Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा पालघर, आम्हा आदिवासींसाठी फक्त पत्ता बदल…

मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा पालघर, आम्हा आदिवासींसाठी फक्त पत्ता बदल…
आदिवासींची जमीन, पाणी, संस्कृती, परंपरा, शिक्षण, रोजगार, व्यवसाय, अस्मिता जतन केली जायील का?
Letter from Secretory about Independent District on Basis of Fifth Schedule and PESA 1996

Lets spread awareness about Natural resources & Tribal Community.Swayatt Adivasi Jilha Kruti Samiti - Thane 



शांत आदिवासींना पेटवू नका!

शांत आदिवासींना पेटवू नका!

नाशिक - अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करून शांत असलेल्या आदिवासींना पेटवू नका, असा खणखणीत इशारा आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपल्याच आघाडी सरकारला दिला. विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनीही पिचडांच्या भूमिकेला पाठिंबा देत आरक्षण बदलण्याचा निर्णय घेऊन आघाडी सरकारने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये, असा आघाडी सरकारला आज घरचा आहेर दिला. खऱ्या आदिवासी जमातीमधील बिगरआदिवासी जातींची घुसखोरी थांबविण्यासाठी विविध पक्ष- संघटनांतर्फे आयोजित केलेल्या आदिवासींच्या निर्धार मेळाव्यात हे दोन्ही नेते आज बोलत होते. पिचड म्हणाले, की "एसटी‘मध्ये अन्य जातींचा समावेश करू नये यासाठी राज्यातील सर्व
आदिवासी आमदारांनी सनदशीर मार्गाने शासनाला निवेदने दिली आहेत. मात्र, आपल्या स्वाभिमानासाठी व आपल्या हक्कांसाठी सर्व आदिवासींनी जागरूक राहिले पाहिजे.

नव्याने होऊ घातलेला पालघर जिल्हा हा घटनेच्या सहाव्या सूचीनुसार स्वायत्त व्हायला हवा.
त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर या जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्राच्या विकासासाठी मदत
मिळेल आणि पुढच्या पिढीला स्वाभिमानी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. या समाजासाठी आज सर्व
आमदार व खासदार राजकारण सोडून एकत्र आले आहेत. वसंत पुरके म्हणाले, की आदिवासींच्या हक्कांवर होणारे अतिक्रमण पाहता आजची रात्रच नव्हे, तर दिवसही वैराचा आहे. ही वेळ सर्वांनी निश्चिंत बसायची नसून येत्या 22 जूनला नागपूर येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आम्ही आदिवासी जनतेच्या बाजूने उभे राहिलो म्हणून अनेकांनी आमचे पुतळे जाळले काय किंवा आम्हाला जाळले काय मात्र, आमच्या विचारांना ते कधीही जाळू शकत नाहीत. राज्य सरकारकडून "एसटी‘मध्ये घुसखोरी करणाऱ्यांना आश्वासने दिली गेली असल्याचे समजते. मात्र, नियमानुसार तसा बदल होणे शक्य नसल्याचे पुरके यांनी सांगितले.



आदिवासी बांधव आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही !

धनगर समाजाचा विकास होवू नये असे एक आदिवासी म्हणून मी नक्कीच म्हणणार नाही. कोणताही आदिवासी इतका स्वार्थी विचार कधीच मांडणार नाही. परंतु आदिवासिंच्या ताटातिल काढून त्यांच्या ताटात टाकने म्हणजे आदिवासिंवर उघड उघड केलेला अन्याय आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र तरतुदी कराव्यात... त्यासाठी आदिवासिंच्या तोंडाला पाने पुसण्याचे क्रूर राजकारण खेळु नये....

अन्यथा तमाम आदिवासी बांधव आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही !



---------------------------------------------------

राजू गाईड

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत. राजकारणात सत्तेसाठी ते असा राजकीय डाव खेळत आहेत. ज्या आदिवासी समाजाने यांना आजपर्यन्त एकहाती सत्ता मिळविण्यात हातभार लावला, त्या आदिवासी समाजाच्या सोयी-सवलतींवर इतरांचा अतिरिक्त भार टाकू पाहत आहेत. 

धनगर समाजाचा विकास होवू नये असे एक आदिवासी म्हणून मी नक्कीच म्हणणार नाही. कोणताही आदिवासी इतका स्वार्थी विचार कधीच मांडणार नाही. परंतु आदिवासिंच्या ताटातिल काढून त्यांच्या ताटात टाकने म्हणजे आदिवासिंवर उघड उघड केलेला अन्याय आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र तरतुदी कराव्यात... त्यासाठी आदिवासिंच्या तोंडाला पाने पुसण्याचे क्रूर राजकारण खेळु नये....अन्यथा तमाम आदिवासी बांधव आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

पवारांना कदाचित आदिवासींचा क्रांतिकारी इतिहास माहीत नसावा. बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या मामा आदि आदिवासी विरांचे विचार आजही आमच्या रक्तात जिवंत आहेत. त्या रक्ताला आपण उगाच आपल्या स्वार्थी नितिमत्तेने पेटवू नका.....नाही तर उद्या रक्ताची होळी आम्ही खेळु शकतो हे आपणास उघड्या डोळ्यांनी बघावे लागेल.

आपल्या पराभवाची कारणे आपण स्वता अंतर्मुख होवून शोधावित. जर आपण प्रामाणिकपणे सामान्य जनतेची सेवा केली असेल तर त्याचे उत्तर नक्की सापडेल. एकीकडे देश प्रगतीच्या मार्गावर असताना आदिवासी समाजाची अवहेलना आपल्या कारकिर्दीत होत असेल तर यावेळेस आदिवासींना पर्यायी चिन्हाचा वापर करणे भाग पडेल.

खुर्चिसाठी आरक्षनाचे राजकारण आपणास सुचणे यासारखे दुसरे दुर्दैव आपल्या नशिबात काहीच नसेल. कारण येत्या निवडणुकित आदिवासी समाज बांधव याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहित.

आदिवासिंच्या विकासाची फार मोठी जबाबदारी आपणावर असताना आपण आपल्या सत्ताकालावधीत नक्की कोणाचा विकास साधला हां अगदी साधा प्रश्न एक आदिवासी म्हणून मला पडलेला आहे. विकासाचे गाजर दाखवून तुम्ही आपलेच खीसे ओतप्रोत भरले आणि बिच्चारा कष्टकरी आदिवासी आजही पाण्यासाठी वणवण करत अनवाणी फिरत आहे. विजेचे स्वप्न तर दिवास्वप्नच ठरले. उलट आमच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आपण अपयशी ठरलात. आपण आपल्या कार्याचा मागोवा घ्यावा. उगाच सत्तेसाठी आदिवासी समाजाच्या मागे लागू नये.

आज आदिवासी जागृत झाला आहे. काय वाईट आणि काय चांगले याची जाण आली आहे. त्यामुळे गैरसमजुतीचे राजकारण आपण खेळुन आदिवासिंची फसवणुक करू नये.

एक तीर...एक कमान
सर्व आदिवासी एक समान 



---------------------------------------------------


प्रती 
मा.शरद पवार साहेब
सप्रेम जय बिरसा .

