Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

Ashokbhai Chaudhari @ Conference on Towards Peaceful World at Pune

दिनांक १६ नोव्हेंबर २०१४ पुणे येथील वसुधैव कुटुंबकम तर्फे आयोजित जागतिक शांतता आणि एकात्मता परिषद (विषय - धर्म, मातृभूमी, महिला) मध्ये आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करताना आप. अशोकभाई चौधरी यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे थोडक्यात. कृपया सर्वांनी एकदा वाचुन नक्की विचार करावा. 
१) private  ownership (खाजगी मालकी ) :
 अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला कि,आदिवासी समाजात खाजगी मालकी ची संकल्पना कधी रुजली नव्हती, म्हणून कधी आदिवासी साम्राज्ये फारशी बनली नाहीत, जी बनली ती स्वरक्षणार्थ बनली. याला कारण असे कि संपत्ती व खाजगी मालकी बनवली, तर तिचे रक्षण, वयक्तिक इर्षा, स्पर्धा,स्वार्थ, मोह,  हिंसा उदयास येते. आदिवासी समाज मात्र या पासून अलिप्त राहून अजुनी सामाजिक एकात्मता, परस्पर सहकार्य, हे जीवन शैलीत सहज येते.
 पुढे जावून श्री. अशोकभाई हा मुद्दा आणखी विस्तारत म्हणाले कि,आदिवासींनी संपत्ती स्वतःजवळ साठवून न ठेवता ते समाजात वाटून घेत असत. आणि म्हणून जर संपत्तीच नाही तर गरीब श्रीमंत हा भेदभाव देखील आदिवासींमध्ये रुजला नाही. समानता हा आदिवासी समाजाचा सर्वात मोठा पाया हा याच गोष्टीमुळे ठरतो.
          संपत्ती नाही म्हणून कधी institutions बनली नाहीत. सामाजिक, आर्थिक कोणत्याच प्रकारच्या संस्था विकसित झाल्या नाहीत. व्यापार, व्यवहार, गरजे पेक्षा जास्त जमा करणे याची गरजच कधी आदिवासींना पडली नाही. जे काही व्यवहार व्हायचे ते सर्व एकमेकांवरील विश्वासाच्या आधारावर व्हायचे.
२) self governance system (स्वशासन प्रणाली)
          दुसरा मुद्दा हा खूप महत्वाचा मांडला. अशोकभाई म्हणतात कि, "आदिवासी समाज जरी समूहा समूहाने राहत असला तरी त्यांनी स्वताची self governance system (स्वशासन प्रणाली ) त्यांनी विकसित केली आहे. या प्रणाली अंतर्गत समाजाच्या छोट्या मोठ्या समस्या आपापसात चर्चा व समेट घडवून सोडवल्या जात , त्यांचे स्वतःचे काही नियम व कायदे आहेत,त्यामुळे वेगळ्या एखादया किंवा बाहेरच्या न्यायप्रणालीची आदिवासींना कधी गरज पडली नाही.
३) स्वावलंबन      
          तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला गेला तो म्हणजे स्वावलंबन , हा मुद्दा मांडताना अशोकभाई म्हणतात कि आमच्या मुलांना कधी विज्ञान शिकवायला वा  तंत्रञान  शिकवायला विशेष प्रणालीची आवश्यकता भासली नाही. कारण आमची मुले सामुहिक होवून काम करणारा समाज बघून सामुहीकता,संघटीतपण हे गुण शिकतात. दैनदिन जीवनातून त्यांनी विज्ञान व तंत्रञान शिकलेय.
          आदिवासी समाज हा अत्यंत स्वावलंबी , शिस्तबद्ध आणि स्वतःची एक शाषणपद्धती विकसित करून चालवणारा असा स्वयंभू समाज आहे .
   सर्व समाजाला उद्देशून बोलताना अशोकभाईनी आदिवासी समाजाची तत्वे सोडून जर आपण चालू पडलोय आणि यामुळे आपण स्वताचे नुकसान करून घेतोय सर्व मानवजातीचे नुकसान करतोय असा महत्वाचा इशारा दिला,ते म्हणाले कि आज आपण सर्वजन समाजात विविध तत्वांची मांडणी करतो मात्र वागतोय त्याच्या अगदी विरुद्ध! प्रत्येक जन आज ध्येय पूर्तीच्या मागे लागलाय ,जास्ती मिळवण्याच्या मागे लागलाय आणि जास्ती मिळवण्यासाठी एकमेकांशीच स्पर्धा करू लागलोय स्पर्धेतून द्वेष मत्सर निर्माण होवून मानव जातीमध्ये विष पसरत आहे हे जर टाळायचे असेल तर आदिवासी तत्वे आत्मसात करणे खूप गरजेचे आहे . "मला वाटते कि या जगाचे पुन्हा retribalisation व्हावे असे मला वाटते" असे अशोक भायींनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा एकच गजर झाला.

 विज्ञानाचा वापर हा एकमेकांना जोडायला केला गेला पाहिजे न कि एकमेकांना मारायला हे सांगायला ते विसरले नाहीत.  भाषण संपवताना मात्र त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला कि सर्वांना विचार करायला भाग पाडले. इंगजी आणि हिंदीमधून भाषण देताना म्हणाले कि, we all  believe Darvin's principle right?" म्हणजे आपण सर्व जन डार्विन च जीवउत्क्रांतीचा सिद्धांत मानतो त्यावर विश्वास ठेवतोय ना. (सभागृहात  होकारार्थी माना  डोलावल्या गेल्या ) या सिद्धांतात म्हटलेय कि माकड (वानर) हे आपले पूर्वज होते आणि ते आपण अभिमानाने मान्य करतो.  मग आपण हे का मान्य करत नाहीत कि आदिवासी हे आपल्या पूर्वजांचे पण पूर्वज होते .?"( सभागृत टाळ्या वाजू लागल्या मात्र त्याच बरोबर उपस्थित पण विचारात पडले  हे सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते)

सदर चे भाषण बघण्या साठी येथे क्लिक करा : http://youtu.be/HJHFe_vTtaA  


Clicked by Lalsing Gamit : Sonal Rathava, Dr Shantilal,  Ashokbhai Chaudhari, Akshay Kondhar & Sachin Satvi

Find us on Facebook