Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva
Showing posts with label Adikanya. Show all posts
Showing posts with label Adikanya. Show all posts

आदिवासी दिन कसा साजरा करणार?

आदिवासी दिन कसा साजरा करणार?

TSP परिसरातील रोजगाराच्या संधी स्थानिक आदिवासींना देण्यात याव्या हा राज्यापाल्यांची अधिसूचना आदिवासी विकासात मोलाची भूमिका पार पडू शकते. तयार आहात आपल्या भावंडाना दिशा देण्या साठी ?

गाव आणि तालुका पातळीवर आयोजित करिण्या करिता 

१ ऑगस्ट पर्यंत
➀ सामाजिक जागरुकता करूयात
शिक्षणा विषयी जागरुकता
नोकरीच्या संधी विषयी जागरुकता
कौशल्य विकास जागरुकता

५ ऑगस्ट पर्यंत
➁आदिवासी एकात्मता वाढवूया
गावातील सुशिक्षितांची यादी बनवणे
तालुका पातळीवर यादी संकलित करणे
यादीची प्रत आणि अर्ज तयार करणे

९ ऑगस्ट
➂आदिवासी दिन साजरा करूया
मोठया संखेने एकत्रित येउन संकलित केलेले अर्ज एकत्रित PO/ATC यांना सुपूर्द करणे
उपलब्ध असलेल्या उर्जेचा सामाजिक कार्यात सकारात्मकतेने रचनात्मक उपयोग करणे

राज्यपालांच्या अधिसूचने नुसार निर्देशित केलेली पदे : तलाठी, सर्वेक्षक, ग्राम सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहायक, पशुधन सहायक , परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी

सेवा योजन नाव नोंदणी किवा ओनलायीन नाव नोंदवा !www.maharojgar.gov.in

जास्तीत जास्त बेरोजगारांनी नोंदणी करून उपलब्ध रोजगाराच्या संधी चा उपयोग करावा.
आपण सगळ्यांनी ठरवले तर, ह्या वेळेस चा आदिवासी दिन एक नवी दिशा देणारा ठरेल !



AYUSH Picnic | Gambhir gad, 4th May 2014

आयुश वनभोजन | AYUSH picnic cum get together!

Agenda : Tribal Empowerment, Traditional knowledge & cultural Intellectual, AYUSH activities (& Promoting Tribal Tourism | आदि पर्यटन)
Date : 4th may 2014, Sunday 
Time : 9.00 ~ 5.00 
Meeting Point : Uchal Dev (9 am)
Gambhir Gad, Kajal Barichi Khind. Taluka Dahanu. Dist Thane 

Submit Participation form atwww.picnic.adiyuva.in

FB Event Page : https://www.facebook.com/events/488242107969949/ 
Map : https://mapsengine.google.com/map/edit?mid=zZhuTvZBP95I.kIa91DMMj658


Contact : Sachin Satvi 09246 361 249, Vasant Bhasara 08087 546 675, Chetan Gurada 9869 197 376 Karan Pawar 9930 729 139, Sandip Sathe 9029196 354

Live Pages : https://www.facebook.com/media/set/?set=a.631766900210241.1073741841.122481367805466&type=1 