आम्ही असे ऐकतो कि आपण धनगर समाजाला आदिवासीमध्ये घालण्याचा खटाटोप
करत आहात.आदिवसी आणि धनगर हे मूलतः वेगेवगळे समाज समुह आहेत हे तुमच्यासारख्या सुज्ञ व्यक्तीला सांगण्याची गरज नसावी. आदिवासी सुरवातीपासून
तुमच्या पाठीशी उभे राहत आले आहेत, तुम्ही त्यांच्या आता पाठीत खंजीर खुपसू नका

एक कोटी २३ लाख आदिवासी महाराष्ट्र आहेत.पुढे विधान सभेच्या निवडणूक आहेत 
्याचीआठवण ठेवा.लोकसभेत तुमची काय फसगत झाली हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.आतापर्यंत आमचे शोषण सर्वानीच केल.आता मात्र आमची सहनशक्ती संपली आहे.कुण्याही जातील आदिवासीमध्ये घुसडण्याचा अव्यापारेषु व्यापार कुणीच करू नये. एवढी विनंती आम्हा या ठिकाणी करावीश वाटते. धन्यवाद.

आपला स्नेही
प्रा माधव सरकुंडे

Adivasi Lokavichar Manthan Mahasabha @Kasa, Taluka Dahanu


Facebook Event Page : https://www.facebook.com/events/870979926252356/ 


Lagin | Tribal matrimonial Service

# Adivasi Matrimonial Service

Marriages play significant role in any social system. In our tribal society one of the most important challenges is to maintain our traditional value & culture and pass on to the next generation. As the modern tribal generations have been moving out from the indigenous habitat and scattered to different parts of India as well as abroad. So, there was need to create a platform where the all prospective bride and groom could find the suitable life partner within the tribal society.

आया लगीन !

आज कालचे तरुणांना नोकरी, शिक्षणाच्या धावपळीत वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देण्या साठी बऱ्याचदा वेळ मिळतोच असे नाही ....

शहरात राहणाऱ्या तसेच उच्च शिक्षित तरुणांच्या पालकांना पडलेले मोठे कोडे म्हणजे आपल्या पाल्यांना आपल्या समाजातील जीवन साथी शोधणे,

किवा काही आणखीन वेगळी करणे असतील, आपला समाज विखुरलेला असल्या मुळे आपण एक प्रयत्न करतो आहोत कि समाजातील तरुण पिढी संपर्कात आणु. त्यातून जर एकमेकांचे स्वभाव, आवड, निवड जुळली तर त्यांना जीवन साथी निवडणे सोप्पे जायील... हा असा आपला पहिला प्रयत्न आहे

भविष्यात आपण तरुण पिढीला एकत्र आणण्या साठी वेग वेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तसेच आपल्या समजातील जीवनसाथी निवडण्या साठी आपण एक वेब साईट बनवणार आहोत, जर आर्थिक सहकार्य मिळाले तर लवकरात लवकर आपण सुरवात करू शकू 


Facebook page : https://www.facebook.com/pages/Lagin/719567474771615 



AYUSH Picnic | Gambhir gad, 4th May 2014

आयुश वनभोजन | AYUSH picnic cum get together!

Agenda : Tribal Empowerment, Traditional knowledge & cultural Intellectual, AYUSH activities (& Promoting Tribal Tourism | आदि पर्यटन)
Date : 4th may 2014, Sunday 
Time : 9.00 ~ 5.00 
Meeting Point : Uchal Dev (9 am)
Gambhir Gad, Kajal Barichi Khind. Taluka Dahanu. Dist Thane 

Submit Participation form atwww.picnic.adiyuva.in

FB Event Page : https://www.facebook.com/events/488242107969949/ 
Map : https://mapsengine.google.com/map/edit?mid=zZhuTvZBP95I.kIa91DMMj658


Contact : Sachin Satvi 09246 361 249, Vasant Bhasara 08087 546 675, Chetan Gurada 9869 197 376 Karan Pawar 9930 729 139, Sandip Sathe 9029196 354

Live Pages : https://www.facebook.com/media/set/?set=a.631766900210241.1073741841.122481367805466&type=1 




"Dhikkar" - Book by Sampat Thanakar

धिक्कार.......आदिवासी मने पायदळी तुडविणारांचा धिक्कार....परकीय शक्तींचा धिक्कार
____________________________________________________

आदिवासी संस्कृतीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारे श्री संपत ठाणकर यांच्या 'धिक्कार' या पुस्तकाविषयी थोडक्यात.....

