Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva
Showing posts with label Our activities. Show all posts
Showing posts with label Our activities. Show all posts

आपल्या सर्वांमध्ये या न त्या रूपाने 'बिरसा' आहेत

आज भगवान बिरसा मुंडा यांची १३८वि जयंती सर्व आदिवासी बांधव दिमाखात साजरे करतील,बिरसा मुंडा यांच्या महान कार्याला सलाम करत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील,भाषणे देण्यात येतील दिवसा अखेर सर्व जन आपल्या मनात बिरसांना वंदन करत पुढची जयंती कशी साजरी करावी हे ठरवतील …? करणारच!...  का नाही कारण बिरसा मुंडा हे नावच आपल्या समाजासाठी इतके प्रेरणादायी आहे,मग त्यांची जयंती आपण नाय साजरी करणार तर कोण करणार …?
 आज प्रत्येक आदिवासी तरुण फेसबुक सारख्या माध्यमातून आपल्या मनात 'भगवान बिरसा मुंडा' यांना नमन करताना बघून खूप अभिमान वाटतोय ,आपल्या तरुणात पसरत असलेली हि जागरुकता खरेच समाजाच्या दृष्टीने हितावह आहे.
        भगवान बिरसा मुंडा हे आदिवासींच्या अधिकारांसाठी स्वाभिमानासाठी लढले अमर झाले,मातृभूमीच्या रक्षणासाठी ते झटले. समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी शस्त्र हाती घेतले.
        आज आपण स्वतंत्र असूनही गुलामासारखे वागवले जातोय,हे पाहून बिरासांनी पुन्हा अवतरावे असे वाटते,परंतु आपल्या एक लक्षात येतेय का कि आपल्यात 'बिरसा' आजही जिवंत आहेत, त्यांच्या विचारांच्या रुपात! आदिवासी समाजासाठी खऱ्या मनाने झटणारा प्रत्येक जण  'बिरसा' आहे . आदिवासींसाठी जागृती करणारा प्रसंगी मोर्चे बांधणी करून पोलिसांचा मार खाणारा,तर ज्ञान रुपी शस्र हाती घेवून कायद्याने आदिवासींसाठी लढणाराही बिरसाच आहे !
       इतकेच काय आपल्या सर्वांमध्ये या त्या रूपाने 'बिरसा' आहेत फक्त त्यांना ओळखणे आपल्यात लपलेल्या या 'बिरसा' रुपी विचारांना कृतीत उतरवण्याची गरज आहे . केवळ आजच्याच दिवशी नाही, तर रोजच बिरासांचे नमन करुयात  ,त्यांच्या विचारांचे अवलोकन रोजच केले तर ती त्यांना खरी सलामी असेल.
        आपल्या तरुण पिढीला बाकीचा इतिहास तोंडपाठ असतो परंतु आपल्या आदिवासी विरांबद्दल फारशी माहिती नसते,आपण शिकलेल्यांनी पुढे येवून जर हा इतिहास पुढे आणला तर, आपल्या आदिवासी वीरांच्या महान कार्याला सलामी ठरेल   येणाऱ्या पिढीला हा ज्ञानकोश उपलब्ध करून देउ  शकतात . केवळ बिरसाच नाही तर असे अनेक क्रांतिवीर होऊन गेले,जे आपल्या समाजासाठी झटले ,त्यांचा इतिहास आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
       केवळ आजच्या दिवशी बिरसांच्या कार्याला सलामी करण्यापेक्षा बिरसांच्या विचारांना कृतीत उतरवून त्यांना रोजच सलामी देउयात. बिरासांची आज आपल्या समाजाला खरेच गरज असताना आपल्यातील प्रत्येक जण जर 'बिरसा' झाला तर खरोखरच 'उलगुलान' होईल! आणि 'आपण सुरु केलेल्या उलगुलान चा कधीच अंत होणार नाही' हा बिरसांचा विश्वास सार्थकी लागेल. यासाठी प्रत्येकाने शस्र घेवून मैदानात उतरणे शक्य नसले, तरी जे आपणाकडून शक्य होईल ते आपल्या समाजासाठी करणे गरजेचे आहे .
     भगवान बिरसा मुंडा हे आपले नायक आहेत,आज या नायकाला त्यांच्या १३८ व्या जयंती निमित्त नमन करून आपल्या समाजासाठी बिरसांसारखे कार्य करण्याचा प्रण करूयात !