Tarpa Mahotsav 2013 @ Dahanu - Sanchita Satvi

तारपा नृत्य ,बोहाडा ,गौरी नृत्य ,ढोल तसेच डांगी नृत्य अशा विविध भागातील आदिवासी नृत्यांचा थरार!… वारली चित्रकलेने सजलेली दुकाने,आदिवासीच्या साध्या परंतु समाधानी स्वावलंबी राहणीमानाची साक्ष देणारी शेणामातीने सारवलेली झोपडी !तांदळाचे लाडू,पापड्या,सावेली,नाचणीची भाकरी तसेच कोहळ्याची भाजी यांचा सुटलेला घमघमाट! प्रचंड संख्येने उलटलेला जनसागर आणि या सर्व ऐतिहासिक क्षणाची साक्षठेवणारा डहाणूचा नयनरम्य समुद्र किनारा!
                    हे दृश्य होते डहाणू बीच ,पारनाका येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय (दि . २१डिसें २०१३ ते २३ डिसें  २०१३ ) तारपा महोत्सवाचे !
                 प्रस्तुत स्थळी जेव्हा प्रवेश केला तेव्हा प्रथम तर डोळ्यांवरती विश्वासच बसेना ,कारण हजारोंच्या  संख्येने लोटलेला जनसागर आणि त्यात घुमणारा ताराप्याचा सुर…! हे दृश्य निदान मी  तरी पहिल्यादांच पाहत होते . शाळकरी मुलांपासून ते क्लास १ ऑफिसर पर्यंत आणि शेंबड्या पोरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणीही स्वताला या महोत्सवात सामील होण्यापासून रोखु शकले नव्हते .
                मग आमची आयुशची टीम पण मागे कशी राहणार … ?आदिवासी युवा शक्ती - आयुश ची टीम महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच मोठ्या उत्साहाने प्रस्तुत स्थळी हजार झाले ,मग वारली चित्रकलेची दुकाने सजवण्यापासून ते 'वारली आर्ट सेशन ' मध्ये भाग घेण्यापर्यंत टीमचा उत्साह ओसंडून वाहत होता . या वेळेत आपल्या वारली तरुण चित्रकारांनी एक नवीन ट्रेंड सुरु केला तो म्हणजे taoo गोंदवून देण्याचा! शरीरावर tatoo गोंदवणे काही नवीन नसले तरी ,या tatoo मध्ये वारली चित्रकलेतील चिन्हांचा वापर करून नवीन fashion चा शुभारंभ आमच्या वारली कलाकारांनी केला . आणि त्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
              या महोत्सवात आयुश टीमच्या सर्व वारली चित्रकारांनी आपापली चित्रकला व हस्तकलांचे प्रदर्शन भरवले होते ,हस्तकला वस्तू ,वारली चित्रकला ,बांबू आर्ट यासारख्या इविध वस्तू या प्रदर्शनात विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. आमच्या या दुकानांना या तीन दिवसात  हजारोंच्या संख्येने आलेल्या सर्व पर्यटकांनी तसेच बऱ्याच विदेशी पर्यटकांनी सुद्धा भेटी दिल्या . पर्यटकांची वारली चित्रकलेबद्दलची उत्सुकता व पसंती हि खरेच वाखाणण्याजोगी होती ,प्रत्यक्ष पेंटीग शिवाय विविध वस्तूंवर वारली कला साकारलेल्या वस्तूंकडे स्त्री वर्गाचा  कल जास्त दिसून येत होता . यामध्ये शोभेच्या वस्तू ,दागिने तसेच कपड्यांवर केलेल्या वारली कलेला खूप मागणी असल्याचे दिसून आले ,हि आपल्या कलाकारांसाठी खूप महत्वाची बाब आहे . आमच्या कलाकारांनी आलेल्या पर्यटकांना कलेबद्दलची माहिती व योग्य मार्गदर्शन करून आदिवासी कलेचा प्रसार करण्याचे उत्तम कार्य केले . .
             खरे पाहता ते तीन दिवस आम्ही खऱ्या अर्थाने 'आदिवासी 'म्हणून जगलो ,तारपा नृत्यावर मनसोक्त ठेका धरून नाचण्याचा मोह तर आम्ही कसाबसा आवरला ,परंतु मन मात्र 'भिंदोडत … भिंदोडत… 'करतच होते .
             तीनही दिवस आपल्या आदिवासी स्त्रियांनी बनवलेल्या अस्सल 'tribal food ' पुढे आजचे पिझ्झा बर्गरही कस्पटासमान वाटू लागले आहेत ,विविध भागातून आलेल्या आपल्या आदिवासी बंधुभागीनींनी सादर केलेली नृत्ये व त्यातील थरारक कसरती पाहून तर एखादा action पटसुद्धा फिक्का वाटावा !सर्व वातावरणाच जणू 'आदिवासिमय' झाले होते.  कधी नव्हे तेव्हडा उत्साह व अभिमान आदिवासींच्या डोळ्यात अवतरला होता .
              संपुर्ण जगाला आदर्श घालून देणारी व साधी परंतु स्वावलंबन शिकवणारी आदिवासी संस्कृती प्रत्यक्ष अनुभवली व आदिवासी असण्याचा अभिमान डोळ्यात अवतरला ,कारण तसे आपल्यासारख्या सुशिक्षित आणि स्वतःला mordenसमजणाऱ्या आदिवासी जनतेला हे सर्व नवीनच ,नाही का …?
              परंतु मोठ्या प्रमाणावर एकत्र जमलेल्या आदिवासी तरुणाईने घेतलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुन आपली संस्कृती नक्कीच जपली जाईल ,अशी अशा वाटू लागली आहे .
      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सौजन्याने आयोजित या तारपा महोत्सवाचे हे प्रथम वर्ष !डहाणू परिसरात आदिवासी भागात पर्यटनाचा विकास व्हावा,व आदिवासी संस्कृतीची ओळख सर्व दहानुकारांना व्हावी हा या मागचा उद्देश ! 
      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्पाधिकारी मा. श्री. शैलेश नवाल यांच्या सुंदर कल्पनेतून साकारलेल्या या तारपा महोत्सवामुळे डहाणू परिसरात पर्यटनाचा विकास होण्यास नक्की हातभार लागेल . 
       खरेतर आम्हाला आमचीच संस्कृती अनुभवायला महोत्सवात जावे लागतेय हीच मोठी खेदाची बाब आहे . कारण आपली संस्कृती हि आपल्या दैनंदिन जीवनातुन प्रकट होत असते ,ती आपण रोज जगायला व अनुभवायला हवी ,त्यासाठी चतुर्थी व एकादशीची गरज नसते.  असे असूनही आपल्या उत्सवाचे प्रतिक समजल्या जाणारा  'तारपा नृत्य 'पाहायला आज आपल्याला u tube वर सर्च करावे लागत आहे . 

