Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva
Showing posts with label Adikanya. Show all posts
Showing posts with label Adikanya. Show all posts

Welcome to AYUSH Group

Welcome to AYUSH Group!

AYUSH is social networking platform to promote collaborative & constructive approach of Tribal Empowerment by knowledge & skill sharing. 
Aim to utilize and translate all individual/organisational energies to common vision & mission of Sustainable Tribal Development
Expecting you to initiate similar effort at your level. Lets do it together!  
 
AYUSH team works on principle of back to community on volunteer basis!
Goal : Towards better planet for all (Nature, Animals & Humans)

Major Objectives: Tribal Empowerment - Establish knowledge & skill sharing pool to Educational/Career/Professional success of tribal youth
Strengthening Social Responsibility awareness towards common constructive platform for Tribal Empowerment
- Encouragement to Preserve and promote Traditional Knowledge of Tribal communities (Cultural values, Art, handicrafts, Music, Medicines, Language, Lifestyle, Social Integrity, Sustainability, Economy, Etc)
- Efforts to Preserve Nature, Resources, Human & Planet. earth as one family !
 
Its your platform, welcoming your views/suggestions/opinions to enhance activities (mail us at ayush@adiyuva.in)
Let us establish common platform for Tribal empowerment, Let us do it together!

Thanks & regards
AYUSHonline team
Adivasi Yuva Shakti
 
 
# Links for Your reference #
As on today AYUSH mails directly reaches to 50,000+ Users on Social Networking.
 
Online Link :
Home Page : www.adiyuva.in
- Online Membership Form : www.join.adiyuva.in
- Let us do it together : www.do.adiyuva.in
Tribal professional database registration : www.in.adiyuva.in
- Online Feedback form : www.how.adiyuva.in  

Social Awareness :
- Adivasi Bachavo Andolan : www.jago.adiyuva.in
- Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
- Tribal Matrimonial : www.lagin.in 
- Warli Painting : www.warli.in 

Social Networking  : Status as on Mar 2016
- Fb Group : 
- Fb Profile : www.facebook.com/adiyuva (5,000 Friends & 5,997+ Followers)
- Fb Page : www.facebook.com/adiyuva1 (2,574+ Fans)
- Twitter : http://twitter.com/adiyuva (More than 30,100+ twittes)
- Linked In : www.linkedin.com/in/adiyuva (2,000+ Connections)
- G+ : http://gplus.to/adiyuva (35,675,336+ Views)   

Online Gallery :
- Group Mail : https://groups.google.com/d/forum/adiyuva‎ ( 3,349+ Members)- Social VDO's : www.youtube.com/adiyuva (watched 3,30,658+ minutes) 
- Photo Album : http://picasaweb.google.com/adiyuva (Photo Collection 16,000+ Pictures)
 
Note : To know more about AYUSH activities google search by “adiyuva”.  Lets spread social responsibility awareness!