-    संचिता सातवी

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा

आज आदिवासी वीर बिरसा मुंडा यांची जयंती आहे. आपणा सर्वांना भगतसिंग,राजगुरू ,चंद्रशेखर आझाद यांचा इतिहास माहित आहे पण आपल्यापैकी किती जण बिरसा मुंडा यांचा इतिहास जाणतात …?चला आज क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांचा साहसी इतिहास थोडक्यात जाणून घेवूयात !
जन्म _ आदिवासी वीर बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये सध्याच्या झारखंड राज्याच्या रांची जिल्ह्यातील अलिहत गावामध्ये एका झोपडीत झाला . त्यांच्या आईचे नाव करमी हातु व वडीलांचे नाव सुगना मुंडा असे होते .
शिक्षण _ बिरसा लहानपणापासूनच खूप कुशाग्र बुद्धीचे व चपळ होते . त्यांचे प्राथमिक शिक्षण सलगा या गावातील त्यांच्या मावशीकडे झाले .पुढे ते मिशनरी शाळेत चाईसाबा येथील जी. सी. एल. मिडल स्कूल मधून त्यांची उच्च माध्यमिक परीक्षा पास केली . बिरासांना येथेच मिशनऱ्यांच्या दुष्ट्चक्रांबद्दलचा पहिला अनुभव आला .
मिशनरी आदिवासींचे शोषण करतात म्हणून त्यांनी मिशनरी शाळा सोडून दिली. आणि त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले .
विवाह _त्यानंतर १८९ ० -१८९४पर्यंत ते बंद्गाव येथेच राहिले ,पुढे त्यांचा विवाह हिराबाई नावाच्या कन्येशी झाला परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला .
बिरसा मुंडा ते भगवान बिरसा _ बिरसांना शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य यांची सुद्धा आवड होती .ते उत्तम बासुरी वाजवायचे, त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला .ते रानात गुरे चरायला नेत . त्यामुळे निसर्गात उपलब्ध असलेल्या वनऔषधीबद्दल चांगलेच ज्ञान होते ,ते आजारग्रस्त लोकांना विशिष्ट प्रकारची जडीबुटी देवून त्यांचा आजार बरा करत असत . म्हणूनच लोक त्यांना 'भगवान बिरसा' म्हणू लागले . एकदा पावसाळ्यात कडाडती वीज बिरसांवर पडली. परंतु बिरसांना कसलीही इजा झाली नाही, याउलट त्यांच्या आजूबाजूची झाडे विजेमुळे खाक झाली . या घटनेपासून इंग्रजही आश्चर्यचकित झाले व "बिरसा god है" असे ते मानू लागले,व तसे त्यांनी नमूदही करून ठेवले आहे .
कार्य _सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या शोषणाची सीमा पार केली होती . आदिवासी जमिनीचे मूळ मालक असूनही जमीनदार व सावकार जबरदस्तीने त्या जमिनीवर ताबा मिळवून बसले होते . पण त्याबद्दल चकार शब्दही न काढण्याचा आदेश इंग्रजांनी दिले होते,परंतु बिरासांना ते सहन झाले नाही बिरासांनी लोकांमध्ये जागृती करण्यास सुरवात केली ,ते लोकांना म्हणत कि "तुमच्या जमिनी धूळ वाऱ्यासारख्या उडून गेल्या आहेत,स्वभिमानासोबत तुमचा आत्मविश्वासही संपला आहे,जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत जागृत नाही केला तर तुम्ही तुमच्या आया बहिणींची अब्रु कशी वाचवाल …… ?"या वाक्यांचा लोकांच्या मनावर खोल परिणाम झाला . व लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत होण्यास सुरवात झाली.
उलगुलान _ सन १८६९मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला,त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली . आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्द बिरासांनी १८९०मध्ये व्यापक क्रांती 'उलगुलान 'ची घोषणा केली . शस्त्रबळ तयार करून शत्रूंना ठार केले .
सन १८७५ मध्ये 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच !'हि लोकमान्य टिळकांची घोषणा देशभरात पोचली पण नव्हती ,त्याही आधीपासून बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रजी सत्तेला आवाहन केले होते हे इतिहासातील खूप मोठे सत्य किती जणांना माहित आहे … ?