-------------------------------------------------------------------------
धर्म शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातील अत्यंत सोपी व्याख्या मी आपणास सांगतो,
‘’धारण करण्याचा मार्ग म्हणजे धर्म होय.’’
इथे संस्कृती धारण करण्याचा अर्थ अभिप्रेत आहे.
जगात आज विविध धर्म आपापल्या तत्त्वांनुसार अस्तित्वात आहेत. यात हिंदू, मुसलमान, बौध्द, ख्रिश्चन आदी धर्म आपापले विचार व्यक्त करत आहेत. सर्व धर्मांची नावे वेगवेगळी असली....किंवा या धर्मांचे प्रेषित वेगवेगळे असले तरी मानवाचे कल्याण साधण्याचा विचार सर्वांमधून मांडला जातो. परंतु आज धर्माच्या नावाखाली काही तथाकथित धर्मगुरु आपली पोळी भाजत असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा असणारा हा धर्म आज आदिवासींच्या मुळावर उठला आहे.....दिव्याखाली अंधार वाढत आहे.......आणि त्याचा सर्वाधिक तोटा आदिवासी समाजाला बसत आहे. आदिवासी माणूस हा स्वताचा निसर्ग धर्म जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतु हिंदू धर्मीय लोकांशी अधिक जवळीक आल्याने कायद्याच्या चौकडीत अनपेक्षितपणे हिंदू नावाच्या लेबलखाली आदिवासींचा समावेश करण्यात आला. परंतु असो....आजही आदिवासी हि स्वतंत्र ओळख सिध्द करण्यासाठी आदिवासींची महान संस्कृती जपली जात आहे.
परंतु अलीकडच्या काही वर्षात तलासरी, डहाणू या भागात ख्रिस्ती मिशन-यांनी आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्या भागात आपले ख्रिस्ती धर्म प्रसाराचे कार्य सुरु केले. येशु ख्रिस्त यांनी खरच समाजाला अतिशय चांगला मार्ग या धर्मातून सांगितला आहे. परंतु या भागात धर्मगुरू म्हणून काम करणा-या थोतांड लोकांनी बायबलचे विचार गुंडाळून ठेवून आपले विकृत विचार आदिवासी लोकांमध्ये पेरायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात शिक्षण, दवाखाने आदींच्या माध्यमातून सुरु झालेले कार्य नंतर चर्चच्या माध्यमातून अधिक विस्तारले. एवढेच नाही तर भारत सरकार कडून आलेल्या निधीवर चालणा-या ख्रिस्ती मिशनरीन्च्या या भागातील शाळा चक्क फक्त ख्रिस्ती धर्म प्रसाराचे काम करत आहेत....नव्हे नव्हे आदिवासी समाजाच्या अस्तित्वावर खूप मोठा घाला घालत आहेत.
तलासरी, डहाणू भागातील आदिवासींची सारी दैवते नासविण्याचे काम अतिशय नियोजनबध्द केले जात आहे. आदिवासी विचारांमध्ये परकीय विचारांचे विष कालवले जात आहे. धर्मगुरूंची घरे दारूचे अड्डे बनत आहेत. यातून आदिवासी माणूस वेगळ्या वळणाला जात आहे. चुकीच्या प्रबोधनाच्या सहाय्याने आदिवासी स्त्रियांना नासवले जात आहे. आदिवासींना चर्चमध्ये बोलावून आळशी, उद्धट, रागीट बनविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आदिवासी धर्माची पायमल्ली करून येथील आदिवासींचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचे कटकारस्थान आपल्या लेखणीतून स्पष्ट आणि परखडपणे मांडण्याचे काम संपत ठाणकर यांनी आपल्या ‘धिक्कार’ पुस्तकातून केले आहे.
पुस्तकातील अनेक संदर्भ स्वतः लेखकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत...आदिवासी मनात चीड आणणारे असेच काही अनुभव यात त्यांनी मांडलेले आहेत. वसई येथील फादर आदिवासी तरुण, कोवळ्या मनाला मोहिनी घालून मुलींबरोबर लैंगिक संभोग करून कशा आदिवासी कळ्या आपल्या क्रूर हातांनी धर्माच्या नावाखाली कुस्कारत आहेत याचे वर्णन तर राग आणणारे असेच आहे. येथील स्थानिक ग्रामपन्चायत कशी या लोकांची गुलाम बनवून नागवली जात आहे याचे वास्तव चित्रण आदिवासी भविष्य किती विकृत असेल याचा धोका आपणास दाखविते.
आदिवासी समाजाचे लचके तोडणा-या या परकीय शक्तींविरोधात जर आपण आज आवाज उठविला नाही...तर उद्या या परकीय शक्ती नक्कीच आपल्या आदिवासीपणाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून आपल्यामध्ये जागृतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी वारली प्रकाशन, जीतगाव यांनी प्रकाशित केलेले संपत ठाणकर लिखित ‘धिक्कार’ हे पुस्तक नक्की वाचा. हे फक्त पुस्तक नसून या भावना आहेत. नक्कीच या आपल्या मनाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाहीत. या पुस्तकाच्या लेखनामुळे या आदिवासी लेखकाच्या जीवाला धोका निर्माण होवूनही त्यांनी पुढाकार घेवून न डगमगता हा विचार आपल्या पर्यंत पोहचविण्याचे महत्तम कार्य केले आहे. आपल्या वाचनाने लेखकाच्या कार्याला बळकटी मिळणार आहे.
पुस्तकाची किंमत ५० रुपये असून आपण सदर पुस्तकाच्या खरेदीसाठी लेखक श्री संपत देवजी ठाणकर, मु.जीतगाव, पो.दापचरी, ता. डहाणू, जि.ठाणे, पिन-४०१६१० या पत्त्यावर संपर्क साधून घेवू शकता.
या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेतील कठीण अलंकारिक शब्दप्रयोग टाळून आदिवासी वारली बोलीभाषेचा व सरळ साध्या मराठी भाषेचा वापर केला आहे. यातून आदिवासी समाजाच्या अन्यायाची दाद मागण्यासाठी नव्या दिशेने वाटचाल सुरु होत आहे....
संपत ठाणकर यांचे विचार फक्त पुस्तकात कैद राहावेत असे नक्कीच नाहीत....आदिवासी समाजाचे भले जोपासणारांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे....या विचारांच्या प्रसारातून आदिवासी मने जोडली जावून क्रांतीची मशाल आग बनून प्रज्ज्वलित झाली पाहिजे अशी अपेक्षा......!!!
आदिवासी समाजापुढे अस्तित्वाची लढाई!
ठाणे ग्रामीण परिसरात पारंपारीक आदिवासी संस्कृतिक ओळख पाश्चिमात्य शक्तींकडून नियोजितपणे मिटवली जात आहे
आदिवासी लेखक, अभ्यासक यांच्या लेखणीतून
धिक्कार
संस्कृती संकट ओळखण्या साठी जरूर वाचा !
लेखक :
संपत देवजी ठानकर
9975670275