      हि परिस्थिती आपल्यासारख्या शिक्षित पिढीमुळेच  निर्माण झाली आहे . आपल्या पूर्वजांनी जपलेला सांस्कृतिक वारसा जपण्यास व तो आपल्या पुढच्या पिढीला देण्यास आपण असमर्थ ठरलो आहोत,कारण आधुनिकीकरणाच्या नावाखाली व सांस्कृतिक मुल्यांची ओळख न करून घेता ,आपण भलतीकडेच भरकटू लागलो आहोत , व यामुळेच आपल्याला आपलीच संस्कृती तुच्छ वाटू लागली आहे .
     परंतु हीच महान संस्कृती अभ्यासायला जेव्हा पांढरपेशी व विदेशी लोक येतात,तेव्हा मात्र आम्हा सुशिक्षितांना (?) प्रश्न पडतो कि, "ज्या संस्कृतीचा आदर्श आज जगात घालून दिला जातोय ती संस्कृती नाकारणारे आम्ही  खरेच सुशिक्षित आहोत का… ? हा प्रश्न पडू लागला आहे. 
         म्हणता म्हणता ते तीन दिवस संपलेही ,आणि हा तारपा महोत्सव आम्हा शिकलेल्यांना खूप काही शिकवून गेला 
    कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवता येतील यांचे उत्तम उदाहरण मा. श्री. नवाल यांनी घालून दिले. त्यांच्या या कार्याबद्दल आयुषच्या संपूर्ण टीमतर्फे अभिनंदन व खूप खूप आभार !
                    हा महोत्सव असाच चालू राहावा, असे वाटत असतानाच नाईलाजाने त्याला निरोप द्यावा लागला.परंतु येणाऱ्या तारपा महोत्सवाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ,निदान या निमित्ताने तरी समाजापासुन भरकटत चाललेल्यांना 'आदिवासी 'असण्याचे महत्व कळेल !

