Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

-आयुष मंच

आयुष हे आपल्या गवा कडील उच्च शिक्षित तरुण एकत्र येवून बनवलेले एक व्यास पीठ आहे, आज आपण बघतोय स्पर्धेचे युग, आपण तर टिकलो आहोत पण आणखीन किती तरी लोक आपल्या सारखे जीवन मिळावे या साठी तरसले आहेत, काही मार्गदर्शना अभावी तर काही परीस्तीती अभावी. इथे आपल्या भागातील आदिवासी सुशिक्षित तरुनाना एकत्र आणायचे आहे, जेने करून जरी अपन दूर वर असलो तरी तान्त्रद्नानाच्या मदतीने आपण संपर्कात रहू शकुत, आपले विचार एक मेकाना कळवू शकुत, जेणे करून आपण एक मेकांना सहकार्य करू शकतो, आपल्या समाजाची एकता टिकवून त्यांच्या सहकार्याने आपल्या समाजातील गरजुना मदत करने हा उद्देश आहे. साध्य आपण ठाणे ग्रामीण भागावर लक्श केन्द्रित करत आहोत, त्यात डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगढ, पालघर हे तालुके प्रामुख्याने आहेत, जसे जसे अपल्याना सहकार्य मिळेल तसे अपन आपल्या समजत पसरत जावुयात.
जर हे विचार आपल्यांना पटत असतील जर जरूर आपल्या लोकांना जोडायला मदत करा.
लक्षात असुदेत आपल्यांना समाज तोडायचा नाहीये, पण आदिवासी समाज एकत्र आणून ईत्तर समजा सोबत स्पर्धेत टिकेल असा बनवायचा आहे.

आशा करतो आपण साथ द्याल

-आयुष मंच

Find us on Facebook