Tarpa Mahotsav 2013 @ Dahanu - Sanchita Satvi

तारपा नृत्य ,बोहाडा ,गौरी नृत्य ,ढोल तसेच डांगी नृत्य अशा विविध भागातील आदिवासी नृत्यांचा थरार!… वारली चित्रकलेने सजलेली दुकाने,आदिवासीच्या साध्या परंतु समाधानी स्वावलंबी राहणीमानाची साक्ष देणारी शेणामातीने सारवलेली झोपडी !तांदळाचे लाडू,पापड्या,सावेली,नाचणीची भाकरी तसेच कोहळ्याची भाजी यांचा सुटलेला घमघमाट! प्रचंड संख्येने उलटलेला जनसागर आणि या सर्व ऐतिहासिक क्षणाची साक्षठेवणारा डहाणूचा नयनरम्य समुद्र किनारा!
                    हे दृश्य होते डहाणू बीच ,पारनाका येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय (दि . २१डिसें २०१३ ते २३ डिसें  २०१३ ) तारपा महोत्सवाचे !
                 प्रस्तुत स्थळी जेव्हा प्रवेश केला तेव्हा प्रथम तर डोळ्यांवरती विश्वासच बसेना ,कारण हजारोंच्या  संख्येने लोटलेला जनसागर आणि त्यात घुमणारा ताराप्याचा सुर…! हे दृश्य निदान मी  तरी पहिल्यादांच पाहत होते . शाळकरी मुलांपासून ते क्लास १ ऑफिसर पर्यंत आणि शेंबड्या पोरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणीही स्वताला या महोत्सवात सामील होण्यापासून रोखु शकले नव्हते .
                मग आमची आयुशची टीम पण मागे कशी राहणार … ?आदिवासी युवा शक्ती - आयुश ची टीम महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच मोठ्या उत्साहाने प्रस्तुत स्थळी हजार झाले ,मग वारली चित्रकलेची दुकाने सजवण्यापासून ते 'वारली आर्ट सेशन ' मध्ये भाग घेण्यापर्यंत टीमचा उत्साह ओसंडून वाहत होता . या वेळेत आपल्या वारली तरुण चित्रकारांनी एक नवीन ट्रेंड सुरु केला तो म्हणजे taoo गोंदवून देण्याचा! शरीरावर tatoo गोंदवणे काही नवीन नसले तरी ,या tatoo मध्ये वारली चित्रकलेतील चिन्हांचा वापर करून नवीन fashion चा शुभारंभ आमच्या वारली कलाकारांनी केला . आणि त्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
              या महोत्सवात आयुश टीमच्या सर्व वारली चित्रकारांनी आपापली चित्रकला व हस्तकलांचे प्रदर्शन भरवले होते ,हस्तकला वस्तू ,वारली चित्रकला ,बांबू आर्ट यासारख्या इविध वस्तू या प्रदर्शनात विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. आमच्या या दुकानांना या तीन दिवसात  हजारोंच्या संख्येने आलेल्या सर्व पर्यटकांनी तसेच बऱ्याच विदेशी पर्यटकांनी सुद्धा भेटी दिल्या . पर्यटकांची वारली चित्रकलेबद्दलची उत्सुकता व पसंती हि खरेच वाखाणण्याजोगी होती ,प्रत्यक्ष पेंटीग शिवाय विविध वस्तूंवर वारली कला साकारलेल्या वस्तूंकडे स्त्री वर्गाचा  कल जास्त दिसून येत होता . यामध्ये शोभेच्या वस्तू ,दागिने तसेच कपड्यांवर केलेल्या वारली कलेला खूप मागणी असल्याचे दिसून आले ,हि आपल्या कलाकारांसाठी खूप महत्वाची बाब आहे . आमच्या कलाकारांनी आलेल्या पर्यटकांना कलेबद्दलची माहिती व योग्य मार्गदर्शन करून आदिवासी कलेचा प्रसार करण्याचे उत्तम कार्य केले . .
             खरे पाहता ते तीन दिवस आम्ही खऱ्या अर्थाने 'आदिवासी 'म्हणून जगलो ,तारपा नृत्यावर मनसोक्त ठेका धरून नाचण्याचा मोह तर आम्ही कसाबसा आवरला ,परंतु मन मात्र 'भिंदोडत … भिंदोडत… 'करतच होते .
             तीनही दिवस आपल्या आदिवासी स्त्रियांनी बनवलेल्या अस्सल 'tribal food ' पुढे आजचे पिझ्झा बर्गरही कस्पटासमान वाटू लागले आहेत ,विविध भागातून आलेल्या आपल्या आदिवासी बंधुभागीनींनी सादर केलेली नृत्ये व त्यातील थरारक कसरती पाहून तर एखादा action पटसुद्धा फिक्का वाटावा !सर्व वातावरणाच जणू 'आदिवासिमय' झाले होते.  कधी नव्हे तेव्हडा उत्साह व अभिमान आदिवासींच्या डोळ्यात अवतरला होता .
              संपुर्ण जगाला आदर्श घालून देणारी व साधी परंतु स्वावलंबन शिकवणारी आदिवासी संस्कृती प्रत्यक्ष अनुभवली व आदिवासी असण्याचा अभिमान डोळ्यात अवतरला ,कारण तसे आपल्यासारख्या सुशिक्षित आणि स्वतःला mordenसमजणाऱ्या आदिवासी जनतेला हे सर्व नवीनच ,नाही का …?
              परंतु मोठ्या प्रमाणावर एकत्र जमलेल्या आदिवासी तरुणाईने घेतलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुन आपली संस्कृती नक्कीच जपली जाईल ,अशी अशा वाटू लागली आहे .
      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सौजन्याने आयोजित या तारपा महोत्सवाचे हे प्रथम वर्ष !डहाणू परिसरात आदिवासी भागात पर्यटनाचा विकास व्हावा,व आदिवासी संस्कृतीची ओळख सर्व दहानुकारांना व्हावी हा या मागचा उद्देश ! 
      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्पाधिकारी मा. श्री. शैलेश नवाल यांच्या सुंदर कल्पनेतून साकारलेल्या या तारपा महोत्सवामुळे डहाणू परिसरात पर्यटनाचा विकास होण्यास नक्की हातभार लागेल . 
       खरेतर आम्हाला आमचीच संस्कृती अनुभवायला महोत्सवात जावे लागतेय हीच मोठी खेदाची बाब आहे . कारण आपली संस्कृती हि आपल्या दैनंदिन जीवनातुन प्रकट होत असते ,ती आपण रोज जगायला व अनुभवायला हवी ,त्यासाठी चतुर्थी व एकादशीची गरज नसते.  असे असूनही आपल्या उत्सवाचे प्रतिक समजल्या जाणारा  'तारपा नृत्य 'पाहायला आज आपल्याला u tube वर सर्च करावे लागत आहे . 

      हि परिस्थिती आपल्यासारख्या शिक्षित पिढीमुळेच  निर्माण झाली आहे . आपल्या पूर्वजांनी जपलेला सांस्कृतिक वारसा जपण्यास व तो आपल्या पुढच्या पिढीला देण्यास आपण असमर्थ ठरलो आहोत,कारण आधुनिकीकरणाच्या नावाखाली व सांस्कृतिक मुल्यांची ओळख न करून घेता ,आपण भलतीकडेच भरकटू लागलो आहोत , व यामुळेच आपल्याला आपलीच संस्कृती तुच्छ वाटू लागली आहे .
     परंतु हीच महान संस्कृती अभ्यासायला जेव्हा पांढरपेशी व विदेशी लोक येतात,तेव्हा मात्र आम्हा सुशिक्षितांना (?) प्रश्न पडतो कि, "ज्या संस्कृतीचा आदर्श आज जगात घालून दिला जातोय ती संस्कृती नाकारणारे आम्ही  खरेच सुशिक्षित आहोत का… ? हा प्रश्न पडू लागला आहे. 
         म्हणता म्हणता ते तीन दिवस संपलेही ,आणि हा तारपा महोत्सव आम्हा शिकलेल्यांना खूप काही शिकवून गेला 
    कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवता येतील यांचे उत्तम उदाहरण मा. श्री. नवाल यांनी घालून दिले. त्यांच्या या कार्याबद्दल आयुषच्या संपूर्ण टीमतर्फे अभिनंदन व खूप खूप आभार !
                    हा महोत्सव असाच चालू राहावा, असे वाटत असतानाच नाईलाजाने त्याला निरोप द्यावा लागला.परंतु येणाऱ्या तारपा महोत्सवाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ,निदान या निमित्ताने तरी समाजापासुन भरकटत चाललेल्यांना 'आदिवासी 'असण्याचे महत्व कळेल !