आरक्षणाची चोरी - संचिता सातवी

या आरक्षणाची पण आपली एक वेगळीच दैना आहे. कारण आरक्षणाची सुद्धा चोरी होवू लागलीय.
दागिन्यांची चोरी, पैशांची चोरी ऐकली होती. पण..आरक्षणाची चोरी...? होय.आरक्षणाची चोरी.!  ऐकून धक्का बसला ना ..? 
"बस झाले आता! आदिवासींना आरक्षण देणे  बंद करा ... !" असे म्हणणारा एक गट आहे तर 'आदिवासींना ५० वर्षापूर्वीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे" असे म्हणणारा कायदा बंद करा" 
असे म्हणणारा दुसरा गट आहे . आणि या गटांच्या लढायित एक तिसराच ज्याचा या कोणत्याही लढायीशी संबंध नाही असा गट खोटी कागदपत्रे सादर करून स्वताला आदिवासी म्हणवून घेवून, आदिवासींच्या नोकऱ्या आणि सवलती लाटून मजा मारतोय .... आणि ज्या तळागाळातल्या, गरजू आदिवासीला हे आरक्षण लागू होतेय, जे या आरक्षणाचे खरे दावेदार आहेत त्यांना मात्र असले काही आरक्षण संविधानाने आपल्याला दिलेय याची पुसटशी कल्पनाही नाही......या गरजूंच्या तोंडाचा घास पळविणे म्हणजेच आरक्षणाची चोरी करणे. आणि अशी चोरी करणारे आणि त्यांना खोटी कागदपत्रे मिळवून देण्यास मदत करणारे अधिकारी हे दोन्हीही सारखेच गुन्हेगार आहेत. खरे तर आदिवासींच्या विकासाचा दर्जा सुधारावा .त्यांची शैक्षणिक ,आर्थिक दृष्ट्या प्रगती व्हावी यासाठी हे आरक्षण आदिवासींना संविधानाने दिले .पण आजतागायत आदिवासींची परिस्थिती होती तशीच आहे .जे काही सुशिक्षित आदिवासी या आरक्षणाचा फायदा घेवून पुढे आले त्यांनी समाजाकडेच पाठ फिरवली. आणि याचाच फायदा बोगस आदिवासींनी घेवून आदिवासींच्या तोंडाचा घास हिसकावून खायला सुरवात केली व आज हे प्रमाण इतके वाढलेय कि आज जवळ जवळ १ लाखापेक्षा जास्त नोकऱ्या ह्या बोगस आदिवासींनी लाटल्यात.इतकेच काय तर आदिवासी चे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पैशांचा प्रसंगी ताकदीचा व प्रलोभानाचा वापर करून हि कागद पत्रे मिळवली जाताहेत . ज्या परिस्थितीने पछाडलेल्या ,गरजू आदिवासींना हे आरक्षण लागू होते, त्यावर आज केवळ सधनच नाही तर श्रीमंत व अतिश्रीमंत पांढरपेश्यांनी आज बोगस कागदपत्रे सादर करून आदिवासींच्या नोकऱ्या लाटत आहेत. .केवळ नोकऱ्या व सवलती मिळविण्यासाठी स्वताला आदिवासी म्हणत आहेत .याला चोरी नाही तर काय म्हणायची ...? एरवी ज्या आदिवासी समाजाला अंधश्रद्धाळू ,गरीब, पिछाडलेले ,व्यसनाधीन म्हणवणारे हे लोक नोकऱ्या व सवलतींसाठी मात्र स्वताला आदिवासी(कि बोगस ) म्हणवून घेवू लागलेत .एरवी गरीब आदिवासींकडून गड्यांची कामे करवून घेणारे हे आज स्वताला या समाजाचा हिस्सा म्हणवू लागलेत.काय म्हणावे या वृत्तीला. केवळ फायद्यासाठी स्वताची जात सोडून स्वताला दुसऱ्या जातीचा म्हणवणारा मनुष्य हा किती कृतघ्न व मतलब साधू आहे हे कळते. असा मनुष्य स्वताच्या समाजाशी इमान राखत नाही, तो आपला काय उद्धार करणार....? मग यांना कुणी अधिकार दिला आदिवासी म्हणवून घेवून आमच्या नोकऱ्या पळविण्याचा ...? यापेक्षा प्राणी बरे जे इतर ठिकाणी खायला जास्त मिळत असले तरी मालकाला सोडून जात नाहीत, मालकाशी इमान राखतात. यांना माहित तरी आहे का कि आदिवासी म्हणजे काय, त्यांची संस्कृती ,त्यांची भाषा काय आहे ते...? अरे हो... पण हे कुठे आदिवासींवर पी एच.डी करताहेत, यांना तर फक्त आपल्या नोकऱ्या हव्यात. मग आदिवासी जगो वा मरो ..आपल्याला त्याच्याशी काय करायचेय, नाही का...?' यांना तर हेही ठावूक नाही कि खरा आदिवासी कधीच बेईमानी करीत नाही मग तुम्ही कोण स्वतःला आदिवासी म्हणविणारे ..? आदिवासींच्या मानगुटीवर बसलेले हे नवीन भूत म्हणजे बोगस आदिवासी ! आता हा काय प्रकार आहे ..? बोगस माल, बोगस कागदपत्रे ऐकले होते पण हा बोगस आदिवासी काय प्रकार आहे बुवा ...? मग खरे आदिवासी कोण...? आम्ही जे ५० वर्षापूर्वीपासून आदिवासी असल्याचा पुरावा बाळगणारे कि ते ज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घूस चारून आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळवलाय ते...? कोण खरे आदिवासी आणि कोण बोगस हे कसे ओळखावे...? कारण हे बोगस लोक नोकऱ्या मिळवण्यासाठी स्वतःला आदिवासी म्हणवून घेताहेत आणि आपण खरे आदिवासी म्हणून नोकऱ्या मिळवलयात पण समाजाकडे तर दोघांनी पण पाठ फिरवली न ...? मग आपण खरे आदिवासी कसे...?
आपण तर खरे आदिवासी ना...! मग आपल्या नोकऱ्या लाटणाऱ्या या बोगस चोरांविरुद्ध आपले रक्त का खवळत नाही ...? का "आपल्याला आरक्षण मिळाले बस झाले ,आता तुम्ही काहीही करा" असा जर विचार करत असाल तर आपल्या मुलाबाळांचा ,लहान भावंडांचा विचार करा.
परंतु असेही नाही कि या बोगस लोकांना घरी बसून चार शिव्या दिल्या कि झाली आपली जबाबदारी पूर्ण!.नाही.कारण आपण ज्या अर्थी आदिवासी म्हणून सवलती घेतल्या त्या अर्थी या समाजाचे ऋण आपण फेडायलाच हवे अन्यथा या आरक्षणाचा लाभ घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. आज कितीतरी सुशिक्षित आदिवासींनी या सवलतींचा लाभ घेतलाय व स्वतःची प्रगती करून घेतलीय . परंतु जेव्हा प्रश्न येतो समाजाच्या प्रगतीचा तेव्हा मात्र समाजाकडे पाठ फिरवलीय
आणि विशेष म्हणजे या गोष्टीचे ना आपल्या तरुणांना गांभीर्य वाटतेय ना आपल्या आमदार, खासदारांना! सर्वच्या सर्व मुग गिळून गप्प बसलेत. जर हे असेच चालू राहिले ना तर आज आरक्षणाची चोरी होतेय, पण उद्या आपले अस्तित्वच चोरीला जायला वेळ नाय लागणार.
घरात चोरी होत असताना चोराला "चोरी करू नकोस' म्हणून विनंती करायची कि त्याच्या मुसक्या बांधायच्या , हे आता तुम्हीच ठरवा!