Sanchita Satvi 

आपल्या सर्वांमध्ये या न त्या रूपाने 'बिरसा' आहेत

आज भगवान बिरसा मुंडा यांची १३८वि जयंती सर्व आदिवासी बांधव दिमाखात साजरे करतील,बिरसा मुंडा यांच्या महान कार्याला सलाम करत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील,भाषणे देण्यात येतील दिवसा अखेर सर्व जन आपल्या मनात बिरसांना वंदन करत पुढची जयंती कशी साजरी करावी हे ठरवतील …? करणारच!...  का नाही कारण बिरसा मुंडा हे नावच आपल्या समाजासाठी इतके प्रेरणादायी आहे,मग त्यांची जयंती आपण नाय साजरी करणार तर कोण करणार …?
 आज प्रत्येक आदिवासी तरुण फेसबुक सारख्या माध्यमातून आपल्या मनात 'भगवान बिरसा मुंडा' यांना नमन करताना बघून खूप अभिमान वाटतोय ,आपल्या तरुणात पसरत असलेली हि जागरुकता खरेच समाजाच्या दृष्टीने हितावह आहे.
        भगवान बिरसा मुंडा हे आदिवासींच्या अधिकारांसाठी स्वाभिमानासाठी लढले अमर झाले,मातृभूमीच्या रक्षणासाठी ते झटले. समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी शस्त्र हाती घेतले.
        आज आपण स्वतंत्र असूनही गुलामासारखे वागवले जातोय,हे पाहून बिरासांनी पुन्हा अवतरावे असे वाटते,परंतु आपल्या एक लक्षात येतेय का कि आपल्यात 'बिरसा' आजही जिवंत आहेत, त्यांच्या विचारांच्या रुपात! आदिवासी समाजासाठी खऱ्या मनाने झटणारा प्रत्येक जण  'बिरसा' आहे . आदिवासींसाठी जागृती करणारा प्रसंगी मोर्चे बांधणी करून पोलिसांचा मार खाणारा,तर ज्ञान रुपी शस्र हाती घेवून कायद्याने आदिवासींसाठी लढणाराही बिरसाच आहे !
       इतकेच काय आपल्या सर्वांमध्ये या त्या रूपाने 'बिरसा' आहेत फक्त त्यांना ओळखणे आपल्यात लपलेल्या या 'बिरसा' रुपी विचारांना कृतीत उतरवण्याची गरज आहे . केवळ आजच्याच दिवशी नाही, तर रोजच बिरासांचे नमन करुयात  ,त्यांच्या विचारांचे अवलोकन रोजच केले तर ती त्यांना खरी सलामी असेल.
        आपल्या तरुण पिढीला बाकीचा इतिहास तोंडपाठ असतो परंतु आपल्या आदिवासी विरांबद्दल फारशी माहिती नसते,आपण शिकलेल्यांनी पुढे येवून जर हा इतिहास पुढे आणला तर, आपल्या आदिवासी वीरांच्या महान कार्याला सलामी ठरेल   येणाऱ्या पिढीला हा ज्ञानकोश उपलब्ध करून देउ  शकतात . केवळ बिरसाच नाही तर असे अनेक क्रांतिवीर होऊन गेले,जे आपल्या समाजासाठी झटले ,त्यांचा इतिहास आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
       केवळ आजच्या दिवशी बिरसांच्या कार्याला सलामी करण्यापेक्षा बिरसांच्या विचारांना कृतीत उतरवून त्यांना रोजच सलामी देउयात. बिरासांची आज आपल्या समाजाला खरेच गरज असताना आपल्यातील प्रत्येक जण जर 'बिरसा' झाला तर खरोखरच 'उलगुलान' होईल! आणि 'आपण सुरु केलेल्या उलगुलान चा कधीच अंत होणार नाही' हा बिरसांचा विश्वास सार्थकी लागेल. यासाठी प्रत्येकाने शस्र घेवून मैदानात उतरणे शक्य नसले, तरी जे आपणाकडून शक्य होईल ते आपल्या समाजासाठी करणे गरजेचे आहे .
     भगवान बिरसा मुंडा हे आपले नायक आहेत,आज या नायकाला त्यांच्या १३८ व्या जयंती निमित्त नमन करून आपल्या समाजासाठी बिरसांसारखे कार्य करण्याचा प्रण करूयात !