Sanchita Satvi 

|| नाची से बाची || - Dr Hira Alwa


जो नाचेगा वहीं बचेगा दोस्तों आज देश में प्रकृति पूजक आदिवासिओ कि संस्कृति धीरे धीरे समाप्त होती जा रही है और जिस जिन आदिवासिओ कि संस्कृति और भाषा समाप्त हो जायेगी उसी दिन इस देश से आदिवासिओ का अस्तित्व मिट जाएगा क्योकि आदिवासिओ कि आदिवासिओ कि संस्कृति और भाषा कि एक ऐसा हथियार है जिसके बदौलत आज देश में आदिवासी बचे हुवे है लेकिन आज धीरे धीरे आदिवासिओ कि संस्कृति आदिवासिओ कि भाषा आदिवासिओ कि परम्परा समाप्त होती जा रही है 
आज आदिवासी सामाज के जायदातर पड़े लिखे नौजवान सरकारी नौकरी लगते ही अपनी संस्कृति और भाषा को भूलने लगे है जहा आदिवासी युवाओ कि अपनी मातृभाषा को बोलने में गर्व होना चाहिए वही जयादातर पड़े लिखे नौजवानो को अपनी भाषा में बात करने में शर्म आती है झिझक महसूस करते है अपनी भाषा में बात करने पर 
जहा गाँवों में आदिवासी रीतिरिवाज से होने वाली शादीओ नाचने वाले युवाओ में गाँव के अनपढ़ युवको और युवतिओं कि संख्या बहुत जायदा होती है वाही इसके उलट आदिवासी नृत्य करने वाले युवाओ में पड़े लिखे युवको और युवतिओं कि संख्या बहुत कम होती है 
इसका सबसे बड़ा कारण है कि ये पड़े लिखे युवाओ नाचने में शर्म महसूस करते है क्योकि अब ये लोग अपने आपको सभ्य समझने वाले लोगो कि कतार में खड़े होते देखना चाहते है लेकिन ये पड़े लिखे युवा इस बात को भूल रहे है जिस दिन आदिवासिओ ने अपनी संस्कृति और परम्पराए भुला दी उसी दिन उनका अस्तित्व भी ख़तम हो जाएगा
आज भारत सरकार आदिवासिओ कि संस्कृति और भाषा को बचाने के लिए बहुत प्रयास कर रही है क्योकि आज आदिवासिओ के विकाश के नाम पर राजनितिक पार्टिया सरकार बना लेती है 
आदिवासिओ के विकाश के नाम पर देश ५०० के लगभग आदिवासी संगठन काम कर रहे है लेकिन वो भी सिर्फ अपने राजनितिक स्वार्थ पूरा होने के बाद चुप चाप बैठ जाते है 
अगर सही मायने देखा जाए तो हम पड़े लिखे युवा कितना प्रयास अपनी संस्कृति ,अपनी भाषा ,अपनी परंपरा को बचाये रखने के लिए कर रहे है मेरे ख्याल से तो नहीं के बराबर 
दोस्तों अब समय आ गया है आदिवासी सामाज के पड़े लिखे नौजवान अपनी संस्कति और भाषा को बचाने के लिए आगे आये क्योकि एक बात हम सभी युवाओ को ध्यान में रखना चाहिए कि जिस दिन आदिवासिओ कि संस्कृति और भाषा समाप्त हो जायेगी और दिन आदिवासिओ का अस्तित्व भी समाप्त हो जाएगा 
@जय आदिवासी युवा शक्ति @


Tribal Dance : http://www.youtube.com/watch?v=pVBLsNBtMEY&list=PL04CFAC463D6D5FA4 