बिरसांनी १८९५मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले,जंगल,जमीन संपत्ती हा आमचा अधिकार आहे ,ते आमच्या उपजीविकेचे साधन आहे ,यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून लढायचे आवाहन केले . त्यांनी न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतेले. जंगल राज्याची घोषणा करून ते आदिवासींचे महानायक बनले . यामुळे इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले परंतु त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. बिरसांनी अनेक अनुयायी तयार केले. बिरसा व त्यांच्या अनुयायांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिली. हि बातमी पोलिसांनी जिल्हाधिकार्याला कळवताच बिरासांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले . ९ ऑ. १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले. आणि ख्रिस्ती पाद्रींच्या साक्षीवरून त्यांना २ वर्ष कारावास व ५० रु. दंड ठोठावण्यात आला.
३० नोव्हे. १८९७ रोजी बिरसा तुरुंगातून बाहेर आले ,त्या वेळी आदिवासी समाजाची केविलवाणी स्थिती बघून ते पेटून उठले व त्यांनी स्वावलंबन व स्वाभिमानासाठी उलगुलान ची घोषणा केली.
बिरसा हे उत्तम योद्धा होते.एक कुशल प्रशासक होते. फेब्रु. १८९८मध्ये बिरसांनी आपल्या अनुयायांच्या सोबत डुंबारी बुरुज या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली, व १८९९मध्ये नाताळचा पहिलाच दिवस हल्ल्याचा दिवस म्हणून ठरवला. या हल्ल्यामध्ये त्यांनी पोलिस चौकी लुटायचे ठरवले,नाताळच्या रात्री आपल्या साथीदारांच्या तीन वेगवेगळ्या तुकड्या बनवून वेगवेगळ्या जागेवर हल्ले चढवले. फादरच्या घरावर हल्ले करून फादर कारवेरी व फादर हाफमान यांच्यावर बाण चालवले.
जाने. १९०० मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकाऱ्यांना बिरासांच्या या हल्ल्याची माहिती मिळाली आणि जाने. १९०० मध्ये ११. वाजता इंग्रजांनी डुंबारी बुरुजावर गोळीबार सुरु केला, तेव्हाच बिरासांचे अनुयायी त्यांच्या नावाचा जयजयकार करत धनुष्यबाण व दगडफेक करत त्यांचा प्रतिकार करण्यास सुरवात केली. त्यावेळी टेकडीवर २०००पेक्षा जास्त लोकांचा जमाव उपस्थित होता,यात स्त्रिया व लहान मुलांचाही समावेश होता. या नरसंहारात २००पेक्षा जास्त आदिवासी मारले गेले,व बाकीच्यांना जबरदस्तीने ख्रिश्ती धर्म स्वीकारण्यात भाग पाडले गेले. हा नरसंहार 'डुंबारी बुरुज नरसंहार' म्हणून ओळखला जाऊ लागला.
या नरसंहारानंतर ७जाने. १९००मध्ये पोलिसांनी धरपकड सुरु केली, व पुढे ३फेब्रु. १९००मध्ये बिरसांनी आपल्या ८० अनुयायांसमवेत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळेस तेथे उपस्थित आदिवासी बांधवांना बिरासांनी माधारी फिरण्यास व आपल्या अधिकारांसाठी लढण्याचा उपदेश केला.
त्यानंतर वयाच्या केवळ २५व्या वर्षी तुरुंगवास भोगत असताना कॉलाराने ग्रस्त होवून बिरासांची प्राणज्योत मालवली. परंतु येथेही इंग्रजांचे कपट दिसून येते,बिरासांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार बिरासांना तुरुंगात कॉलराच्या औषधाऐवजी विष देण्यात आले होते.
बिरासांना खात्री होती कि त्यांनी सुरवात केलेल्या उलगुलान नावाच्या वादळाचा कधीच अंत होणार नाही,बिरसा अमर आहेत व आपल्यासाठी आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहेत .
बिरासंच्या 'उलगुलान' ला हि बिरसाइतकेच महत्व प्राप्त झाले,उलगुलान मध्ये समाजहीत तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणे आदि तत्वे समाविष्ट आहेत ,म्हणूनच लोक बिरासांना धरती आबा म्हणून संबोधतात.
आजही या महानव्याक्तीच्या पवित्र स्मृती झारखंड राज्यात आहेत. झारखंड राज्याने रांची airport व रेल्वे स्थानकाला 'बिरसा मुंडा' हे नाव देवून त्यांच्या महान कार्याला गौरविले आहे.
या महान आदिवासी वीराला आयुश तर्फे शतशः नमन !जय बिरसा !