-    संचिता सातवी

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा

आज आदिवासी वीर बिरसा मुंडा यांची जयंती आहे. आपणा सर्वांना भगतसिंग,राजगुरू ,चंद्रशेखर आझाद यांचा इतिहास माहित आहे पण आपल्यापैकी किती जण बिरसा मुंडा यांचा इतिहास जाणतात …?चला आज क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांचा साहसी इतिहास थोडक्यात जाणून घेवूयात !
जन्म _ आदिवासी वीर बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये सध्याच्या झारखंड राज्याच्या रांची जिल्ह्यातील अलिहत गावामध्ये एका झोपडीत झाला . त्यांच्या आईचे नाव करमी हातु व वडीलांचे नाव सुगना मुंडा असे होते .
शिक्षण _ बिरसा लहानपणापासूनच खूप कुशाग्र बुद्धीचे व चपळ होते . त्यांचे प्राथमिक शिक्षण सलगा या गावातील त्यांच्या मावशीकडे झाले .पुढे ते मिशनरी शाळेत चाईसाबा येथील जी. सी. एल. मिडल स्कूल मधून त्यांची उच्च माध्यमिक परीक्षा पास केली . बिरासांना येथेच मिशनऱ्यांच्या दुष्ट्चक्रांबद्दलचा पहिला अनुभव आला .
मिशनरी आदिवासींचे शोषण करतात म्हणून त्यांनी मिशनरी शाळा सोडून दिली. आणि त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले .
विवाह _त्यानंतर १८९ ० -१८९४पर्यंत ते बंद्गाव येथेच राहिले ,पुढे त्यांचा विवाह हिराबाई नावाच्या कन्येशी झाला परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला .
बिरसा मुंडा ते भगवान बिरसा _ बिरसांना शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य यांची सुद्धा आवड होती .ते उत्तम बासुरी वाजवायचे, त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला .ते रानात गुरे चरायला नेत . त्यामुळे निसर्गात उपलब्ध असलेल्या वनऔषधीबद्दल चांगलेच ज्ञान होते ,ते आजारग्रस्त लोकांना विशिष्ट प्रकारची जडीबुटी देवून त्यांचा आजार बरा करत असत . म्हणूनच लोक त्यांना 'भगवान बिरसा' म्हणू लागले . एकदा पावसाळ्यात कडाडती वीज बिरसांवर पडली. परंतु बिरसांना कसलीही इजा झाली नाही, याउलट त्यांच्या आजूबाजूची झाडे विजेमुळे खाक झाली . या घटनेपासून इंग्रजही आश्चर्यचकित झाले व "बिरसा god है" असे ते मानू लागले,व तसे त्यांनी नमूदही करून ठेवले आहे .
कार्य _सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या शोषणाची सीमा पार केली होती . आदिवासी जमिनीचे मूळ मालक असूनही जमीनदार व सावकार जबरदस्तीने त्या जमिनीवर ताबा मिळवून बसले होते . पण त्याबद्दल चकार शब्दही न काढण्याचा आदेश इंग्रजांनी दिले होते,परंतु बिरासांना ते सहन झाले नाही बिरासांनी लोकांमध्ये जागृती करण्यास सुरवात केली ,ते लोकांना म्हणत कि "तुमच्या जमिनी धूळ वाऱ्यासारख्या उडून गेल्या आहेत,स्वभिमानासोबत तुमचा आत्मविश्वासही संपला आहे,जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत जागृत नाही केला तर तुम्ही तुमच्या आया बहिणींची अब्रु कशी वाचवाल …… ?"या वाक्यांचा लोकांच्या मनावर खोल परिणाम झाला . व लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत होण्यास सुरवात झाली.
उलगुलान _ सन १८६९मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला,त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली . आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्द बिरासांनी १८९०मध्ये व्यापक क्रांती 'उलगुलान 'ची घोषणा केली . शस्त्रबळ तयार करून शत्रूंना ठार केले .
सन १८७५ मध्ये 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच !'हि लोकमान्य टिळकांची घोषणा देशभरात पोचली पण नव्हती ,त्याही आधीपासून बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रजी सत्तेला आवाहन केले होते हे इतिहासातील खूप मोठे सत्य किती जणांना माहित आहे … ?
