आदिवासींचे चित्त तर खवळलेच, पण या अघोरी कृत्य करणाऱ्यांना 'माणूस' म्हणावे का हा हि एक प्रश्नच उभा राहिला आहे. आज आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून हुसकावून लावण्यात येत आहे. पिढ्या न पिढ्या ज्या जमिनी त्यांनी कसल्या त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या जमिनी फक्त एक भू भागाचा तुकडा नाही, जो कुणीही हिसकावून घ्यावा, हि जमीन म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेले संस्कार आहेत, जे पिढ्या न पिढ्या त्यांनी जपले आहेत. ते अशे सातबाऱ्यावर कसे मोजता येणार? 

कनसरी मातेवर बुलडोझर फिरवून फक्त आदिवासींच्या भाताचेच नुकसान नाही केलेय तर त्यांच्या भावनांचा खेळ करून, त्यांच्या संस्कृतीवर पण घाला घातलाय. अन आदिवासी संस्कृतीवर घाला म्हणजे आदिवासी समाज अस्मितेवर केलेला आघात आहे !

धरतीला पाय लावण्या पूर्वी "अथ नाचू का कोठ नाचू, धरतरी माझी माय रं, पाय कसा लावू तील ?" असे म्हणणारा तसेच जमिनीतून पिकवलेल्या अन्नाला जीव पेक्षा जास्त जपणाऱ्या आदिवासींच्या भातावर जेव्हा बुलडोजर फिरवला जातो तेव्हा तो त्याच्या हृदयावर फिरवला जातो. कारण तुमच्या साठी फक्त हे धान्य असेल, ज्याची किंमत पैशात मोजली जाते. पण आदिवासींसाठी ती कनसरी माता आहे, आणि मातेची किंमत पैशात करणाऱ्या सारखा दुसरा पांखंडी कुणी नाही. कनसरी मातेची पूजा केल्या शिवाय तिचा घास हि न घेणारा आदिवासी जेव्हा तिच्यावर बुलडोजर फिरताना पाहतो, तेव्हा त्याच्या हृदयावर तलवार नाही फिरली तर तो आदिवासी काय?

सकाळी सकाळी शेतात दिमाखाने नाचणारी कनसरी माता चिखलात तुडवली जात असेल तर हवालदिल आदिवासी च्या डोळ्यात अश्रूंचा अंगार येतो आणि त्याच्या पायाची आग मस्तकात जाते. पण मोठ्या शक्तींकडून ती आग बुल्डोजारच्या चाकाखाली शमविली जाते. किती दिवस आदिवासी असा हवालदिल होत राहणार? कधी प्रकल्पाच्या नावावर... कधी शहरीकरनाच्या निमित्ताने, तर कधी धरणे आणि पुनर्वसनाच्या निमित्ताने (सुसरी धरण, दापचरी प्रकल्प, सूर्या प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग ८ चौपदरीकरण, गेल वायू पायीप लयीन, ओएनगीसी डहाणू मध्ये २००० एकर, मुंबईतले अंधेरी, गोरेगाव, बोरीवली .... आसामचे बोडो, बस्तर चे दंतेवाडा, ओडीशाचे वेदांता, ...) आता फक्त देश सोडून जाणे तेव्हडे बाकी राहिलेय (ते पण पालघर मध्ये गेल्या वर्षी काही पाश्चिमात्य शक्तींनी चालू केले होते, म्हणे इझ्रायीलला नेणार होते) 

प्रत्येक दिवस आदिवासी हा अन्याय सहन करतोय, का म्हणून सहन करायचे आदिवासींनी हे अन्याय? आदिवासींच्या प्रश्नांचे भांडवल करून त्यांना मदत (?) करणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही. आज "अमका" एक साहेब आला त्याने कपडे दिले तर "तमक्याने" ब्लंकेट अन खावू दिले, या अन अशा अनेक बातम्या ऐकिवात येतात. पण आदिवासींना दयेची भिक नकोय ते मुळातच निसर्ग संपन्न भागाचे मालक आहेत. खायला नाही म्हणून खाद्य पदार्थ आणि पांघरायला ब्लंकेट देण्या पेक्षा, निसर्गाचे वैभव ज्यांच्या अंगणात नांदत होते, त्या आदिवासीवर हि लाचारी का आली याचा शोध घेतला आणि उपाय योजना केल्या तर नक्कीच आदिवासी पूर्वी सारखे संपन्न आणि स्वावलंबी आयुष्य जगू शकेल, जखमेवर तात्पुरते मलम लावण्या पेक्षा 'जखम का झाली' याचा शोध घेतल्यास खऱ्या अर्थाने विकासास हातभार लागेल. विकासाच्या नावावर त्यांना लाचार बनवन्या पेक्षा त्यांना सक्षम बनवले तर ते जास्त हितावह ठरेल. 