काहींनी तर स्वतःला आदिवासी म्हणवून घ्यायला पण लाजा वाटू लागल्यात मग बोगस आदिवासी आणि आपण (जे खरे आदिवासी असण्याचा दावा करतात) यांच्यात फरक काय..? काय विरोधाभास आहे आणि हा..कि एकीकडे ज्यांचा काही संबंध नाही आदिवासींशी ते स्वतःला आदिवासी म्हणवून घेताहेत आणि एकीकडे जे आदिवासी आहेत ते स्वतःला आदिवासी म्हणवून घेण्यास नकार देताहेत.पण आरक्षण, सवलती मात्र दोघांनाही हव्यात .खरेच आज प्रश्न पडतोय कि" खरे आदिवासी कोण आणि बोगस कोण ..?' "जे खोटे दाखले मिळवून नोकऱ्या लाटणारे कि, जे खरे असून आरक्षण घेवून गप्प बसणारे,,,!' कारण हे दोघेही समाजाला घातकच नाही का...? नाही म्हणायला समाजाचे ऋण प्रामाणिकपणे फेडणारे आहेत पण ते केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच .आणि त्यांना हातभार लावणारेही तुरळकच !

Save Land Save tribal | लेका, मला विकू नको !


पैशासाठी जमीन विकणाऱ्या आपल्या शेतकरी लेकाला जमीन विकू नको असे आर्जव करतेय धरणीमाता तिच्याच तोंडून . सकाळी उठले तर सूर्याच्या कोवळी किरणे माझ्या लांबलचक पसरलेल्या हिरव्यागार शरीराला सोनेरी अंघोळ घालत होती. आज मी फार खुश आहे .आज माझ्या लांबलचक शरीरावर पसरलेल्या शरीरावर भाताची पिकलेली सोनेरी कणसे कशी मस्त वाऱ्यावर डुलत होती .आज त्यांचा इथे शेवटचा दिवस आहे आज त्यांना कापून माझ्या लेकाच्या म्हणजे इथल्या मालकाच्या घरी नेणार . माझा लेक पण आज खूप खुश होता ...येयीलच इतक्यात ! .........तो काय आला ...अरे पण हे काय.... त्याच्या सोबतची ती सुटाबुटा ताली माणसे कोण अन ती माझ्या लेकासोबत काय करताहेत ?.....अरे हा तर गावचा तलाठी अन हा सर्कल अन ती दुसरी मोठ्या गाडीतून उतरलेली माणसे कोण ? अंनि हा तलाठी माझी मोजणी करून कागदावर काय लिहतोय ...? मला त्यांच्या बोलणे ऐकू आले ....तो मोठा साहेब तलाठ्याला म्हणाला," ३० ला फायनल करून टाका .असेही हि जागा फार कामाची नाय मिळत "म्हणजे मला हा मोठा साहेब विकत घेणार कि काय ...? माझा लेक पण फार खुश दिसतोय .....मोठ्या सायबाने माझ्या लेकालाठरल्याप्रमाणे नोटांची काही बंडले दिली ती मंडळी निघून गेली ..