बिरसांनी १८९५मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले,जंगल,जमीन संपत्ती हा आमचा अधिकार आहे ,ते आमच्या उपजीविकेचे साधन आहे ,यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून लढायचे आवाहन केले . त्यांनी न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतेले. जंगल राज्याची घोषणा करून ते आदिवासींचे महानायक बनले . यामुळे इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले परंतु त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. बिरसांनी अनेक अनुयायी तयार केले. बिरसा व त्यांच्या अनुयायांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिली. हि बातमी पोलिसांनी जिल्हाधिकार्याला कळवताच बिरासांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले . ९ ऑ. १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले. आणि ख्रिस्ती पाद्रींच्या साक्षीवरून त्यांना २ वर्ष कारावास व ५० रु. दंड ठोठावण्यात आला.
३० नोव्हे. १८९७ रोजी बिरसा तुरुंगातून बाहेर आले ,त्या वेळी आदिवासी समाजाची केविलवाणी स्थिती बघून ते पेटून उठले व त्यांनी स्वावलंबन व स्वाभिमानासाठी उलगुलान ची घोषणा केली.
बिरसा हे उत्तम योद्धा होते.एक कुशल प्रशासक होते. फेब्रु. १८९८मध्ये बिरसांनी आपल्या अनुयायांच्या सोबत डुंबारी बुरुज या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली, व १८९९मध्ये नाताळचा पहिलाच दिवस हल्ल्याचा दिवस म्हणून ठरवला. या हल्ल्यामध्ये त्यांनी पोलिस चौकी लुटायचे ठरवले,नाताळच्या रात्री आपल्या साथीदारांच्या तीन वेगवेगळ्या तुकड्या बनवून वेगवेगळ्या जागेवर हल्ले चढवले. फादरच्या घरावर हल्ले करून फादर कारवेरी व फादर हाफमान यांच्यावर बाण चालवले.
जाने. १९०० मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकाऱ्यांना बिरासांच्या या हल्ल्याची माहिती मिळाली आणि जाने. १९०० मध्ये ११. वाजता इंग्रजांनी डुंबारी बुरुजावर गोळीबार सुरु केला, तेव्हाच बिरासांचे अनुयायी त्यांच्या नावाचा जयजयकार करत धनुष्यबाण व दगडफेक करत त्यांचा प्रतिकार करण्यास सुरवात केली. त्यावेळी टेकडीवर २०००पेक्षा जास्त लोकांचा जमाव उपस्थित होता,यात स्त्रिया व लहान मुलांचाही समावेश होता. या नरसंहारात २००पेक्षा जास्त आदिवासी मारले गेले,व बाकीच्यांना जबरदस्तीने ख्रिश्ती धर्म स्वीकारण्यात भाग पाडले गेले. हा नरसंहार 'डुंबारी बुरुज नरसंहार' म्हणून ओळखला जाऊ लागला.
या नरसंहारानंतर ७जाने. १९००मध्ये पोलिसांनी धरपकड सुरु केली, व पुढे ३फेब्रु. १९००मध्ये बिरसांनी आपल्या ८० अनुयायांसमवेत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळेस तेथे उपस्थित आदिवासी बांधवांना बिरासांनी माधारी फिरण्यास व आपल्या अधिकारांसाठी लढण्याचा उपदेश केला.
त्यानंतर वयाच्या केवळ २५व्या वर्षी तुरुंगवास भोगत असताना कॉलाराने ग्रस्त होवून बिरासांची प्राणज्योत मालवली. परंतु येथेही इंग्रजांचे कपट दिसून येते,बिरासांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार बिरासांना तुरुंगात कॉलराच्या औषधाऐवजी विष देण्यात आले होते.
बिरासांना खात्री होती कि त्यांनी सुरवात केलेल्या उलगुलान नावाच्या वादळाचा कधीच अंत होणार नाही,बिरसा अमर आहेत व आपल्यासाठी आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहेत .
बिरासंच्या 'उलगुलान' ला हि बिरसाइतकेच महत्व प्राप्त झाले,उलगुलान मध्ये समाजहीत तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणे आदि तत्वे समाविष्ट आहेत ,म्हणूनच लोक बिरासांना धरती आबा म्हणून संबोधतात.
आजही या महानव्याक्तीच्या पवित्र स्मृती झारखंड राज्यात आहेत. झारखंड राज्याने रांची airport व रेल्वे स्थानकाला 'बिरसा मुंडा' हे नाव देवून त्यांच्या महान कार्याला गौरविले आहे.
या महान आदिवासी वीराला आयुश तर्फे शतशः नमन !जय बिरसा !