शब्दांकन : संचिता सातवी

संदर्भ : आदिवासी वीर - जेलसिंग पावरा

विश्वस्तरीय आदिवासी युवा शक्ति फेसबुक महापंचायत २०१३

नमस्कार !

आदिवासी युवकांनी चालू केलेल्या ह्या चळवळीत सगळ्या आदिवासी युवकांनी सहभागी व्हावे या साठी विनंती. सध्या देशभारातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
तर आता वेळ आहेआदिवासी हितासाठी चाललेल्या ह्या कार्यात आपला वयक्तिक आणि सामुहिक पातळीवर सहभागी व्हावे. आपल्या संपर्कात असलेल्या जास्तीत जास्त आदिवासी संस्था आणि संघटना यांना सदर चालवली सोबत जोडाल अशी अपेक्षा करतो.
सहभागी होण्या साठी कृपया नोंदणी करावी : www.event.adiyuva.in
Fb event page : https://www.facebook.com/events/519222388141664/


आभारी आहोत.



नेतृत्व गुण शिबीर आणि आदिवासी सशक्तीकरण कार्यशाळा



उदघाटन समारंभ : (संयुक्त कार्यक्रम -नेतृत्व गुण शिबीर आणि आदिवासी सशक्तीकरण कार्यशाळा )

कार्यशाळेचे उदघाटन माननीय एड्वोकेट चिंतामण वानग, आमदार (व माजी खासदार) यांच्या तर्फे युवा शक्तीचे प्रतिक म्हणून मशाल प्रज्वलित करून व आदिवासी समाजाचे आराध्य दैवत कणसरी पूजन करून करण्यात आले. आदिवासी विकास प्रकल्प डहाणू आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे आभार मानून कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुश अध्यक्ष श्री सचिन सातवी (इंजिनियर व सामाजिक कार्यकर्ता) यांनी केले. उद्घाटन सोहळ्यात श्री पांडुरंग बेलकर (माजी सभापती, समाज कल्याण, जिल्हा परिषद ठाणे) व एड्वोकेट काशिनाथ चौधरी (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य) यांनी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, युवक युवतींना आयुश सारख्या व्यासपिठाची आदिवासी समाजाला गरज असल्याचे नमूद करून आदिवासींची सद्यस्थिती, समस्या व आपली भूमिका त्याचप्रमाणे अशा प्रशिक्षणाची आवश्यकता याबाबत संबोधित केले..