Tribal Entrepreneurship - S M Sarkunde, Comm. Tribal Development, Maharashtra

Tribal are existed in varies small ethnic groups since long despite it forms 9 percent population of India. Some are trailing for survival and some  on the verge of extinct.  Their weakness lies in their social exclusion due to geographical seclusion , distinct life style, poor food habits, special dialect, tradition and custom have made them different from the main stream of society. Till yesterday, they were dependent on miner forest produce, fishing, hunting and honey collection for their source of livelihood. To some extent they were engaged in shifting cultivation and used to harvest grain, cereals, pulses etc. Thus, today also they are subjected to  subsistence economy. Their peaceful life style got interrupted by Aryan foreign culture ,advent of foreign invasion, introduction of numerous forest legislation like Indian Forest Act, 1927, The Protection of Wild Life Act, 1972, the Forest Conservation Act, 1980 and various land laws. These laws pre and post independent era brought limitation on their way of life,  forced them to leave their place of habitation, given up their traditional livelihood pursuit, mutilated their cultural fabric and thus they came into contact with so called civilized  society by taking recourse to savage deeds.. Their assimilation with main stream society made them not only dependent for their daily bread but also for cultural ethos. The nature lover tribal now compelled to embrace laballed religion like Hinduis, muslim, Buddhism, Christianity etc and  thus they  started to loose their cultural identity. The erstwhile  nature worshiper tribal turned idol worshiper giving up worshiping totem.  The free tribal life style turned into bonded labor in mine, on farm and now a days on construction site. Still their habitation remained in the lap of nature. However, for source of livelihood he became dependent on the land lord, mine mafia, builder, orchard owner etc. His seasonal cultivation for the period of three months of a year forced him to leave his hamlet for  in search of daily bread keeping children and better half behind at home and toiled for months together to bring them up. Some time he moved along with children and wife leaving old parent behind at home completely at nobody's mercy. Thus he strives to keep body and soul together. This has endangered his life style. He felt short of assured nutritious food which he used to get from forest in the form of flesh by hunting, fishing, by collection of wild fruits and vegetables etc , resulted in his malnaurishment followed by death of his children. Still the tribal are subjected by this vicious circle. This resulted in high mortality rate of infant and mother . Tribal's children began to go to school due to introduction of elementary school education by Govt despite he faced inhibition with foreign medium of instruction. His dialect not being recognized as medium of instruction in the school made him handicapped from linguistic point of view. The schooling of the tribal children endangered owing to the seasonal migration of tribal parent for in  search of livelihood. Forceful migration from hamlet made their life wretched and miserable subjected to various vagaries of malady due to lack of basic amenities. Thus his whole life rotated around the source of livelihood into perpetual uncertainty.
       During the post independence era tribal are taken care of by enacting various welfare legislation on the floor of Indian parliament and state legislature pursuant to the provision of Indian constitution. The Govt has now a days went to the extent of carving out independent tribal welfare Dept with allocation of separate budgetary provision with liberty to make expenditure on the desired priority sectors. Still tribal's economy has not gone beyond the hand to mouth level despite various welfare scheme introduced by Govt when the whole nation has been on galloping speed of vibrant economic development with recording of staggering GDP and dreaming of becoming one of the leading world economic powers, demonstrating rupees one lakh twenty five thousand per capita income when tribal region stuck to the abysmal low of rupees forty six thousand and around. Building of road, railway, airport, dock and all such infrastructure, electricity generation has given boost to the industrial production and thus richer become rich. Tribal, all the time remained source of cheap labor to toil in the flourishing industries, high tech agriculture farm, extracting mineral site. The land being the lone assured source of  income  grabbed by land mafia on large scale, rendered tribal impoverished despite land reform laws intervened. Naïve tribal subjected to the atrocities when attempted to resist, discouraged him to lodge police case and denied to record it if attempted to do so. He left the usual place of habitation due to security constraint and thus  tribal diaspora taken place. Tribal in small ethnic group embraced prevalent faith, assimilated within dominant cultural stream and thus lost its own identity.
           The tribal, all the time haunted by threat perception remained soft target for all kinds of exploitation made him cowardice, marginal in thinking, lacked in receptivity, left him devoid of any ambition so that he may not at all flourish in entrepreneurship. Govt boasted for introducing host of welfare schemes but due to lack of receptivity the benefit of schemes are not being reaped by tribal. He is blamed for that without going to the root cause. As to sectoral development, there seems ostentatious impact but individual benefit. Tribal are not properly trained in cooperative  and self help group movement despite the world still relies on and resort to for common development. Therefore, tribal, all the time toiled alone and remained marginal, poor and soft target for exploitation. Bank never spontaneously come forward and encouraged tribal for securing credit for setting up micro, small and medium enterprises despite prevalent Govt policy and ambitious scheme  of credit plan with nine percent constitutional reservation for tribal. The shy tribal never frequented bank for securing loan and latter also never relied on him for repayment and thus declined to advance loan to willing tribal on the excuse of in viable project. This banker's negative attitude pushed tribal into financial exclusion. The so called enterprises started by exemplary tribal are generally  gone failure  for want of forward- backward linkages, necessary hand holding, incentives, reservation expected to be given by state given the MSSIDC, MIDC industrial policy, textile policy etc. Thus, the tribal are always deprived of his legitimate loaf of bread when he witnessed the all round prosperity of others around him. He, with loss of hope turns pessimist. His economic weakness make him politically unaware, pragmatically gullible and thus vulnerable to the worst of the worse situation.
       As to the banking and credit policy, the tribal are treated as untouchable. Till date , all tribal are not with opened bank accounts despite there is clarion call for financial inclusion.  No bank finance barring few to the extent of crop loan is accessible to him, resulted in to approach private money lender, drowned him deep in the indebtedness. The bankers in the concerned Dist are supposed to advance loan as per annual credit plan prepared by Dist collector with assistance of lead banker of the Dist concerned and accordingly agriculture, non agriculture and industrial sectors are to be financed with ensuring SC/ST
reservation but it is not followed and naïve tribal representative never questioned this negative attitude of banker and district executive left bad impact on the economic development of the tribal. Thus tribal are deprived of accrual benefit of various policies say, industrial , textile , cluster development scheme of MSME and host of such policies.
       There are humongous of welfare schemes meant to benefit the tribal from state and central Govt. However, for want of proper convergence the grant of targeted benefit does not leave desirable impact. For example, the beneficiary of land allottee is not considered for grant of irrigation well, electric motor pump,  irrigation pipe as a cluster but distributed in isolation. The tribal being small and marginal land holder benefited by one of the schemes in cluster is not in a position to supplement on his own and ultimately it results in total failure gives him impetus to dispose off the scheme proceeds and state is blamed for that.
       As to start up of any production, process or marketing activity, tribal are blamed as  incompatible, lacking in enterprise, resoluteness and desired skill, instead of giving full hearted support, hand holding, encouragement, reservation, linkages backward and forward etc. Under such circumstance, missing linkages and not tribal is responsible for going failure of any enterprises he ventured. The tribal, going desperate, give up the ventured project, go bankrupt and completely gets trapped into the snare of indebtedness.
       Constitutional provision of  reservation in employment and politics has mesmerized the tribal during these post independent days. Neo elite tribal
taken plunge  into the politics, represented in the parliament and state legislature and general  tribal masses accepted it as ideal way of life, ignoring the availability of meager opportunities, just impossibility for many. Reservation in employment mobilized him to get educated, to some extent secured employment in the lower rung position, ignoring minimal opportunities there, engaged in war of attrition for non inclusion of psudo tribal in the schedule list pragmatically intended to do so by shrewd elements with skewed mind, compromising with vested interest against constitutional scheme of reservation for real tribal groups. The tribal are deliberately streamlined to think so and thus major segment of indian population is kept aloof from main stream active participation is loss to the nation.
       Tribal are  closely associated with  forest and land  and so engaged now a days with agricultural activities. Therefore, they needs to be trained in this sector only on priority basis so as to leave the remarkable impact. Poor farming pursued by them is quite amenable to be improved keeping abreast with hi tech agriculture practices with introduction of playhouse, shed net for high protein vegetable, floriculture. With rendering financial assistance and forward backward linkages wherever necessary.   Accordingly, he is need of necessary exposure with arrangement of some visit domestic and foreign. So it should have been done with high yielding variety grain, pulses and cereals, oil seeds etc. Forest Right Act, 2006 enacted by Indian parliament with a view to undo historical injustice made with tribal has opened new vista before tribal to appropriate the benefit of miner forest produce. Based on this, the new avenues of host of opportunities are quite visible given the post recognition forest right hand holding. Forest is treasure trove of naturally grown medicinal  properties naturally sprouted,grown silvicultured and clandestinely passed by market baron and traders on collection through tribal for sneaking into international market is loss to Govt revenue in addition to the real loss of tribal capable of making him owner. Intervention by making tribal empowerment, giving sufficient hand holding, formulating conducive policy is a must to appropriate the benefit of miner forest produce. Same is the case with bamboo,tendu leaves, mahua flower, gum etc.
       The next priority sector close to the tribal is animal husbandry, poultry, diary, fishery, sericulture and other such allied agriculture pursuits. This has tremendous scope in the rampant mushrooming urbanization growth. Traditionally, tribal is closely associated with these activities. He could be conveniently molded,  provided he receives necessary hand holding to rise up from the traditional to high tech pursuit. Tribal, now a days are victim of       malnaurishment.  It could be wiped out given that line Depts of the state work on mission mode and with full dedication giving fillip into the existing developed fissure in the system, engagement of capable consultant for empowerment until end product comes out.
       Textile is the next sector which could be identified and correlated with tribal's fortune making. Tribal may be engaged in right from ginning to garment making industries since the cotton is produced in tribal belt. Why national textile ministry schemes and programs, state textile policy is not proving magnet for attracting tribal towards this sector is thing of worry, may be due to policy fissure existing therein, needs necessary fillip. Cooperative and self help group movement has not been imbibed on tribal when whole world has immense faith.
       All the time tribal has recorded encouraging fifty percent  worker's participation, seems to have engaged in nation building, but, in the context of menial, cheap labor only, needs to be done justice by making various policy interventions taking his shyness into consideration. Otherwise, one day the simmering unrest  amongst tribal is likely to  burst , at no cost should happen to keep this nation integrated with rock like solidarity.

                       S M Sarkunde
       Commissioner Tribal Development
                Maharshtra State, Nashik

आदिवासी जीवनशैली आणि शिक्षणाचे महत्त्व -Raju Thokal.

आदिवासी जीवनशैली आणि शिक्षणाचे महत्त्व

“Adivasi is not only a word ; But it’s a culture, community, symbol of identity, hope, dream, reality, origin of being, wisdom, truth but yet invisible for the world……..and simply a lifestyle of tribals”.

-Raju Thokal.

‘आदिवासी‘ या नावावरून भारतात हा समाज फारपुरातन कालापासून राहणारा समाज आहे. डोंगरकुशीत राहिलेल्या या समाजाने इतरसमाजांच्या वाहत्या प्रवाहांपासून स्वतःला दूरच ठेवले. त्यामुळे आधुनिकविकास, साधनसामुग्री, यंत्रे, शिक्षण, आरोग्याच्या सोयी-सुविधा, यांच्याशीत्यांचा संपर्क बरीच वर्षे आलाच नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काहींनीतो जाणीवपूर्वक येवू दिला नाही. तर काहींना आदिवासींचे हेदारिद्र्य….आदिवासीपण म्हणजे आपले भांडवल वाटत होते आणि आजही अपेक्षितअसा बदल याविचारसरणीत झालेला दिसत नाही. याला काही आदिवासी नेते, अधिकारी, विविध क्षेत्रात काम करत असणा-या व्यक्तीसुद्धा अपवाद नाहीत. आपले स्वताचेघर उभारण्यासाठी काहींनी अगदी उघड्या डोळ्यांनी हजारो आदिवासी समाजबांधवांची घरे बरबाद करण्याचे पातक केले. आपला भविष्यकाळ उज्ज्वलकरण्यासाठी काहींनी आदिवासींचा सुवर्णकाळ पायदळी तुडविण्याचे कामकेले…..आजही आपण डोळसपणे आदिवासी समाजाच्या सद्यस्थितीचा विचार केला तरआश्वासक असे चित्र आपण सापडणार नाही. सध्याच्या राजकीय, शैक्षणिकघडामोडींचा विचार केला तर हे चित्र न बदलण्यातच काहींचे हित सामावलेले दिसतआहे. एकंदरीत शासन, धर्मदायी संस्था व इतर समाजाकडूनही आदिवासी समाजदुर्लक्षितच राहिला आहे. तसे नसते तर मग शिवाजी महाराजांच्या गौरवशालीस्वराज्यामध्ये अनेक आदिवासी मावळ्यांचा इतिहास आज आपणास दिसलाअसता….भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये इंग्रजी हुकुमतीला शह देणा-या अनेकआद्य क्रांतिकारकांचा आज इतिहास आपण पुजला असता. परंतु लेखकांपासूनहीआदिवासी वंचितच राहिला. आदिवासींना जरी ‘अस्पृश्य‘ मानलेले नसले तरी पणसामाजिक प्रतिष्ठा मात्र त्यांना मिळालेली नाही.