विकासाच्या नावाखाली धर्मांतर सारखे पर्याय सुचवले जाताहेत, अन धर्मांतरवर काही बोलल्यास सुशिक्षितांचे (कि अर्धशिक्षित ?) प्रश्न तयारच असतात,"कि म्हणे संविधानाने प्रत्येकालाच कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे, मग तुम्ही विरोध का करता?" धर्मांतराला आमचा विरोध नाही. ज्याने त्याने आपली आदिवासी संस्कृती जपत आपल्या मर्जीने धर्माचे अवलंबन करावे. पण असे स्पष्टीकरण देणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे, कि संविधानात धर्मांतराचा अधिकार पाळत असताना आदिवासींचा जमिनीचा हक्क बाधित ठेवण्याचा अधिकार का पळत नाही? कारण संविधान म्हणते कि, 'आपला अधिकार वापरत असताना दुसऱ्याच्या अधिकारास तुम्ही बाधा पोचत असेल, तर ती राज्यघटनेची पायमल्ली आहे. मग आज किती तरी एकर आदिवासींची जमीन त्यांना फसवून , त्यांच्या अज्ञानाच फायदा घेऊन प्रसंगी लुबाडून बिगरआदिवासींच्या ताब्यात आहेत, तेंव्हा मग इथे कुठे जातो कायदा न संविधान? कि असला काही अधिकार संविधानात आहे हे अशा सुशिक्षितांना (कि अर्धशिक्षित?) माहीतच नाही...? आज किती तरी आदिवासींना स्वतःच्या जमिनीवर गडी म्हणून राबवून घेतले जात आहेत. बस्तर मध्ये तर लाखोंचे स्थलांतर झाले, लाखोंना नक्षलवादाच्या मार्गाला लावले आणि हजारोंचे बळी घेतले गेले, तेव्हा कुठे गेले संविधान? मग इथे का कुणी संविधानात दिलेल्या अधिकाराची भाषा बोलत? ‘देव देतो अन कर्म नेते म्हणतात ना, तसे संविधानाने दिले अन समाज कंटा कानी नेले' असे झालेय !

गगनचुंबी इमारती मध्ये राहण्याराना न चकचकीत भांडया मध्ये चमचमीत पदार्थ हासडून खाणाऱ्याना काय कळणार कनसरीचे मूल्य? एक वेळचे जेवण मिळत नाही म्हणून कळकट बशीतून दुपारचे जेवण घोटभर चहावर भागावनाऱ्याला कळते कनसरीची किंमत! एकीकडे प्रतिष्टेच्या नावावर आपल्या मुलांवर लाखो खर्च केले जातात तर दुसरी कडे, एक रुपयाच्या नाण्यासाठी रडून रडून कोमेजलेल्या मुलाला समजावताना अन पोर ऐकत नाही म्हणून काळजाला गाठ मारून पोराला बदड बदड बदडवाऱ्या हवालदिल मातेला पहिले कि, तेंव्हा खरेच चीड येते तुमच्या श्रीमंतीची! 