उदघाटन भाषणात आमदार चिंतामण वानग यांनी आयुश च्या नाविन्य पूर्ण उपक्रमाचा तपशील देवून आयुश प्रगतीची, गती, वाटचाल व यशाबद्दल अभिनंदन केले. युवक युवतींच्या हातात संपूर्ण राष्ट्र - समाजाचे भविष्य आहे, त्या मुळे काळाच्या ओघात, योग्य दिशेने, योग्य वेळी, उचित पूल उचलणे अतिशय महत्वाचे असून. त्या साठी माहिती, ज्ञान आणि सतत कष्ट करण्याची मनाची तयारी असणे असल्याचे नमूद केले. या साठी आयुश सारखे व्यासपीठ आदिवासींच्या सार्वभौम विकासासाठी, भविष्य काळासाठी गरजेचे व आवश्यक असून, आदिवासींची एकजूट, एकशक्ती व कृतीचे प्रतिक आयुश व्हावे या साठी सुभेच्छा दिल्या.

उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री वसंत भासरा यांनी केले. सूत्र संचालन निवेदनात श्री भासरा यांनी आदिवासींची विविध नावाखाली होणाऱ्या हेलसांडीचा निषेध करून, दिनांक १/३/२०१२ रोजी मुंबईच्या बातमीत "आदिवासी नरभक्षक" असा उल्लेख करणाऱ्या स्टार माझा या वृत्त वाहिनीवर न्यायालयीन खटला का चालवू नये? असा प्रश्न करून या वाहिनीचा निषेध केला. आपल्या गावामधील आदिवासी भूमिहीन होत आहे, गावातीलच दलाल लोकांच्या संगनमताने पैशेवले, शहरातल्या बड्या व्यक्तींच्या हाती कावडीच्या किमतीत जमिनी जात आहेत. हे कुठे तरी थांबवावं, अन्यथा आपण गुलाम आणि घरगडी- सालगडी म्हणून राबण्याच संकट दूर नाही अशी भीती-खंत व्यक्त केली.

व्यासपीठावर प्राध्यापक चेतन गुरोडा (मुंबई विद्यापीठ), प्राध्यापक सुनील भुसरा ( बांदोडकर महाविद्यालय विद्यालय, ठाणे), माननीय मुरलीधर बांडे, माननीय रघुनाथ महाले, आयुश अध्यक्ष्य सचिन सातवी उपस्थित होते. या कार्यशाळेचा लाभ डहाणू, तलासरी, विक्रमगढ,वाडा, पालघर, वसई तालुक्यातील एकूण ३० ते ३५ सरपंच / सदस्य / कार्यकर्ते व ३० ते ३५ युवक युवती यांनी घेतला. उद्घाटन सत्र नंतर लागलीच मार्गदर्शन सत्राला वेळा पत्रकाप्रमाणे सुरवात झाली .





See VDO at :

1)      Leadership Program :  http://youtu.be/DCIDeD32d60

2)      Tribal Empowerment program :  http://youtu.be/cW2jzvMjZoE



See Photograph at:


2)      Tribal empowerment Workshop :

AYUSH for netive language

Boli Bhasha



`The nation lives through its language.`


This quotation – of course – is also true for tribes. To maintain our culture, traditions and past, our identity, we must preserve our native language, boli bhasha.


XXXXXX


To preserve our language, we encourage you to use it in your daily life. We would like to give assistance for it with the following phrases. (download in pdf)


Would you suggest more phrases? Just send them to us for ayush@adiyuva.in.

AYUSH for Art & Culture

Warli art -



Warli paintings of Maharashtra, India are the foremost tribal art in the Indian Territory. The origin of Warli tribe goes back to Neolithic period between 2500 BC and 3000 BC.


These paintings capture the life of the tribes and offer a valuable insight into the lifestyle of the tribes. Whenever a wedding or birth ceremony takes place in the tribe, we celebrate it by adorning our houses with fascinating designs. Even during the harvesting season, paintings and designs on the walls are the most common method of celebration.

This painting is drawn by tribals from Thane district, namely Warli, Malhar koli, Kathodi, Kokna, etc


AYUSH for the warli painters -


We help needy art students and tribal artists in their career as the we are only group which represent real tribal artists on internet in the interest of meeting today`s needs.