शब्दांकन : संचिता सातवी

संदर्भ : आदिवासी वीर - जेलसिंग पावरा

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य ! - संचिता सातवी

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !
 धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!
डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक)   त्याच  वसतिगृहातील  आदिवासी विद्यार्थांना मारहाण  आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा  हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.
अरे समजतात काय हे स्वताला …? यांना  रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .
येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध  करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक  गुंडांना बोलावून मारहाण  शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास  एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .

आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!
 आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात  आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला  आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला  विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे  समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या  गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण  बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे , विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे .  यामुळे विद्यार्थांना  मानसिक  शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना  आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना , स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ।! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .

उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!
आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके  नियमित facebookवर  वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post   facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण  मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता  येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय  तुम्ही…? जिथे google  facebook माध्यम  बनवून  आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि  आपण  कुठे  केवळ गुड मोर्निग  नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात  हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ  ते  जण आपली मते comment  like करून मांडत असतात ,मग  बाकीचे कुठे  गेले  ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा  दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार  घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो  …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा  स्वाभिमानच हरवला आहे ….?
केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली  धुंदलवाडी  येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर  बलात्कार प्रकरणाची घटना असो, या  अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा  वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि  हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक  सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .

नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …?
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही  कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !
एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता  त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत (७ वी,ते ११वी)  म्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"
धिक्कार असो अशा मानासिकतेचा  !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास  अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .
आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत  वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना  संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?

आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !         
 विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले  संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत ,कुणी पालकांनी आवाज उठवलाच तर तो बड्या प्रवृत्तींकडून  दाबला जातोय .
           आणखी एका मुद्द्याकडे मला सर्वांचे लक्ष वेधून घ्यावेसे वाटतेय कि ,आज बहुतेक  आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक म्हणा अधीक्षक किंवा सुरक्षारक्षक वा इतर कर्मचारी हे स्थानिक आदिवासी नसून देशावरून आलेले बिगर आदिवासी असतात ,या लोकांना  आदिवासी समाजाबद्दल आपुलकी असते ना अस्मिता (काही अपवाद वगळता)केवळ अर्थार्जनासाठी नोकरी करायची म्हणून करत असतात .  जर स्थानिक आदिवासींची निवड या ठिकाणी झाली तर नक्कीच हे प्रकार बदलू शकतात . निदान तशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही
             काही "अभ्यासू"(…?) लोकांनी आम्हालाही प्रश्न विचारलेत कि ''तुम्ही काय करता या असल्या प्रश्नांवर… ? ,काहींनी तर निर्णयच दिला कि 'तुम्ही काहीच करताना दिसत नाहीत' .अशा अभ्यासू मंडळींना मी सांगू इच्छिते कि केवळ इतरांना "तुम्ही काय केले ""असे विचारण्यापेक्षा " आपण सोबत मिळून  करूया 'असे म्हणा ; मित्रांनो हा समाज आपला आहे, मग कुणी एक व्यक्ती किंवा संघटना एकटीने लढून चालत नाही.  त्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे . कारण एकटा  आवाज दाबला जातोय पण तोच आवाज जेव्हा पूर्ण समाजाकडून उठवला जाईल  , तेव्हा तो एल्गार असेल  .,
मित्रांनो हा लेख त्या तमाम आदिवासी तरुणांना जागे करण्यास आहे जे समाजात होणारे अन्याय बघूनही शांत आहेत .ज्यांची  बोटे केवळ नट नट्यांच्या फोटोला like करण्यात मग्न असतात . आपण या समाजाचे भविष्य आहोत. पण  इतके उदासीन भविष्य काय कुणाचा उद्धार करणार …?


उपाय 
             या घटनाच्या निमित्ताने आपण तरुण पिढी एकत्र येवून पुढील गोष्टी तर नक्कीच करू शकतो .
१) पालक ,आजी  माजी विद्यार्थी यांची एक समिती स्थापन करून एक दबाव गट बनविणे ,जेणेकरून असे प्रकार घडल्यास आपला दबाव गट प्रशासन  आपले नेते दोघांवरही दबाव आणून या असल्या प्रकरणाचा छडा लावण्यास  दोषींना योग्य ती शिक्षा देण्यास  आपण त्यांना भाग पाडू शकतो .
 ) याशिवाय सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक गट बनवून ते आपल्या पाल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देवू शकतात ,शेवटी एकीचे बळच कामी येते .
 ) आश्रमशाळेतील  आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना आपल्यावर होणाऱ्या  अन्यायाविरुध्द बोलण्यास पुढे आणायला हवे ,याशाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना अभय देणे गरजेचे आहे .
 ) पालक  विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून अन्याय झाला तर त्याबद्दल दाद कशी मागावी ,कुठे तक्रार करावी हे सर्व मुद्दे त्यांना पटवून देवून त्याची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे .
यासाठी सर्वांनी एकत्र लढा देणे गरजेचे आहे शेवटी आजचे विद्यार्थी हे उद्या समाजाचे भविष्य ठरतील .

लक्षात घ्या ,आता शांत बसले तर छत्तीसगड  झारखंड च्या आदिवासिंसारखी (लाखो आदिवासींची गावेच्या गावे पेटवून देणे ,त्यांना  त्यांच्या जमिनीवरून हुसकावणे ,आदिवासी स्त्रियांवर बलात्कार ,नक्षलवादी सांगून आदिवासींवर गोळीबार ,खून आणि प्रचंड प्रमाणात आदिवासींची पिळवणूक ) आपली गत व्ह्यायला वेळ नाही लागणार, किंबहुना ही  त्याच पर्वाची सुरवात मानायला हरकत नाही.

संचिता सातवी, आदिवासी युवा शक्ती




Online Photo : https://plus.google.com/photos/103801329114961339077/albums/5936457438279297025 


Find us on Facebook