अहमदनगर, पुणे, ठाणे, नागपूर, मुरबाड, मावळ, नाशिक, नंदुरबार अशा विविध भागातभटकंती करत असताना आदिवासी समाजाच्या जीवनशैलीचा मला अधिकच उलगडा होत गेला.शैक्षणिक कामानिमित्त फिरत असताना अनेक आदिवासी गावांमध्ये आदिवासीपालकांसोबत चर्चा करण्याची संधी मला अनेकदा मिळाली.आदिवासी गावांतीललोकांच्या राहणीमानाचा जवळून आस्वाद घेता आला. फणसासारखी बाहेरून काटेरीदिसणारी माणसे आतून किती गोड असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मी स्वतःजरी आदिवासी असलो, तरी शिक्षणासाठी कायम घरापासून, समाजापासून, गावापासूनदूर होतो. त्यामुळे आदिवासी संस्कृती, जीवनशैली, राहणीमान यांपासून मी काहीप्रमाणात वंचित राहिलो. आज माझ्या भटकंतीच्या छंदामुळे यासर्व बाबी पुन्हाजगण्याची संधी मला मिळाली. तसेच आदिवासी समाजाच्या अडचणी, आव्हाने या बाबीअभ्यासण्याची जाण माझ्या आदिवासी मनाला झाली.

अज्ञान, दारिद्र्य यांनी ग्रासलेल्या, आधुनिक प्रगतीच्या संपर्कापासून आजहीसर्वदूर असलेल्या या आदिवासी पाड्यांपर्यंत आज मेड इन चाईना मोबाईल मात्रमला दिसला. जेमतेम वरण भात, कंदमुळे, रानातली फळे, भाज्या यावर गुजराणकरणा-या असंख्य समाजबांधवांना आपल्या जीवनातील या उणिवांची जाणीवहीनसल्याचे चित्र मला दिसले. उलट आपण जंगलात राहतो याचा पुरेपूर अभिमानकाहींच्या चेह-यावर दिसला, तर काहींनी त्याबाबत खंत व्यक्त केली. परंतु५०-६० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात खूप फरक पडलेला आहे असे काहीजाणकार व्यक्तींच्या मुखातून आशादायक शब्द बाहेर पडलेले मला ऐकायला मिळाले.

प्रत्येकाचाजीवन जगण्याचा आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती अभ्यासण्याचा एक स्वतंत्रदृष्टीकोन असतो. माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून जेव्हा मी आश्रमशाळांच्याभूमिकेचा आजपर्यंतचा अभ्यास करतो, तेव्हा ज्ञानाची दीपज्योत या आदिवासीसमाजापर्यंत पोहचविण्याचे पवित्रच नव्हे तर दैवी काम आश्रमशाळांनी केलेलेआहे. आश्रमशाळांच्या अस्तित्वामुळेच मी शिक्षणाच्या महासागरात आपलीज्ञानाची तहान भागविण्यासाठी उतरू शकलो…काही तरी जीवनाला आकार देवू शकलो.आदिवासी समाजातील व्यक्तींनाही लाजवेल अशी नैपुण्यपूर्ण कामगिरी आमच्यागुरुजनांनी केलेली आहे. याचे प्रत्यंतर या आदिवासी भागात गेल्याशिवाय आपणासयेत नाही.

प्राचीनकालापासून आदिवासींचे वास्तव्य असूनही आज स्वताची शेती वाचविण्यासाठीआदिवासींना सरकार दरबारी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातही स्वताची शेतीअसणारे आदिवासी बांधव बोटावर मोजण्या इतकेच शिल्लक आहेत. ज्यांची जमीन आहे , त्यांचीही २-३ एकर डोंगरावर-खडकाळ माळरानावर. त्यामुळे यातून मिळणा-यातुटपुंज्या उत्पन्नाच्या मदतीने कुटुंब, मुलांचे शिक्षण, आरोग्य, राहणीमानयावर होणा-यासाठी खर्चासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रसंगीमजुरीसाठी इतरत्र स्थलांतर करावे लागते. त्यातही मजुरीसाठी जी कामे मिळतातती सारी प्रासंगिक असतात. त्यामुळे आदिवासींच्या जीवनाला आर्थिक स्थैर्यनाही.

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत आणि शिक्षण व वैद्यकीय सेवाह्या सुसंस्कृत समाजाच्या गरजा आहेत. या सर्व बाबतीत आदिवासींचा फक्तनिवा-याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आपणास दिसतो. फार वस्ती नसलेल्यादूरदूरच्या प्रदेशात या समाजाचे वास्तव्य असल्याने रानातून लाकडे, कारवी, झावळ्या, झाडाची पाने आणून मोकळ्या जमिनीवर झोपड्या उभारण्याचे कामस्वताच्या श्रमावरच आपले घर उभारण्याचे काम केले जाते. पण या कामात व्यस्तअसताना वर्षातील काही महिने उपासमार सहन करण्याची वेळ अनेक कुटुंबांवरयेते. स्त्रीचे अंग जुन्या पण फाटक्या लुगडयाने झाकलेले असते. गरीब घरातीलपुरुषांचीही तीच अवस्था असते. लहान मुले तर उघडी-नागडीच फिरत असतात. झोपडीतडोकावले तर एखादी जुनी वाकळ, बाज, पाण्याची व स्वयंपाकाची जेमतेम भांडीघडवंचीवर ठेवलेली…..एवढेच सामान. त्यात अजून भर असते ती गोधड्यांची.अलीकडे शिकलेल्या, शिक्षक, साहेब, कारकून, शिपाई म्हणून कुठेतरी ‘चाकरी‘ की ‘नोकरी‘ करणा-या लोकांच्या घरात स्टीलची भांडी, ब-यापैकी कपडे, टी.व्ही….., काहींचा गावातील एकमेव दुरून नजरेत भरणारा टुमदार बंगला वत्यासमोर चारचाकी, दोबचाकी वाहने दिसत आहेत. परंतु हे चित्र खूपच कमी आहे.आदिवासी समाजाला या शिक्षित वर्गाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. परंतुखेदाची बाब म्हणजे या नोकरदार मंडळींनीसुद्धा आदिवासी सामाजाकडे पाठफिरविली आहे.