माझ्या डोळ्यात पाणी आले ज्या लेकाची त्याच्या कुटुंबाचीमागच्या तीन पिढ्यांपासून मी माय बनून सेवा केली त्याने आज मला एका मोठ्यासायबाला कवडी मोलात विकून टाकलेमी प्रत्येक वेळी ज्याची पोटाची आग विझवली ....तुमची पोरेबाळे उपाशी राहू नयेत म्हणून मी उन पाऊस झेलून अन्न पिकवते तोच माझा लेक आज मला कसायाच्या हातात सोपवून चाललाय. का ...? कारण मी जुनाट झाले म्हणून कि माझी पिक उगवण्याची क्षमता कमीझाली म्हणून...?म्हातारे झाल्यावर आपल्या आयीला असे कुणी टाकून देते का ..!
तुझे बंधुभगिनी तुझ्या कामात आले नसतील तेव्हडी मी तुझ्या कामात आले हे कसे विसरलास ....तुझे आजोबा, तुझे बाबा, तू आता तुझी मुले माझ्या बांधावरच खेळून मोठी झाली .नांगरणी करून थकल्यावर तू याच बांधावर विसावा घेतलास ,,,बाप मेल्यावर हि इथेच डोळ्यातली टिपे गळून तुझे दुख हलके केलेस आज मी तुला भर कशी झालीलेका ,ऐक माझं मला त्या सायबाला विकू नकोस तुला कितीही मोठ संकट आले तरी मी तुझी साथ देयीन ...पण तो मोठा साहेब तुला फसवून तुझ्याकडून मला चण्याफुटण्याच्या भावात विकत घेवून कोटी रुपयाला दुसऱ्याला विकेल नाहीतर उंच उंच बंगले बांधील नाहीतर कारखाने बांधून रसायनाने माझे हिरवेगार शरीर भाजून टाकेल....तुला तुझ्या धरतरी आयीची अशी दुर्दशा पाहवेल का रे ...? मग कुठे पाहशील हिरवीगार झाडे हिरवेगार भात तुझ्याघरात पसाभर भात तरी कुठून येणार ...? त्या मोठ्या साहेबाने दिलेल्या पैशातून ...? ते पैसे हि तू दारू पिवून संपवून  टाकलेस तर तुझ्या हाती काय नाय राहणार ..? पैसे काय दोन दिवसांचा सोबती पण मी आयुष्यभर सोबत देयीन .जशी तुझ्या वाडवडिलांची दिली होती .

तुझ्या वाड वडिलांनी मला आयीसारखे वागवले म्हणून मी हि त्यांची सेवा केली आजवर तुझी हि सेवा करत आली पण आज तू फक्त काही पैशांसाठी मला विकून टाकलेस ...? का कारण तुझ्या मुलांचे शिक्षणाचे कर्ज फेडायचे म्हणून कि ,तुला नवीन घर बांधायचं म्हणून ! मुलीचं लग्न करायचेय कि शेती सोडून दुकान टाकायचे म्हणून ...कि मित्रासारखी दारू पिवून ऐशोआराम करायचं म्हणून ...का...?
लेका तुझी खरी संपत्ती तर मीच आहे जी दुसऱ्या कुणाला लुबाडू देवू नकोस भरपूर मेहनत करून ,सेंद्रिय  शेतीचा वापर करून विविध पिके घे म्हणजेतुला पैशाची नाद भासणार नाही कारण ती पिके तू बाजारात पण विकू शकतोस . तरीही जर खरोखरच गरज असेल तर मला तारण ठेवून कर्ज घे ते फेडून पुन्हा मला सोडव पण कायमची विकू नकोस मला .मला विकून आलेले पैसे दोन दिवसात संपतील ,मग तुझ्या घरात कणगी भर भात .लाकूड फाटा ,भाजीपाला षाधी वनस्पती तू कुठून आणणार ते विकत आणायला तू पैसे कुठून आणणार ?तुझी धरतरी माय आहे तोवर सर्व काही आहे नाय तर काही नाय .
म्हणून सांगते ऐक माझे ......

आदिकन्या | संचिता सातवी 
Author @ Google

Find us on Facebook