If you would like to know more about warli art, the artists and/or you are interested in purchasing or learn to make warli paintings, please, visit the following website: http://warli.adiyuva.in/


AYUSH - tribal tourism

Tribal and cultural tourism -



Maharashtra is famous about its world heritage sites like Ajanta, Ellora and Elephanta Caves and the Chatrapati Shivaji Terminus. But Maharashtra offers much more. The beautiful landscape gives place for the peaceful life of many tribes.


In the last few years we have experienced rising interest toward tribal tourism, more and more people would like to see into the daily life of tribesmen and get to know more about their culture, traditions and art.


AYUSH for tribal tourism -


For them AYUSH would like to provide detailed information and guidance, and we help to organize an unforgettable holiday.


For more information, please, visit the following sites or write us an e-mail: ayush@adiyuva.in


AYUSH educational activities

Carrier guidance -



With AYUSH activities at the field of carrier guidance are the followings:


• To provide a common platform for employers and tribal job searchers.


• To organize career guidance, experience sharing programs and competitions.



Job opportunities -


As an organization, we have an extensive database. With the help of this we can easily help to job seekers, or for employers looking for fresh graduated and experienced professionals.


For this you don`t have to do else, just register into our database.


If you are a job seeker, please, fill the following form:


Xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx


If you are an employer looking for professional employees, please, fill the following form:


Xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx


For those tribal job seekers, who have not internet connection, we provide offline information in many settlements. For the list of the places, check the following document:


Xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx



Career Guidance Programs -


AYUSH regularly organize Carrier Guidance Programs, where high school, junior and university students can meet experienced professionals, and they can get answer for their questions, get guidance to plan their carrier and so on.


Would you join to us? Check the upcoming events here:


xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx


You can also share your opinion, experiments and/or ask others in our forum:


Xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx



Experience Sharing Programs -


Within the confines of AYUSH Experience Sharing Programs we organize together experienced professionals from a special field with those students who are interested in this field.


So we regularly hold events for engineering, medical, art, commerce, business and many other fields.


Are you interested in? Here is the list of our upcoming Experience Sharing Programs:


xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx


Or you can also check our forum for more information:


Xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx



Competitions -


We organize competitions on two levels:


• Academic (eg. mathematics, business, literature, history etc.)


• Non-academic (eg. sport, dance, music, art and so on)


If you would like to take part in our competitions, check our events:


Xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx


If you would like to provide financial or material support for our competitions, please, contact AYUSH members: ayush@adiyuva.in


AYUSH career guidence program Sawata 20th June 2010

आदिवासी युवा शक्ती (आयुश)

सन २००९-२०१० या वर्षी .१० वी १२ वी तील पास/नापास  आदिवासी  विद्यार्थ्यांकरिता

  रविवार, दिनांक: २० जून २०१० सकाळ ते १०.०० ते संध्या  :.०० यावेळेत स्थान: मर मियर आश्रमसावटा हात. ता.डहाणू जि.ठाणे येथे

 

अन्याय नाही सहणार , अन्याय नाही करणार ,अन्याय होऊ  नाही देणार.

भारतीय आदिवासी मी …गाव माझा !…मी गावाचा !!

झिंदाबाद!    !  जय आयुस   !!

अशी साद घालत भविष्यातील वाटचालीसाठी बक्षिस समारंभ आणि शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमा आयोजित करून पार पाडण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सुनील पऱ्हाड यांचे हस्ते आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून आणि  प्राध्यापक श्री.चेतन गुराडे व  श्री.वसंत भसरा यांचे हस्ते बिरसा मुंडा यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून  करण्यात  आले. कार्यक्रमाची प्रस्तावना  डॉक्टर सुनील पऱ्हाड यांनी केली