प्राचीन काळापासून आदिवासी समाजावर अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार करण्यात आले आणि आजही हे वेगवेगळ्या स्वरूपात सुरूच आहे. कधी धरणासाठी जमीन पाहिजे म्हणून तर कधी आपली जमीन वनविभागाच्या अंतर्गत येते असे म्हणून भूमिहीन करूनही अनेक अत्याचारांना आदिवासींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणाच्या अभावामुळे त्याविरुद्ध पाहिजे तसा कोणी आवाज उठविला नव्हता; परंतु सध्या कासा, तलासरी याभागात लोकांनी एकत्र येवून अशा प्रकारे अन्यायाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अन्यायाचे अनेक पाठ आपल्या समोर असतानाही सुशिक्षित आदिवासी हे सर्व आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो आणि गप्प बसतो हि सुद्धा खेदाची बाब नव्हे काय?

स्वच्छतेच्या बाबतीत आदिवासींची घरे किंवा झोपड्या शेणाने सारवलेली आपणास दिसतील. शहरी वातावरणापलीकडे कदाचित हे चित्र आज तरी डोळे मोठे करून पाहण्यासारखे आहे. त्यात जर आपण डहाणू परिसरात गेलात आणि एखाद्या घराच्या भिंतीवर वारली चित्रकला दिसली तर या समाजाचा जीवन जगण्याचा निव्वळ स्वच्छंदी नैसर्गिक दृष्टीकोन आपणास दिसेल. घराच्या समोरच मोठे प्रशस्त अंगण अन तेही शेणाने सारवलेले असते. कोठेही घाण दिसणार नाही. परंतु आरोग्याबाबत अज्ञान आणि अंधश्रद्धा दोन्हीही आड येतात. मुलांना खरुज असण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. अगदी शाळांमध्ये जाणा-या विद्यार्थ्यांमध्येही हे प्रमाण आपणास दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे सकस आहाराची उणीव होय. यावर उपाय म्हणून सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. उदाहरणार्थ आदिवासी लोकसंख्या असणा-या भागात आश्रमशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच सकस आहाराची सोय करणे अपेक्षित असते. परंतु आज काळ बदलला, विज्ञानाने प्रगतीची पावले वेगाने धावायला लागली. या प्रमाणात आज ज्या सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे त्या आपणास दिसत नाहीत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून विविध बाबींवर प्रकाश टाकणारे वृत्त नियमित प्रसिद्ध होत असते. त्यातून यातील भयानकता, विदारकता दिसून येते.

आदिवासी समाजात सर्व धार्मिक, सामाजिक, आनंदाच्या, दुखाच्या प्रसंगात दारूला फार महत्त्वाचे स्थान आहे. लग्न असो किंवा गावाचा उरूस असो, महत्त्वाच्या माणसांना दारू पाजणे, झिंगून नाचत राहणे या गोष्टी इतक्या सर्रास आहेत कि त्यामुळे समाजात व्यसनाधीनता फार वाढली आहे. आदिवासींना व्यसनमुक्त करणे हे अतिशय कठीण काम आहे. दारू न पिणारा पुरुष सापडणे फारच कठीण. पण काहीही असो मुला-बाळांचा त्यांना कधी विसर पडत नाही. त्यांना व्यसनांपासून दूर नेण्यासाठी जनजागृतीविषयक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे.

आदिवासी लोकांना जंगलाचे भारी प्रेम आहे. अशी हि सदाफुलीसारखी सदैव हसणारी, फुलणारी आपली माणसं जवळून पाहिली कि अनेकदा मनात विचार येतो, ही गुणी माणसे अशीच का रानावनात कोमेजून जाणार ? त्यांच्या गुणांचा सुगंध बाहेरच्या जगाला कधीच नाही का जाणवणार? त्यांच्या गुणांची पारख, कदर जगाला कधीच नाही का करता येणार? आज या संगणकाच्या युगातही अज्ञानाचा अंधकार पसरलाय….ज्ञानाचा प्रकाश त्यांना केंव्हा दिसणार?

अज्ञानाच्या अंधकारात बुडालेले, मागासलेपणाच्या भोव-यात सापडलेल्या आदिवासी जनतेपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचविण्यासाठी आश्रमशाळांबरोबरच महाविद्यालये, तंत्रनिकेतने, व्यावसायिक शिक्षण संकुले, क्रीडा प्रबोधिनी, व्यायामशाळा, व्यावसाय मार्गदर्शन मंच, स्पर्धा परीक्षा केंद्रे आदि शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. यातूनच आदिवासींच्या उद्याच्या नवनिर्माणाचे भवितव्य घडेल. सक्तीचे व मोफत शिक्षण असूनही ‘झाडांची पाने गळावित तशी शाळेतून लेकरं टपाटपा गळत आहेत’ हे चित्र बदलण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे.

आजचा आदिवासी समाज असंतोषाच्या ज्वालामुखीवरच उभा आहे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची आधुनिक बीजे लावणे अधिक महत्त्वाचे आहे. परंतु जागोजागी आधुनिक शिक्षणसम्राट किंवा शिक्षणमहर्षी यांची आलिशान, अत्याधुनिक साम्राज्ये निर्माण झाली आहेत. यात ब-याच मोठ्या प्रमाणात आजचा विद्यार्थी होरपळून जात निघत आहे. म्हणून इथे आजच्या शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळेत आदिवासींची मुले शिक्षण घेण्यासाठी येत असतील तर त्यांना शिक्षणाचा योग्य न्याय मिळवून देण्याचे काम शिक्षकाने करणे गरजेचे आहे.

आदिवासींमध्ये शैक्षणिक क्रांति हवी असेल तर आवश्यकता आहे शिक्षकांनी जबाबदारी स्वीकारण्याची. केवळ अभ्यासक्रम बदलून क्रांति येणार नाही किंवा मोफत शिक्षण देवूबाही क्रांति होणार नाही, तर शिक्षकांची फक्त हुशार मुलांकडून उत्तरे मिळवून, पान पळटी करून, धडा दुसरा करून, स्वताची समजूत काढण्याची वृत्ती बदलाने आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये असणारा नेतृत्वगुणांचा अभाव, वाढणारी बेशिस्त, गैरहजेरीचे वाढते प्रमाण, अभ्यासाकडे दुर्लक्ष्य करण्याची प्रवृत्ती, वक्तशीरपणाचा अभाव, अनैतीकपणाचा स्वीकार आणि नेमून दिलेले काम पूर्ण करण्याची वृत्ती यांची कारणे शोधून त्यांच्या उपायांवर लक्ष्य केंद्रित केल्यास खरोखर आपल्या शाळांचा दर्जा तर बदलेलच परंतु या ‘आदिवासी वादळा’मुळे भविष्यात समाजाचे होणारे नुकसान टळेल. याकार्यातून मिळणारे समाधानही आपणासच मिळेल. या समाधानासाठी आपणाकडून मला सहकार्याची अपेक्षा करतो.धन्यवाद !!!

राजू ठोकळ
शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती….सह्यभ्रमंती !!!

Find us on Facebook