Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

आदिवासी बांधव आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही !

धनगर समाजाचा विकास होवू नये असे एक आदिवासी म्हणून मी नक्कीच म्हणणार नाही. कोणताही आदिवासी इतका स्वार्थी विचार कधीच मांडणार नाही. परंतु आदिवासिंच्या ताटातिल काढून त्यांच्या ताटात टाकने म्हणजे आदिवासिंवर उघड उघड केलेला अन्याय आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र तरतुदी कराव्यात... त्यासाठी आदिवासिंच्या तोंडाला पाने पुसण्याचे क्रूर राजकारण खेळु नये....

अन्यथा तमाम आदिवासी बांधव आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही !



---------------------------------------------------

राजू गाईड

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत. राजकारणात सत्तेसाठी ते असा राजकीय डाव खेळत आहेत. ज्या आदिवासी समाजाने यांना आजपर्यन्त एकहाती सत्ता मिळविण्यात हातभार लावला, त्या आदिवासी समाजाच्या सोयी-सवलतींवर इतरांचा अतिरिक्त भार टाकू पाहत आहेत. 

धनगर समाजाचा विकास होवू नये असे एक आदिवासी म्हणून मी नक्कीच म्हणणार नाही. कोणताही आदिवासी इतका स्वार्थी विचार कधीच मांडणार नाही. परंतु आदिवासिंच्या ताटातिल काढून त्यांच्या ताटात टाकने म्हणजे आदिवासिंवर उघड उघड केलेला अन्याय आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र तरतुदी कराव्यात... त्यासाठी आदिवासिंच्या तोंडाला पाने पुसण्याचे क्रूर राजकारण खेळु नये....अन्यथा तमाम आदिवासी बांधव आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

पवारांना कदाचित आदिवासींचा क्रांतिकारी इतिहास माहीत नसावा. बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या मामा आदि आदिवासी विरांचे विचार आजही आमच्या रक्तात जिवंत आहेत. त्या रक्ताला आपण उगाच आपल्या स्वार्थी नितिमत्तेने पेटवू नका.....नाही तर उद्या रक्ताची होळी आम्ही खेळु शकतो हे आपणास उघड्या डोळ्यांनी बघावे लागेल.

आपल्या पराभवाची कारणे आपण स्वता अंतर्मुख होवून शोधावित. जर आपण प्रामाणिकपणे सामान्य जनतेची सेवा केली असेल तर त्याचे उत्तर नक्की सापडेल. एकीकडे देश प्रगतीच्या मार्गावर असताना आदिवासी समाजाची अवहेलना आपल्या कारकिर्दीत होत असेल तर यावेळेस आदिवासींना पर्यायी चिन्हाचा वापर करणे भाग पडेल.

खुर्चिसाठी आरक्षनाचे राजकारण आपणास सुचणे यासारखे दुसरे दुर्दैव आपल्या नशिबात काहीच नसेल. कारण येत्या निवडणुकित आदिवासी समाज बांधव याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहित.

आदिवासिंच्या विकासाची फार मोठी जबाबदारी आपणावर असताना आपण आपल्या सत्ताकालावधीत नक्की कोणाचा विकास साधला हां अगदी साधा प्रश्न एक आदिवासी म्हणून मला पडलेला आहे. विकासाचे गाजर दाखवून तुम्ही आपलेच खीसे ओतप्रोत भरले आणि बिच्चारा कष्टकरी आदिवासी आजही पाण्यासाठी वणवण करत अनवाणी फिरत आहे. विजेचे स्वप्न तर दिवास्वप्नच ठरले. उलट आमच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आपण अपयशी ठरलात. आपण आपल्या कार्याचा मागोवा घ्यावा. उगाच सत्तेसाठी आदिवासी समाजाच्या मागे लागू नये.

आज आदिवासी जागृत झाला आहे. काय वाईट आणि काय चांगले याची जाण आली आहे. त्यामुळे गैरसमजुतीचे राजकारण आपण खेळुन आदिवासिंची फसवणुक करू नये.

एक तीर...एक कमान
सर्व आदिवासी एक समान 



---------------------------------------------------


प्रती 
मा.शरद पवार साहेब
सप्रेम जय बिरसा .

आम्ही असे ऐकतो कि आपण धनगर समाजाला आदिवासीमध्ये घालण्याचा खटाटोप
करत आहात.आदिवसी आणि धनगर हे मूलतः वेगेवगळे समाज समुह आहेत हे तुमच्यासारख्या सुज्ञ व्यक्तीला सांगण्याची गरज नसावी. आदिवासी सुरवातीपासून
तुमच्या पाठीशी उभे राहत आले आहेत, तुम्ही त्यांच्या आता पाठीत खंजीर खुपसू नका

एक कोटी २३ लाख आदिवासी महाराष्ट्र आहेत.पुढे विधान सभेच्या निवडणूक आहेत 
्याचीआठवण ठेवा.लोकसभेत तुमची काय फसगत झाली हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.आतापर्यंत आमचे शोषण सर्वानीच केल.आता मात्र आमची सहनशक्ती संपली आहे.कुण्याही जातील आदिवासीमध्ये घुसडण्याचा अव्यापारेषु व्यापार कुणीच करू नये. एवढी विनंती आम्हा या ठिकाणी करावीश वाटते. धन्यवाद.

आपला स्नेही
प्रा माधव सरकुंडे

Find us on Facebook