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर डॉक्टर सुनिल पर्हाड यांनी कार्याक्रमची प्रस्तावना केली या प्रस्तावनेत प्रेरणा सदन आयुष मंच ध्येय्य धोरण, नियम आणि उपक्रम त्याचप्रमाणे कार्यक्रमांचा आढावा मांडून या काय्क्रमामागील उद्देश व भूमिका विषय मांडला. यानंतर श्री.वसंत भसरा यांनी  उद्घाटन कार्यक्रमाचा समारोप करून या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना एक मोकळीक मिळावी  यासाठी मार्गदर्शनाचे सहभागी स्वरूपाविषयी त्याच प्रमाणे घ्यावयाची काळजी आपली या परिसरात वागणूक कशी असावी मार्ग दर्शनामध्ये आवश्यक बाबींची नोंद घेणेप्रश्न विचारणे बाबत प्रोत्शाहन देवून आयुश मंच चे स्वरचित प्रेरणागीत घेवून बोलके केले. यानंतर उद्घाटन सूत्रसंचालक श्री. विजय आम्बात यांनी लागलीच प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक श्री.चेतन गुरोडे यांना प्रथम सत्रातील  मार्गदर्शन करण्यास सुरवात करण्यास विनंती केल्यानुसार मार्गदर्शन सत्रास सुरवात झाली.  

प्राध्यापक श्री. चेतन गुरोडे यांनी ई.१० वी १२ वी नंतर चे करिअर आणि डिप्लोमा, इतर  बिझनेस लाईन प्रवेश प्रक्रिया व तयारी त्याचप्रमाणे  सायन्स आणि संधी   करावयाची  तयारी या संदर्भ  सविस्तर मार्गदर्शन केले यानंतर प्रश्नोत्ताराच्या अवधीत विद्यार्थ्यांकडून केले गेलेल्या प्रश्नांचे उत्तर व शंकांचे नीरशन ही करण्यात आले. यामध्ये सायन्स,व व्याप्ती आणि महत्व नुसार इंग्रजीची भीती न बाळगता पेपर वाचन डिक्शनरी वाचन कायमची सवय लावून शब्द संचय वाढवणे हाच इंग्रजी सुधारण्याचा एकमेव पर्याय असून खूप सोपा असल्याचे स्व: अनुभवातून  समजावून दिले.  

डॉक्टर सुनील पऱ्हाड यांनी वैदकीय क्षेत्रातील संधी त्याचप्रमाणे आर्टस, कॉमर्स, क्षेत्रातील  संधी याबद्दल मार्गदर्शन करून आदिवासी संस्कृती चे दर्शन आपल्या अभ्यास व अनुभवा च्या आधारे विद्यार्त्यांना घडवून दिले यामध्ये आदिवासी क्रांतिवीर  बिरसा मुंडांची कामगिरी योगदानाचा इतिहास, आदिवासींची जीवन पद्धती आणि आपली भूमिका यासंदर्भ मार्गदर्शन केले.यामध्ये आदिवासी संस्कृती चा महिमाचे उदाहरण देताना वस्तुस्थितीचे उदाहरण देताना ज्या महिलेचा पती मयात झाला असेल त्या महिलेचे इतर समाजातील स्थान  आदिवासी मध्ये याच महिलांना धाव्लेरी म्हणून लग्नासारख्या विधीमध्ये दिलेले मनाचे स्थान, त्याच प्रमाणे मुलींकडून हुंडा घेतला जात नाहीविधवा पुनर्विवाह हे आदिवासी मध्ये पूर्वपरंपरे पासून  चालत आलेले असल्याचे त्याचप्रमाणे त्यासाठी इतर कायदे किंवा बंधने घातली  जातात ती  आदिवासी साठी काय आदर्श देतातअसा प्रश्न करत आदिवासींच्या सहज जीवनाचे दर्शन घडवून दिलेअश्या संस्कृतीचे वारसदार व संशोधक म्हणून मात्र आदिवासींना कुठेच स्थान नसल्याची त्याचप्रमाणे बिरसा मुंडा सारख्या क्रांतिवीरांनी ज्या विधवा पुनर्विवाहास प्रारंभ  करण्यास प्रोत्शाहन दिले अश्या कितीतरी आदिवासी क्रांतिवीर व समाज सुधारकांचे  इतिहासात  नामोनिशान नसल्याची खंतही व्यक्त केली. गाव पातळीवरील आरोग्य, शिक्षण, व्यसनाधीनता, बलाढ्य-धन्दान्द्ग्याची अरेरावी व आदिवासींवरील अन्यायाची पार्श्व भूमी ,जमिनींचे दलाल यामुळे होणारे आदिवासींचे नुकसान, याबाबत जिवंत उदाहरण दिले ते म्हणजे आजही वाणगाव सारख्या ठिकाणी आदिवासींच्या जमिनीवरील इतरांचा ताबा व हाय कोर्टातून ऑर्डर आणूनही आजही जमीन खुली करून देण्यास अडथळे आणत असलेल्या विविध यंत्रणांचे जाळे म्हणजे आदिवासींवरील अन्यायी कारस्थानाचा कहरच आहे याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