श्रीमंत होणे हा गुन्हा नाही पण इतरांवर अन्याय करून श्रीमंत होणे हा खरोखरच मोठा मानवी अपराध आहे. कारण इथे माणूसकिचाच अंत होतो! अशा वेळी काही दीड शहाणे असा हि प्रश्न करतात कि "तुम्हाला कुणी अडवलय...? तुम्ही हि कमवा पैसे" अन आदिवासींच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्न करतात, तेव्हा अशांचा राग न येता कीवच येते, अरे ज्या काळात आयुर्वेदाचा, धनुर्विद्येचा, धातुशात्र, तसेच इत्तर शस्त्रांचा गंध हि नव्हता त्या काळात आदिवासी या विद्या मध्ये पारंगत होता, या अन अशा किती तरी गोष्टी त्याने बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवल्या होत्या. पणआज आदिवासींच्या आत्मविश्वासावरच घाला घातला जातोय, एका धक्यातून सावरत नाही तोच दुसरा! 'आज नवीन कायदा, उद्या जमिनीवर धरण बांधणार, उद्या नवीन प्रकल्प अन पुनर्वसन होणार,'हे अन असे अनेक आघात ! मग मनोधेर्य खचलेला आदिवासी फक्त जगण्या साठी हि लढावे. धडपडावे लागते . संपत्ती मिळवणे तर राहिलेच, पण त्यांची जंगल अन जमीन संपत्ती पण समाज कंटाकांच्या घशात जाते . 

काय विसंगती आहे हि नाही , आपले सरकार कसाब सारख्या नाराधामावर करोडो रुपये खर्च करू शकते ,परदेशीयांना आश्रय देवू शकते. पण आदिवासींचे प्रश्न सोडवणे तर दूरच....पण ते जग जाहीर करायलाही यांची हिम्मत होत नाही. कारण काय तर परकीयांना थारा दिल्यास मतांमध्ये भर पडेल, पण आदिवासींना अभय दिल्यास ते निर्भय होवून परीस्थितीचा सामना करतील, अन मग काय... त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी बिल्डरच्या घश्यात घालणे तर दूरच पण त्यांच्या विकास साठी मिळणारे (?) प्याकेजचा पण हिशोब द्यावा लागेल. मग यात त्यांचे नुकसानच नाय का? ! 

खरच नटसम्राट या प्रसिद्ध नाटकातील डॉ. श्री राम लागुंचे सवांद आठवतात " कुणी घर देते का घर" एके काळच्या नटसम्राटाच्या तोंडचे हे केविलवाणे संवाद! उत्तम नाट्य रचना अन अप्रतिम अभिनयाची सांगड हे या नाटकाचे वैशिष्ट्य!! आज अशीच काहीशी आदिवासींची अवस्था झालीय. लाख मोलाच्या जमिनीचा मालक असूनही आज कुणी" जमीन देते का..... जमीन....?" असे म्हणायची वेळ आली आहे त्याच्यावर! (तलासरी काही वर्षा पूर्वी हा तालुका ९५ % आदिवासी लोकसंख्या असलेला होता)

स्वतःच्या फायद्यासाठी आदिवासींच्या भावनाशी खेळणे हि माणुसकी आहे ?..... कनसरी मातेवर बुलडोजर फिरवणारी माणसेच होती कि पशु ?.... या प्रकाराला जर माणुसकीच्या नजरेतून पहिले तर माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे, हे अन अशा मानवी रूपातल्या पशूंना क्षमा नाही, मग तो कोणत्याही जाती धर्माचा अगदी आदिवासी असला तरी त्याला माफ करणे अशक्य!

आदिवासी समाजाने संघटीत होवून अशा परिस्तितीशी सामना कार्याची तयारी ठेवावी, आपली संस्कृती परंपरा आणि अस्मिता याचे जतन करावे. आदिवासी तरुणांना समाजीक जाणीव आणि जबाबदारीची जाणीव करून देणे महत्वाचे आहे. आपल्या समाजात जागरुकता करणे हे आपले कर्तव्य समजून आपण जागरुकता करण्या साठी प्रयत्न केले पाहिजेत. झोपले असाल तर जागे व्हा नाही तर तो वेळ फार लांब नाही जेव्हा बुलडोजरच्या चाका खाली असेल आदिवासी आणि त्याची अस्मिता

- आदिकन्या | संचिता सातवी (28 Aug 2012)

Read Live updates at : https://www.facebook.com/media/set/?set=a.515662081792867.138081.100000472403313&type=1
Author @ Google

Proposed Career Guidance Program (Seeking Support)

Find us on Facebook

Reach us Google +

Dahanu Mahalaxmi Yatra

AYUSH @ google group

AYUSH google group

AYUSH google group