दुपारच्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्याचा परिचय करून देण्याच्या बहाण्याने व्यासपीठावर स्वत:ला येण्यास मुलांना प्रोत्साहन देण्यात आले जेणेकरून त्यांची सतेज डेअरिंग वाढण्यास हातभार लागावा हा हेतू होता. चहा व नाश्ता नंतर च्या सत्रामध्ये संस्था अध्यक्ष श्री.वसंत भसरा यांनी विद्यार्थ्यांना आर्टस, कॉमर्स,सायंस स्ट्रीम व या सर्वांचे महत्व प्रवेश प्रक्रिया व तयारी   आणि संधीबद्दल शारांस रूपाने एकदा पुन्हा आठवण करून देत कॉमन कोर्सेस व संधी डिप्लोमा, एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी, डी.एड बी.एड, एम.फिल, पी.एच.डी.,नेट-सेटपत्रकारितासामाजिक क्षेत्र बी.एस.डब्ल्यूएम. एस.डब्ल्यू आणि संधी  या बाबत माहिती देवूनआदिवासी विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता सतत पुढे जात राहणे त्यासोबत समाजातील इतर बांधवांना ही हात देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.  

येणाऱ्या काळात केवळ नोकरीच्या मागे न लागता आपणास व्यवसाय व उद्योगधनन्द्यांचे क्षेत्रात प्रकर्षाने पाउल टाकणे महत्वाचे असून गाव पातळीवरील लोहारसुतारकिराणा  दुकानपोल्ट्री,न्हावी, बांधकाम हे कमी भांडवल व जास्त नफाचे व्यवसाय काबीज करणे गरजेचे असून त्यासाठी स्वत:वर विश्वासमेहनत व कष्ट खेण्याची तयारी महत्वाची असल्याचे गोष्टीच्या  विविध उदाहरणांच्या सहायाने  पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे शिक्षण व महत्व,  क्षमता बांधणी, आत्मविश्वास बांधणी, पर्सन्यालीटी डेव्हलपमेंट या विषयांवरही प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शेवटच्या सत्रात उपस्थित सर्व विध्या विद्यार्थ्यापैकी ई.१० वी मधील टक्केवारीनुसार प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या ६ मुली व ६ मुलांना इंग्लिश टू मराठी ची डीक्शनरी एक रजिस्टर व वही पेन देवून सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर, वही, पेन चे वितरण मार्ग्दशाकांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गदर्शन व बक्षित वितरण कार्य क्रमाचा लाभ तलासरीबोईसरडहाणू तालुक्यातील एकूण  ४५ विद्यार्थ्यानी  घेतला. कार्यक्रम पार पाडण्यास प्रेरणा सदन संस्थेचे सचिव श्री.अशोक कोम,  हितचिंतक  कुमार.दिलीप कोम आणि त्यांचे सहकारी मित्र वर्ग यांनी मेहनत घेतली.  त्याचप्रमाणे प्रमुख  मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक श्री.चेतन गुरोडे व डॉक्टर सुनील पऱ्हाड यांनी अखेरपर्यंत  उपस्थिती लावून आभार प्रदर्शनासह,  मार्गदर्शन व सहकार्याचा भार उचलला .

धन्यवाद !

 

 

 

 


Find us on Facebook